शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा शाही दसरा..

By admin | Updated: October 3, 2014 00:27 IST

नेत्र हे प्रकाश आणि तेजाचे प्रतिक म्हणून देशभरातील शक्तीपीठात अंबाबाईला प्रमुख शक्तीपीठ म्हणून मान आहे.

ब्रम्हांड जेव्हा शून्यावस्थेत होते, तेव्हा शक्तीने स्वत:मधून लक्ष्मी, महाकाली आणि सरस्वती या तीन स्त्री देवता आणि ब्रम्हा, विष्णू आणि महेश या त्रिदेवतांची निर्मिती केली ती आदिशक्ती, जगज्जननी म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाई. हे शक्तीतत्त्व पृथ्वीवर सर्वात आधी जेथे प्रकटले ते स्थान म्हणजे कोल्हापूर. त्यामुळे पौराणिक ग्रंथांनुसार करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे स्वरूप हे आदिशक्तीचे मूळ पीठ आहे. यज्ञात आहुती दिलेल्या सतीचे नेत्र या ठिकाणी पडले. नेत्र हे प्रकाश आणि तेजाचे प्रतिक म्हणून देशभरातील शक्तीपीठात अंबाबाईला प्रमुख शक्तीपीठ म्हणून मान आहे.  
मूर्तीच्या मस्तकावर नाग, लिंग, योनी ही काल, पुरुष आणि प्रकृती (म्हणजे शिवशक्ती) या तीन तत्त्वांची प्रतिके आहेत. हातात बीजफल आणि औषधी असलेले म्हाळुंग फळ, दुस:या हातात पानपात्र. अन्य दोन हातात गदा, ढाल ही आयुधं आहेत. 
 दक्षप्रजापतीच्या यज्ञात आहुती दिलेल्या सतीचे नेत्र पडले ते हे स्थान. त्यामुळे येथे शिव-शक्ती, गणपती, कार्तिकेय असा परिवार आहे. तर विष्णूवर रागावून कोल्हापुरात अंबाबाईच्या आश्रयाला आलेल्या लक्ष्मीचेही येथे अधिष्ठान असल्याने देश-विदेशातील 1क्8, नंतर 51 आणि महाराष्ट्रातील साडेतीन या सर्व शक्तीपीठात अग्रस्थानी असलेले हे क्षेत्र आद्यशक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी तोफेची सलामी झाली की घटस्थापना होवून देवी विराजमान झाली, असे संबोधले जाते. उत्सव काळातील नऊ दिवसांत देवीची देशभरातील विविध स्त्री देवतांच्या, महिषासूरमर्दिनी, अंबारी, झोपाळ्य़ात बसलेली, कामाख्या अशा विविध रूपात पूजा बांधली जाते. देवीची बांधली जाणारी ही पूजा कोल्हापुरातील नवरात्रोत्सवाचे खास वैशिष्टय़ मानले जाते. शिवाय उत्सवातील नऊ दिवस रात्री साडेनऊ वाजता विविध आकारात बनवलेल्या पालखीतून देवी मंदिराला प्रदक्षिणा घालते. पालखीच्या पुढे भालदार, चोपदार, रोषणाईक असा शाही लवाजमा असतो. 
  पंचमीला श्री अंबाबाई सखी देवी त्र्यंबोलीच्या भेटीस जाते. यादिवशी देवीची अंबारीतील पूजा बांधली जाते. यावेळी छत्रपती घराण्याची कुलदैवत तुळजाभवानी आणि गुरू महाराजांच्याही पालख्या असतात. येथे छत्रपतींच्या उपस्थितीत कोहळा फोडण्याचा विधी झाल्यानंतर देवीची उत्सवमूर्ती असलेली पालखी नगरवासीयांना भेटी देत पुन्हा मंदिरात येते. अष्टमीला देवीचा जागर व पहाटेर्पयत होमहवन असे विधी केले जातात. याच दिवशी देवी फुलांनी सजवलेल्या वाहनात विराजमान होऊन नगरप्रदक्षिणोला निघते. या अलौकिक सोहळ्य़ाचे दर्शन घेतलेला भाविक कृतकृत्य होऊन जातो. 
कोल्हापूरचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून चौफाळ्य़ाचा माळ म्हणजे आताच्या दसरा चौकात शाही दसरा सोहळा होऊ लागला. त्यावेळी भवानी मातेच्या पादुका हत्तीवरून या सोहळ्य़ाला यायच्या. कोल्हापूर संस्थाच्या छत्रपतींसोबत  भगवी ढाल, भगवी पताका, त्रिपटका, रिसाला, कोटकरी, विटेकरी, बाणदार, गायकवाड, यादव, पंतप्रतिनिदी असे मानकरी, सरदार असा शाही लवाजमा असायचा. करविर निवासिनी अंबाबाई, तुळजाभवानी आणि गुरूमहाराजांच्या पालख्याही आपल्या लव्याजम्यानिशी येथे दाखल होतात. येथे पोलीस बँड आणि मिलीटरी बँन्डच्या वतीने देवीला मानवंदना दिली जाते. त्यानंतर शाहू महाराज दस:याच्या मुख्य सोहळ्य़ाच्या ठिकाणी येऊन अपराजिता व शमी पूजन करतात, देवीची आरती होते. बंदुकीच्या फैरी झाडून देवीला सलामी दिली जाते आणि त्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो. छत्रपती सर्व मानक:यांना सोने दिल्यानंतर मेबॅक कार मध्ये उभे राहतात आणि सर्व नगरवासियांना सोने देत जुना राजवाडय़ात दाखल होतात. येथे दस:याचा दरबार भरवला जातो. संस्थानच्या सर्व मानक:यांना सोने वाटले जाते. त्यानंतर पंचगंगा नदीतिरावर शिसागर या समाधी स्थळीही सोने दिले जाते.
अंबाबाईची पालखी मात्र नगरवासियांना भेट देत त्यांना दर्शऩ देत मंदिरात येते. सिद्धार्थ नगर, पंचगंगा नदी घाट, शुक्रवार पेठ, गंगावेश, गुजरी मार्गे रात्री पालखी मंदिरात दाखल होते. त्यानंतर पून्हा पालखी सोहळा होतो. अशा रितीने कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा संपन्न होतो.
 
म्हैसूर आणि ग्वाल्हेरनंतर कोल्हापूरचा शाही दसरा प्रसिद्ध आहे. या तीनही शहरांमध्ये देवीचा दसरा सोहळा आणि राजघराणो यांना एकाच धाग्यात गुंफण्यात आल्याने या सोहळ्य़ाला शाही दसरा असे संबोधले जाते. कोल्हापूरात करविर निवासिनी अंबाबाई, छत्रपती घराण्याची जुना राजवाडा येथील तुळजाभवानी, गुरू महाराज यांच्या पालख्या आणि छत्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत हा शाही दसरा सोहळा होतो. पूर्वी म्हणजे शके 18क्क् च्या शेवटच्या दशकात हा शाही सदरा सोहळा त्र्यंबोली टेकडीवर व्हायचा. मात्र नंतर ब्रिटिश रेसिडन्सी आणि कोल्हापूरचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून चौफाळ्य़ाचा माळ म्हणजे आताच्या दसरा चौकात शाही दसरा सोहळा होऊ लागला.
 
इंदुमती गणोश