शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई

By admin | Updated: April 5, 2017 01:18 IST

पुरंदर तालुक्यात मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे.

पुरंदर तालुक्यात मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. आज सुमारे १६ हजार लोकसंख्येला ९ शासकीय टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून आणखी ९ ग्रामपंचायतींचे टँकरची मागणीचे प्रस्ताव आल्याचे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी सांगितले. तालुक्यातील राख, वाल्हे, पिंपरी, एखतपूर, मुंजवडी साकुर्डे, जेजुरी ग्रामीण, बेलसर, दिवे या ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार या गावांना टँकर सुरू करण्यात आले आहेत. या गावातील ४ गावठाण आणि ४० वाड्यावस्त्यांवरील सुमारे १५,९२१ लोकसंख्येला ९ शासकीय टँकरने २८ फेऱ्यांद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. अजूनही सोनोरी, मावडी. क.प., बहिरवाडी, नावळी, घेरा पुरंदर, कुंभारवळण, भोसलेवाडी, कर्नलवाडी, राजुरी, निळूंज, सोमुर्डी नायगाव, टेकवडी, झेंडेवाडी या गावातील टँकरचे प्रस्ताव दाखल असून तालुक्यातील सुमारे २५ हजारांवर जास्त लोकसंख्येला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दररोज टँकरचे प्रस्ताव दाखल होत आहेत. याशिवाय उन्हाळा ही अत्यंत कडक असून तालुक्यातील केवळ सात जलाशयातच पाणी साठा शिल्लक आहे. इतरत्र गावोगावचे पाझर तलाव, लघु पाटबंधारे विभागाचे जलाशय कोरडे ठाणठणीत आहेत. गावोगावच्या पाणीपुरवठा योजनांचे जलस्रोतही आटलेले असल्याने ग्रामपंचायतींसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. गेल्यावर्षी पुरंदर तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पूर्व पुरंदरच्या पट्ट्यात आताच पिण्याच्या पाण्याची तीव्रटंचाई जाणवू लागली आहे, पश्चिम पट्ट्यातील सुमार पावसामुळे कऱ्हा नदीतून वाहिलेल्या पाण्यावर नाझरे जलाशयात केवळ ४० टक्केच (३८५ दशलक्ष घनफूट) पाणीसाठा होता. आज जलाशयात केवळ १३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. नाझरे जलाशयावरून सुमारे ५० गावांना पिण्याच्या पाण्याच्या प्रादेशिक योजना सुरू आहेत. या योजनांनाही दिवसाआड पाणी उचलण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. जलाशयावरून परिसरातून मागणी होऊनही उद्योग व्यवसायांना पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील चार महीने पाणी पुरवण्याचे नियोजन केले असेल तर उद्योगांचे पाणी बंद करावे लागणार आहे. त्याचबरोबर तालुक्यातील गराडे केवळ १.१० दशलक्ष घनफूट, पिलानवाडी जलाशयात १२.६८ दशलक्ष घनफूट, वीरनाला ३३.८४. दशलक्ष घनफूट, घोरवडी १९.८८ दशलक्ष घनफूट, पिंगोरी ११.४० दशलक्ष घनफूट, पिसर्वे ५.९८ दशलक्ष घनफूट असा पाणी साठा आहे. या जलाशयावरून परिसरातील पाणी योजनांना पिण्याचे पाण्याचे नियोजन करण्यात आले असले तरी ही काही गावांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या ही तक्रारी वाढू लागल्या आहेत.(वार्ताहर)कऱ्हा नदीलगतच्या काही गावांना आज जरी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत नसली तरी ही भविष्यात या ठिकाणी ही टँकर सुरू करावे लागणार आहेत. याशिवाय इतर गावांतूनही टँकरची मागणी वाढू लागली आहे. पुढील तीन ते चार महीने टँकरने पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे लागणार आहे.गेल्या १० वर्षांत यंदा तीव्र उन्हाळा आणि तीव्र पाणीटंचाई मार्च महिन्यातच जाणवू लागल्याने शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. स्वत:चा उदरनिर्वाह, पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्न ही दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. अनेक लहान शेतकऱ्यांनी चाऱ्याअभावी जनावरे विकण्यास सुरुवात केली आहे. जनावरांच्या चारा पाण्यासाठीही नियोजनाची गरज आहे. छावण्या सुरू कराव्या लागतील, अशीच परिस्थिती निर्माण झाली असून तसे प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू करावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.