शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दुसऱ्या क्रमांकाकरिता भाजपा, राष्ट्रवादीत चुरस

By admin | Updated: February 13, 2017 00:39 IST

शिवसेनेला सर्वप्रथम सत्ता ठाणे शहराने दिली असून, येथील पक्षाचे संघटनात्मक जाळे अन्य पक्षांपेक्षा मजबूत आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाडाव झाला, तर...

संदीप प्रधान / ठाणेशिवसेनेला सर्वप्रथम सत्ता ठाणे शहराने दिली असून, येथील पक्षाचे संघटनात्मक जाळे अन्य पक्षांपेक्षा मजबूत आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाडाव झाला, तर तो केवळ चमत्कार असेल. मात्र, नेतृत्व नरेंद्र मोदींचे असले, तरीही चमत्कार हे वरचेवर होत नसल्याने, येथे दुसऱ्या क्रमांकाकरिता भाजपाची राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर स्पर्धा आहे.ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागांमधील १३१ जागांकरिता ठाणेकर मतदान करणार असले, तरी सध्या निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याचे वातावरण शहरात कुठेही दिसत नाही. झेंडे लावण्यापासून प्रचारफेऱ्यांपर्यंत सर्वच प्रचारावर असलेली बंधने, नोटाबंदीचा फटका, चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे मतदारांमध्ये असलेला संभ्रम, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा उमेदवारांच्या पाठीमागे लागलेला ससेमिरा अशा नानाविध कारणांमुळे ही निवडणूक कधी झाली, तेच मतदारांना उमगणार नाही, असे चित्र आहे.ठाण्यातील शिवसेनेचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे असून, ‘मातोश्री’ने आपले सर्व लक्ष मुंबईतील जीवनमरणाच्या लढाईवर केंद्रित केले आहे. त्यामुळे ठाण्याचा गड राखण्याकरिता शिवसेनेची मदार शिंदे यांच्या खांद्यावर आहे. भाजपामध्ये सामूहिक नेतृत्व आहे. मात्र, मुख्य जबाबदारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व खा. कपिल पाटील यांच्यावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा जितेंद्र आव्हाड हेच आहेत. भाजपाची टक्कर शिवसेना आणि राष्ट्रवादीबरोबर असल्याने वेगवेगळ््या पक्षातील नामचीन गुंड गोळा करून, या पक्षाने आपल्या बेंडकुळ््या फुगवल्या आहेत. यामुळे संघ-भाजपाची जुनी मंडळी दुखावली आहेत. भाजपाच्या नाकाला शेंबूड लागलेला दिसत असताना, शिवसेनेने कसे २० ते २२ गुंड रिंगणात उतरवले आहेत, हे उच्चरवात सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न पक्षाने केला. अर्थात, सर्व पक्षातील सर्व गुंडांनी त्याचे वॉर्ड मनगटशाही व लक्ष्मीदर्शनाने बांधलेले असल्याने तेच पुन:पुन्हा निवडून येणार असल्यानेच भाजपासह सर्व पक्षांनी हा निलाजरा उद्योग केला आहे.ठाणे शहरातील सर्वात जटिल प्रश्न वाहतूककोंडीचा आहे. जुन्या ठाण्यातील अरुंद रस्ते ओलांडल्याखेरीज घोडबंदरपर्यंत विस्तारलेल्या ठाण्यातील टॉवर्सपर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे रस्त्यांवर कायम वाहतूककोंडी असते. जुन्या इमारती, पाणीटंचाई, कचरा विल्हेवाट वगैरे हे सर्व प्रश्न मुंबई इतकेच ठाण्यात डोकेदुखी ठरलेले आहेत.महापालिकेच्या एकूण जागा १३१ असल्या, तरीही कुठलाच पक्ष तेवढ्या जागांवर उमेदवार देऊ शकलेला नाही. शिवसेना ११९, भाजपा १२०, राष्ट्रवादी काँग्रेस ८५, काँग्रेस ५३ तर मनसे ९९ जागा लढवत असून, एकूण २५ छोटे-मोठे पक्ष रिंगणात असले, तरी लढती चौरंगी होणार आहेत. दोन्ही काँग्रेसने मुंब्रा परिसरातील १५ तर ठाण्यातील चार जागांवर मैत्रीपूर्ण लढत देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाने ठाणे महापालिकेतील शिवसेनेचा भ्रष्टाचार हा प्रचाराचा मुद्दा केला आहे, तर भाजपाने गुंडांना दिलेले अभय यावर शिवसेनेच्या प्रचाराचा भर आहे.मागील महापालिकेत शिवसेना ५६, भाजपा ८, राष्ट्रवादी काँग्रेस ३४, काँग्रेस १५, मनसे ७ आणि अपक्ष ७ असे चित्र होते. या वेळी शिवसेनेच्या जागा वाढून ६० ते ६२ पर्यंत जाऊ शकतात. मात्र, स्वबळावर सत्ता स्थापन करण्याकरिता ६६ जागांची मॅजिक फिगर गाठणे त्यांना शक्य होईल किंवा कसे याबाबत साशंकता आहे. भाजपाच्या जागांमध्ये वाढ होऊन हा पक्ष ३० ते ३२ जागांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसून त्यांचे संख्याबळ घटू शकते. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या कळवा-मुंब्रा पट्ट्यात आपली ताकद राखतील. अन्यत्र पक्षाला फटका बसेल, अशी शक्यता आहे. काँग्रेस आणि मनसे यांना जबर फटका बसण्याची चिन्हे आहेत.