शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

सांगली-साताऱ्याच्या जागेमुळे अडले आघाडीचे घोडे!

By admin | Updated: November 2, 2016 05:33 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस आहे

अतुल कुलकर्णी,

मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस आहे, तरीही अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादीचे जागावाटपाचे गणित सुटलेले नाही. काँग्रेसतर्फे माजी मंत्री पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम यांनी सांगली - साताऱ्यासाठी आपला हट्ट कायम ठेवला आहे तर राष्ट्रवादीने याच मतदारसंघात शेखर गोरे यांना अधिकृत उमेदवारी देऊ केली आहे.गोरे यांची उमेदवारी याआधीच माजी मंत्री व राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी स्वत:च सांगलीत जाहीर करून टाकली होती. त्यांचे आणि पतंगराव कदम यांचे आपापसांतील राजकीय युद्ध या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू झाले आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील सांगली-साताऱ्याच्या निमित्ताने दोन्ही काँग्रेसने प्रत्येकी तीन तीन जागा लढवाव्यात, असा मुद्दा उपस्थित केल्याने आघाडीवर निर्णय अद्याप लटकलेला आहे.उमेदवारी दाखल करण्यास एक दिवस बाकी असताना मंगळवारी राष्ट्रवादीने सांगली-साताऱ्यासाठी विद्यमान आमदार प्रभाकर घार्गे यांच्याऐवजी शेखर गोरे यांची तर पुण्यातून विद्यमान आ. अनिल भोसले आणि भंडारा-गोंदियाहून आ. राजेंद्र जैन यांची उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, सांगली सातारा जिल्हा परिषद आमच्याकडे आहे, सगळ्या नगरपालिका, आमदार, खासदार आमच्या पक्षाचे आहेत अशावेळी काँग्रेसने याच जागेसाठी हट्ट धरणे योग्य नाही. सांगली साताऱ्याची जागा राष्ट्रवादीतर्फेच लढवली जाईल, त्यात बदल होणार नाही. पक्षाने अधिकृत नावे जाहीर करण्याआधीच जयंत पाटील यांनी गोरे यांचे नाव जाहीर का केले? असे विचारले असता तटकरे म्हणाले, जयंत पाटीलदेखील आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांनी नाव जाहीर केले त्यात चूक काय?नांदेडसाठी काँग्रेसने विद्यमान आ. अमर राजूरकर यांचे नाव निश्चित केले आहे. मात्र यवतमाळ आणि जळगाव या जागा कोणी लढवायच्या याचा निर्णय अद्याप झालेला नाही. यवतमाळची जागा काँग्रेसला हवी आहे. तेथून राष्ट्रवादीचे विद्यमान आ. संदीप बाजोरिया यांना तिकीट न देता ती जागा काँग्रेसला द्यावी, असेही ठरवले जात आहे. मात्र त्यावर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने अजून बोलणी सुरू आहे, एवढेच उत्तर दिले. आम्हाला अजूनही आघाडी करण्याची इच्छा आहे आणि धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टळावे म्हणून आम्ही राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढण्यासाठी आशावादी आहोत, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. यवतमाळमधून बाजोरिया स्वत:च्या भावाला सर्वपक्षीय आघाडी करुन उभे करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. एकीकडे काँग्रेसला जागा सोडायची आणि दुसरीकडे त्यांच्याच विरोधात उमेदवार देऊन काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करायचा, असा डाव यामागे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे तर ५ नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. ११ नोव्हेंबरला या सहा जागांसाठी मतदान होणार आहे.