शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

सांगली-साताऱ्याच्या जागेमुळे अडले आघाडीचे घोडे!

By admin | Updated: November 2, 2016 05:33 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस आहे

अतुल कुलकर्णी,

मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस आहे, तरीही अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादीचे जागावाटपाचे गणित सुटलेले नाही. काँग्रेसतर्फे माजी मंत्री पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम यांनी सांगली - साताऱ्यासाठी आपला हट्ट कायम ठेवला आहे तर राष्ट्रवादीने याच मतदारसंघात शेखर गोरे यांना अधिकृत उमेदवारी देऊ केली आहे.गोरे यांची उमेदवारी याआधीच माजी मंत्री व राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी स्वत:च सांगलीत जाहीर करून टाकली होती. त्यांचे आणि पतंगराव कदम यांचे आपापसांतील राजकीय युद्ध या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू झाले आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील सांगली-साताऱ्याच्या निमित्ताने दोन्ही काँग्रेसने प्रत्येकी तीन तीन जागा लढवाव्यात, असा मुद्दा उपस्थित केल्याने आघाडीवर निर्णय अद्याप लटकलेला आहे.उमेदवारी दाखल करण्यास एक दिवस बाकी असताना मंगळवारी राष्ट्रवादीने सांगली-साताऱ्यासाठी विद्यमान आमदार प्रभाकर घार्गे यांच्याऐवजी शेखर गोरे यांची तर पुण्यातून विद्यमान आ. अनिल भोसले आणि भंडारा-गोंदियाहून आ. राजेंद्र जैन यांची उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, सांगली सातारा जिल्हा परिषद आमच्याकडे आहे, सगळ्या नगरपालिका, आमदार, खासदार आमच्या पक्षाचे आहेत अशावेळी काँग्रेसने याच जागेसाठी हट्ट धरणे योग्य नाही. सांगली साताऱ्याची जागा राष्ट्रवादीतर्फेच लढवली जाईल, त्यात बदल होणार नाही. पक्षाने अधिकृत नावे जाहीर करण्याआधीच जयंत पाटील यांनी गोरे यांचे नाव जाहीर का केले? असे विचारले असता तटकरे म्हणाले, जयंत पाटीलदेखील आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांनी नाव जाहीर केले त्यात चूक काय?नांदेडसाठी काँग्रेसने विद्यमान आ. अमर राजूरकर यांचे नाव निश्चित केले आहे. मात्र यवतमाळ आणि जळगाव या जागा कोणी लढवायच्या याचा निर्णय अद्याप झालेला नाही. यवतमाळची जागा काँग्रेसला हवी आहे. तेथून राष्ट्रवादीचे विद्यमान आ. संदीप बाजोरिया यांना तिकीट न देता ती जागा काँग्रेसला द्यावी, असेही ठरवले जात आहे. मात्र त्यावर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने अजून बोलणी सुरू आहे, एवढेच उत्तर दिले. आम्हाला अजूनही आघाडी करण्याची इच्छा आहे आणि धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टळावे म्हणून आम्ही राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढण्यासाठी आशावादी आहोत, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. यवतमाळमधून बाजोरिया स्वत:च्या भावाला सर्वपक्षीय आघाडी करुन उभे करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. एकीकडे काँग्रेसला जागा सोडायची आणि दुसरीकडे त्यांच्याच विरोधात उमेदवार देऊन काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करायचा, असा डाव यामागे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे तर ५ नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. ११ नोव्हेंबरला या सहा जागांसाठी मतदान होणार आहे.