शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बदलाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 04:46 IST

देशात अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी चांगले चालक महत्त्वाचे आहेत. त्याकरिता नवे दोन हजार ड्रायव्हिंग सेंटर सुरू केले जाणार असून, त्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

नवी मुंबई : देशात अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी चांगले चालक महत्त्वाचे आहेत. त्याकरिता नवे दोन हजार ड्रायव्हिंग सेंटर सुरू केले जाणार असून, त्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. देशभरातील वाहतूकदारांकरिता वाशी येथे आयोजित ‘प्रवास २०१७’ या कार्यक्रमप्रसंगी ते उपस्थित होते. या वेळी वाहन परमिटकरिता आरटीओमार्फत होणारी चाचणी रद्द केल्याचीही घोषणा त्यांनी केली.देशापुढे प्रदूषणाची गंभीर समस्या असून, अपघातांचे प्रमाण कमी करण्याचेही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यावर परिणामकारक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याने, यामध्ये काळाप्रमाणे सुधारणा करण्याची गरज केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. नवा मोटार अ‍ॅक्ट मंजूर झाल्यास, दळणवळण क्षेत्रातील हे बदल पाहायला मिळणार आहेत. अपघात टाळण्यासाठी मार्गांवर आवश्यक तिथे पूल, भुयारी मार्ग उभारण्यात आले आहेत. यानंतरही घडणाºया अपघातांना अप्रशिक्षित चालक कारणीभूत आहेत. देशात खासगी क्षेत्रात सुमारे २२ लाख चालकांची आवश्यकता आहे. चांगल्या प्रशिक्षित चालकांची ही कमतरता भरून काढण्यासाठी, २ हजार ड्रायव्हिंग सेंटर सुरू केले जाणार आहेत. या केंद्राद्वारे पूर्णपणे संगणकाद्वारे चालकाची चाचणी घेतली जाणार असून, अवघ्या तीन दिवसांत चालक परवाना मिळणार आहे. यामुळे आरटीओमधील भ्रष्टाचाराला आळा बसणार असून, चालकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी कामचलाऊ चालकांना घेण्याऐवजी प्रशिक्षित, शिस्तप्रिय चालकांना नोकरीवर ठेवल्यासही अपघात कमी होतील, असेही ते म्हणाले.प्रदूषण टाळण्यासाठी व इंधन वाचविण्यासाठी डिझेलऐवजी बायोगॅस, मिथेनवर चालणाºया बसला प्राधान्य दिले जाणार आहे. अशा बस बनविण्यासाठी देशातील कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी केले. त्याशिवाय इलेक्ट्रिक बस, कार, मोटारसायकल यांचाही वापर वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशातील कचरा बायोगॅस निर्मितीसाठी वापरल्यास, कचरा व इंधन दोन्हीचे प्रश्न मिटणार आहेत. येत्या काळात देशात १२ महामार्ग होणार असून, त्यामुळे दिल्लीतल्या वाहतूककोंडीचाही तिढा सुटणार आहे.वाहनांना बसवलेल्या स्पीड गव्हर्नन्समध्ये सुधार करून, वेगमर्यादा ८० ऐवजी १२० केली जाणार आहे. मात्र, त्याकरिता वाहने चांगल्या दर्जाची वापरावीत, असा सल्ला गडकरी यांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना दिला. चांगले रस्ते बनविल्यानेही काही जण नाराज होतात. काही अधिकारी व नेते यांनाही प्रतिवर्षी रस्त्यावर खड्डे हवे असतात. मात्र, त्यांचा विचार न करता, संपूर्ण रस्ते काँक्रीटचे करून मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न मिटवून आवश्यक तिथे चार किंवा सहा लेन केले जाणार आहेत. यामुळे दोन वर्षांत अांतरराष्टÑीय दर्जाचे मार्ग पाहायला मिळणार आहेत.कार्यक्रमाला पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राजस्थानचे मंत्री युनुस खान, स्वतंत्रदेव सिंह, प्रसन्ना पटवर्धन, आमदार मंदा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.जल, रेल्वे वाहतुकीला प्राधान्य देणारयेत्या काळात जल वाहतुकीला व रेल्वे वाहतुकीला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानुसार, मुंबईत ७५० क्रुझ दाखल होणार असून, नवे क्रुझ टर्मिनसदेखील तयार केले जाणार आहे. त्याशिवाय, महत्त्वाच्या अनेक शहरांमध्ये सीप्लेन सुविधा सुरू करण्याचाही आपला प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी सांगितले. त्याशिवाय मुंबईमधून रोरो सर्व्हिस सुरू केली जाणार असून, त्याद्वारे मुंबई ते नेरळ १४ मिनिटांत तर मुंबई ते मांडवा १८ मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे.महामार्गांलगत ७५० रोड साइट अ‍ॅमिनिटी सुरू केल्या जाणार आहेत. त्या ठिकाणी लांबच्या प्रवाशांना उद्यान, दुकाने व हॉटेल अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. याची निविदा लवकरच निघणार असून, त्यामध्ये ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी पुढाकार घेण्याचा सल्ला गडकरी यांनी दिला.त्याशिवाय सुरत, बडोदा व अहमदाबाद या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर बस पोर्ट केले जाणार असून, त्यानंतर देशभरात दोन हजार बस पोर्ट सुरू केले जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.