शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बदलाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 04:46 IST

देशात अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी चांगले चालक महत्त्वाचे आहेत. त्याकरिता नवे दोन हजार ड्रायव्हिंग सेंटर सुरू केले जाणार असून, त्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

नवी मुंबई : देशात अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी चांगले चालक महत्त्वाचे आहेत. त्याकरिता नवे दोन हजार ड्रायव्हिंग सेंटर सुरू केले जाणार असून, त्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. देशभरातील वाहतूकदारांकरिता वाशी येथे आयोजित ‘प्रवास २०१७’ या कार्यक्रमप्रसंगी ते उपस्थित होते. या वेळी वाहन परमिटकरिता आरटीओमार्फत होणारी चाचणी रद्द केल्याचीही घोषणा त्यांनी केली.देशापुढे प्रदूषणाची गंभीर समस्या असून, अपघातांचे प्रमाण कमी करण्याचेही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यावर परिणामकारक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याने, यामध्ये काळाप्रमाणे सुधारणा करण्याची गरज केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. नवा मोटार अ‍ॅक्ट मंजूर झाल्यास, दळणवळण क्षेत्रातील हे बदल पाहायला मिळणार आहेत. अपघात टाळण्यासाठी मार्गांवर आवश्यक तिथे पूल, भुयारी मार्ग उभारण्यात आले आहेत. यानंतरही घडणाºया अपघातांना अप्रशिक्षित चालक कारणीभूत आहेत. देशात खासगी क्षेत्रात सुमारे २२ लाख चालकांची आवश्यकता आहे. चांगल्या प्रशिक्षित चालकांची ही कमतरता भरून काढण्यासाठी, २ हजार ड्रायव्हिंग सेंटर सुरू केले जाणार आहेत. या केंद्राद्वारे पूर्णपणे संगणकाद्वारे चालकाची चाचणी घेतली जाणार असून, अवघ्या तीन दिवसांत चालक परवाना मिळणार आहे. यामुळे आरटीओमधील भ्रष्टाचाराला आळा बसणार असून, चालकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी कामचलाऊ चालकांना घेण्याऐवजी प्रशिक्षित, शिस्तप्रिय चालकांना नोकरीवर ठेवल्यासही अपघात कमी होतील, असेही ते म्हणाले.प्रदूषण टाळण्यासाठी व इंधन वाचविण्यासाठी डिझेलऐवजी बायोगॅस, मिथेनवर चालणाºया बसला प्राधान्य दिले जाणार आहे. अशा बस बनविण्यासाठी देशातील कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी केले. त्याशिवाय इलेक्ट्रिक बस, कार, मोटारसायकल यांचाही वापर वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशातील कचरा बायोगॅस निर्मितीसाठी वापरल्यास, कचरा व इंधन दोन्हीचे प्रश्न मिटणार आहेत. येत्या काळात देशात १२ महामार्ग होणार असून, त्यामुळे दिल्लीतल्या वाहतूककोंडीचाही तिढा सुटणार आहे.वाहनांना बसवलेल्या स्पीड गव्हर्नन्समध्ये सुधार करून, वेगमर्यादा ८० ऐवजी १२० केली जाणार आहे. मात्र, त्याकरिता वाहने चांगल्या दर्जाची वापरावीत, असा सल्ला गडकरी यांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना दिला. चांगले रस्ते बनविल्यानेही काही जण नाराज होतात. काही अधिकारी व नेते यांनाही प्रतिवर्षी रस्त्यावर खड्डे हवे असतात. मात्र, त्यांचा विचार न करता, संपूर्ण रस्ते काँक्रीटचे करून मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न मिटवून आवश्यक तिथे चार किंवा सहा लेन केले जाणार आहेत. यामुळे दोन वर्षांत अांतरराष्टÑीय दर्जाचे मार्ग पाहायला मिळणार आहेत.कार्यक्रमाला पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राजस्थानचे मंत्री युनुस खान, स्वतंत्रदेव सिंह, प्रसन्ना पटवर्धन, आमदार मंदा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.जल, रेल्वे वाहतुकीला प्राधान्य देणारयेत्या काळात जल वाहतुकीला व रेल्वे वाहतुकीला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानुसार, मुंबईत ७५० क्रुझ दाखल होणार असून, नवे क्रुझ टर्मिनसदेखील तयार केले जाणार आहे. त्याशिवाय, महत्त्वाच्या अनेक शहरांमध्ये सीप्लेन सुविधा सुरू करण्याचाही आपला प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी सांगितले. त्याशिवाय मुंबईमधून रोरो सर्व्हिस सुरू केली जाणार असून, त्याद्वारे मुंबई ते नेरळ १४ मिनिटांत तर मुंबई ते मांडवा १८ मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे.महामार्गांलगत ७५० रोड साइट अ‍ॅमिनिटी सुरू केल्या जाणार आहेत. त्या ठिकाणी लांबच्या प्रवाशांना उद्यान, दुकाने व हॉटेल अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. याची निविदा लवकरच निघणार असून, त्यामध्ये ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी पुढाकार घेण्याचा सल्ला गडकरी यांनी दिला.त्याशिवाय सुरत, बडोदा व अहमदाबाद या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर बस पोर्ट केले जाणार असून, त्यानंतर देशभरात दोन हजार बस पोर्ट सुरू केले जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.