शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बदलाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 04:46 IST

देशात अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी चांगले चालक महत्त्वाचे आहेत. त्याकरिता नवे दोन हजार ड्रायव्हिंग सेंटर सुरू केले जाणार असून, त्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

नवी मुंबई : देशात अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी चांगले चालक महत्त्वाचे आहेत. त्याकरिता नवे दोन हजार ड्रायव्हिंग सेंटर सुरू केले जाणार असून, त्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. देशभरातील वाहतूकदारांकरिता वाशी येथे आयोजित ‘प्रवास २०१७’ या कार्यक्रमप्रसंगी ते उपस्थित होते. या वेळी वाहन परमिटकरिता आरटीओमार्फत होणारी चाचणी रद्द केल्याचीही घोषणा त्यांनी केली.देशापुढे प्रदूषणाची गंभीर समस्या असून, अपघातांचे प्रमाण कमी करण्याचेही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यावर परिणामकारक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याने, यामध्ये काळाप्रमाणे सुधारणा करण्याची गरज केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. नवा मोटार अ‍ॅक्ट मंजूर झाल्यास, दळणवळण क्षेत्रातील हे बदल पाहायला मिळणार आहेत. अपघात टाळण्यासाठी मार्गांवर आवश्यक तिथे पूल, भुयारी मार्ग उभारण्यात आले आहेत. यानंतरही घडणाºया अपघातांना अप्रशिक्षित चालक कारणीभूत आहेत. देशात खासगी क्षेत्रात सुमारे २२ लाख चालकांची आवश्यकता आहे. चांगल्या प्रशिक्षित चालकांची ही कमतरता भरून काढण्यासाठी, २ हजार ड्रायव्हिंग सेंटर सुरू केले जाणार आहेत. या केंद्राद्वारे पूर्णपणे संगणकाद्वारे चालकाची चाचणी घेतली जाणार असून, अवघ्या तीन दिवसांत चालक परवाना मिळणार आहे. यामुळे आरटीओमधील भ्रष्टाचाराला आळा बसणार असून, चालकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी कामचलाऊ चालकांना घेण्याऐवजी प्रशिक्षित, शिस्तप्रिय चालकांना नोकरीवर ठेवल्यासही अपघात कमी होतील, असेही ते म्हणाले.प्रदूषण टाळण्यासाठी व इंधन वाचविण्यासाठी डिझेलऐवजी बायोगॅस, मिथेनवर चालणाºया बसला प्राधान्य दिले जाणार आहे. अशा बस बनविण्यासाठी देशातील कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी केले. त्याशिवाय इलेक्ट्रिक बस, कार, मोटारसायकल यांचाही वापर वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशातील कचरा बायोगॅस निर्मितीसाठी वापरल्यास, कचरा व इंधन दोन्हीचे प्रश्न मिटणार आहेत. येत्या काळात देशात १२ महामार्ग होणार असून, त्यामुळे दिल्लीतल्या वाहतूककोंडीचाही तिढा सुटणार आहे.वाहनांना बसवलेल्या स्पीड गव्हर्नन्समध्ये सुधार करून, वेगमर्यादा ८० ऐवजी १२० केली जाणार आहे. मात्र, त्याकरिता वाहने चांगल्या दर्जाची वापरावीत, असा सल्ला गडकरी यांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना दिला. चांगले रस्ते बनविल्यानेही काही जण नाराज होतात. काही अधिकारी व नेते यांनाही प्रतिवर्षी रस्त्यावर खड्डे हवे असतात. मात्र, त्यांचा विचार न करता, संपूर्ण रस्ते काँक्रीटचे करून मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न मिटवून आवश्यक तिथे चार किंवा सहा लेन केले जाणार आहेत. यामुळे दोन वर्षांत अांतरराष्टÑीय दर्जाचे मार्ग पाहायला मिळणार आहेत.कार्यक्रमाला पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राजस्थानचे मंत्री युनुस खान, स्वतंत्रदेव सिंह, प्रसन्ना पटवर्धन, आमदार मंदा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.जल, रेल्वे वाहतुकीला प्राधान्य देणारयेत्या काळात जल वाहतुकीला व रेल्वे वाहतुकीला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानुसार, मुंबईत ७५० क्रुझ दाखल होणार असून, नवे क्रुझ टर्मिनसदेखील तयार केले जाणार आहे. त्याशिवाय, महत्त्वाच्या अनेक शहरांमध्ये सीप्लेन सुविधा सुरू करण्याचाही आपला प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी सांगितले. त्याशिवाय मुंबईमधून रोरो सर्व्हिस सुरू केली जाणार असून, त्याद्वारे मुंबई ते नेरळ १४ मिनिटांत तर मुंबई ते मांडवा १८ मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे.महामार्गांलगत ७५० रोड साइट अ‍ॅमिनिटी सुरू केल्या जाणार आहेत. त्या ठिकाणी लांबच्या प्रवाशांना उद्यान, दुकाने व हॉटेल अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. याची निविदा लवकरच निघणार असून, त्यामध्ये ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी पुढाकार घेण्याचा सल्ला गडकरी यांनी दिला.त्याशिवाय सुरत, बडोदा व अहमदाबाद या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर बस पोर्ट केले जाणार असून, त्यानंतर देशभरात दोन हजार बस पोर्ट सुरू केले जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.