शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बदलाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 04:46 IST

देशात अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी चांगले चालक महत्त्वाचे आहेत. त्याकरिता नवे दोन हजार ड्रायव्हिंग सेंटर सुरू केले जाणार असून, त्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

नवी मुंबई : देशात अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी चांगले चालक महत्त्वाचे आहेत. त्याकरिता नवे दोन हजार ड्रायव्हिंग सेंटर सुरू केले जाणार असून, त्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. देशभरातील वाहतूकदारांकरिता वाशी येथे आयोजित ‘प्रवास २०१७’ या कार्यक्रमप्रसंगी ते उपस्थित होते. या वेळी वाहन परमिटकरिता आरटीओमार्फत होणारी चाचणी रद्द केल्याचीही घोषणा त्यांनी केली.देशापुढे प्रदूषणाची गंभीर समस्या असून, अपघातांचे प्रमाण कमी करण्याचेही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यावर परिणामकारक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याने, यामध्ये काळाप्रमाणे सुधारणा करण्याची गरज केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. नवा मोटार अ‍ॅक्ट मंजूर झाल्यास, दळणवळण क्षेत्रातील हे बदल पाहायला मिळणार आहेत. अपघात टाळण्यासाठी मार्गांवर आवश्यक तिथे पूल, भुयारी मार्ग उभारण्यात आले आहेत. यानंतरही घडणाºया अपघातांना अप्रशिक्षित चालक कारणीभूत आहेत. देशात खासगी क्षेत्रात सुमारे २२ लाख चालकांची आवश्यकता आहे. चांगल्या प्रशिक्षित चालकांची ही कमतरता भरून काढण्यासाठी, २ हजार ड्रायव्हिंग सेंटर सुरू केले जाणार आहेत. या केंद्राद्वारे पूर्णपणे संगणकाद्वारे चालकाची चाचणी घेतली जाणार असून, अवघ्या तीन दिवसांत चालक परवाना मिळणार आहे. यामुळे आरटीओमधील भ्रष्टाचाराला आळा बसणार असून, चालकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी कामचलाऊ चालकांना घेण्याऐवजी प्रशिक्षित, शिस्तप्रिय चालकांना नोकरीवर ठेवल्यासही अपघात कमी होतील, असेही ते म्हणाले.प्रदूषण टाळण्यासाठी व इंधन वाचविण्यासाठी डिझेलऐवजी बायोगॅस, मिथेनवर चालणाºया बसला प्राधान्य दिले जाणार आहे. अशा बस बनविण्यासाठी देशातील कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी केले. त्याशिवाय इलेक्ट्रिक बस, कार, मोटारसायकल यांचाही वापर वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशातील कचरा बायोगॅस निर्मितीसाठी वापरल्यास, कचरा व इंधन दोन्हीचे प्रश्न मिटणार आहेत. येत्या काळात देशात १२ महामार्ग होणार असून, त्यामुळे दिल्लीतल्या वाहतूककोंडीचाही तिढा सुटणार आहे.वाहनांना बसवलेल्या स्पीड गव्हर्नन्समध्ये सुधार करून, वेगमर्यादा ८० ऐवजी १२० केली जाणार आहे. मात्र, त्याकरिता वाहने चांगल्या दर्जाची वापरावीत, असा सल्ला गडकरी यांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना दिला. चांगले रस्ते बनविल्यानेही काही जण नाराज होतात. काही अधिकारी व नेते यांनाही प्रतिवर्षी रस्त्यावर खड्डे हवे असतात. मात्र, त्यांचा विचार न करता, संपूर्ण रस्ते काँक्रीटचे करून मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न मिटवून आवश्यक तिथे चार किंवा सहा लेन केले जाणार आहेत. यामुळे दोन वर्षांत अांतरराष्टÑीय दर्जाचे मार्ग पाहायला मिळणार आहेत.कार्यक्रमाला पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राजस्थानचे मंत्री युनुस खान, स्वतंत्रदेव सिंह, प्रसन्ना पटवर्धन, आमदार मंदा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.जल, रेल्वे वाहतुकीला प्राधान्य देणारयेत्या काळात जल वाहतुकीला व रेल्वे वाहतुकीला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानुसार, मुंबईत ७५० क्रुझ दाखल होणार असून, नवे क्रुझ टर्मिनसदेखील तयार केले जाणार आहे. त्याशिवाय, महत्त्वाच्या अनेक शहरांमध्ये सीप्लेन सुविधा सुरू करण्याचाही आपला प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी सांगितले. त्याशिवाय मुंबईमधून रोरो सर्व्हिस सुरू केली जाणार असून, त्याद्वारे मुंबई ते नेरळ १४ मिनिटांत तर मुंबई ते मांडवा १८ मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे.महामार्गांलगत ७५० रोड साइट अ‍ॅमिनिटी सुरू केल्या जाणार आहेत. त्या ठिकाणी लांबच्या प्रवाशांना उद्यान, दुकाने व हॉटेल अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. याची निविदा लवकरच निघणार असून, त्यामध्ये ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी पुढाकार घेण्याचा सल्ला गडकरी यांनी दिला.त्याशिवाय सुरत, बडोदा व अहमदाबाद या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर बस पोर्ट केले जाणार असून, त्यानंतर देशभरात दोन हजार बस पोर्ट सुरू केले जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.