शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट पुनरुज्जीवित करा

By admin | Updated: October 1, 2016 02:22 IST

चंद्रपूर येथील महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट लिमिटेड ही कंपनी पुनरुज्जीवित करण्याची मागणी लोकमत मीडिया एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी बुधवारी केंद्रीय पोलादमंत्री

नवी दिल्ली : चंद्रपूर येथील महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट लिमिटेड ही कंपनी पुनरुज्जीवित करण्याची मागणी लोकमत मीडिया एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी बुधवारी केंद्रीय पोलादमंत्री चौधरी वीरेंद्रसिंग यांची भेट घेऊन केली आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिस अहमद हे त्यांच्यासोबत होते.गडचिरोली जिल्ह्यालगत सुरजगड भागात विपुल प्रमाणात लोह खनिज उपलब्ध असल्यामुळे पोलाद मंत्रालयाने या भागातील पोलाद उद्योगाला प्रोत्साहन दिल्यास विकासाच्या दृष्टीने मागास असलेल्या विदर्भात नव्या औद्योगिक गुंतवणुकीत भर पडेल तसेच रोजगारालाही चालना मिळेल, असेही दर्डा यांनी सुचविले. चौधरी वीरेंद्रसिंग यांनी दर्डा यांच्या विनंतीवर सहानुभूतीने विचार करण्याचे आश्वासन दिले. त्याचवेळी मागणीच्या अभावामुळे सध्या पोलाद उद्योग वाईट अवस्थेतून जात असल्याची कबुलीही दिली. सर्व बँकांच्या थकीत कर्जात (एनपीए) पोलाद कंपन्यांचा वाटा २८ टक्के असल्याची माहितीही त्यांनी दिली. यापूर्वीच्या संपुआ सरकारने दिलेला हा वारसा असल्याचेही ते म्हणाले. आमचे सरकार विदर्भात पोलाद उद्योगाला पुनरुज्जीवित करतानाच प्रोत्साहन देणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क) जाधव न्यायाच्या प्रतीक्षेतश्रीकांत जाधव या प्रामाणिक आयपीएस अधिकाऱ्याचा हरियाणात छळ होत असल्याकडे या भेटीत लक्ष वेधण्यात आले. जाधव यांची सध्या कर्नाल पोलीस प्रशिक्षण शाळेत नियुक्ती करण्यात आली आहे. ते हरियाणात पोलीस अधीक्षक असताना जनता दरबार भरवून लोकांच्या पोलीस विभागासंबंधी तक्रारी ऐकून घेत आणि कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तडकाफडकी कारवाई करीत. मुख्यमंत्र्यांचा फोन कॉल आल्यानंतरही मादक द्रव्य अमली पदार्थ तस्करांना सोडत नसत, अशी माहिती अनिस अहमद यांनी दिली. जाटांच्या आरक्षण आंदोलनाच्या काळात जाधव यांनी जमावाला शांत ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली होती, मात्र त्यामुळे राजकारण्यांचा राग ओढवून घेतला गेला. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या.ते पत्नी आणि मुलांसह पळून गेल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. खरे तर जाधव हे अविवाहित आहेत. प्रथम त्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर कर्नालच्या प्रशिक्षण शाळेत दुय्यम दर्जाचे काम देण्यात आले. ते अद्यापही चौकशीतून निर्दोष मुक्त होण्याच्या प्रतीक्षेत आहेत, असेही अनिस अहमद यांनी सांगितले. खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते : चौधरी वीरेंद्रसिंग हे मूळचे काँग्रेसी नेते असून खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते आहेत. ते उँचा कलान मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तीन वेळा हरियाणात कॅबिनेट मंत्री होते. हिस्सार लोकसभा मतदारसंघातूनही ते तीन वेळा निवडून आले. २0१0 च्या राज्यसभा निवडणुकीत त्यांनी ओ.पी. चौटाला यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. आॅगस्ट २0१४ मध्ये त्यांनी काँग्रेससोबतचे ४२ वर्षांपासूनचे नाते तोडून भाजपामध्ये प्रवेश केला. नोव्हेंबर २0१४ मध्ये ते पंचायतराज, पेयजल आणि स्वच्छता मंत्री बनले होते. या वर्षी जूनमध्ये राज्यसभेवर पुन्हा निवडून आल्यानंतर ते पोलादमंत्री बनले. त्यांचे निवासस्थान नेहमीच गदीर्ने फुललेले असून आतमध्ये जाण्यासाठी गर्दीतूनच वाट काढावी लागते.