शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट पुनरुज्जीवित करा

By admin | Updated: October 1, 2016 02:22 IST

चंद्रपूर येथील महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट लिमिटेड ही कंपनी पुनरुज्जीवित करण्याची मागणी लोकमत मीडिया एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी बुधवारी केंद्रीय पोलादमंत्री

नवी दिल्ली : चंद्रपूर येथील महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट लिमिटेड ही कंपनी पुनरुज्जीवित करण्याची मागणी लोकमत मीडिया एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी बुधवारी केंद्रीय पोलादमंत्री चौधरी वीरेंद्रसिंग यांची भेट घेऊन केली आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिस अहमद हे त्यांच्यासोबत होते.गडचिरोली जिल्ह्यालगत सुरजगड भागात विपुल प्रमाणात लोह खनिज उपलब्ध असल्यामुळे पोलाद मंत्रालयाने या भागातील पोलाद उद्योगाला प्रोत्साहन दिल्यास विकासाच्या दृष्टीने मागास असलेल्या विदर्भात नव्या औद्योगिक गुंतवणुकीत भर पडेल तसेच रोजगारालाही चालना मिळेल, असेही दर्डा यांनी सुचविले. चौधरी वीरेंद्रसिंग यांनी दर्डा यांच्या विनंतीवर सहानुभूतीने विचार करण्याचे आश्वासन दिले. त्याचवेळी मागणीच्या अभावामुळे सध्या पोलाद उद्योग वाईट अवस्थेतून जात असल्याची कबुलीही दिली. सर्व बँकांच्या थकीत कर्जात (एनपीए) पोलाद कंपन्यांचा वाटा २८ टक्के असल्याची माहितीही त्यांनी दिली. यापूर्वीच्या संपुआ सरकारने दिलेला हा वारसा असल्याचेही ते म्हणाले. आमचे सरकार विदर्भात पोलाद उद्योगाला पुनरुज्जीवित करतानाच प्रोत्साहन देणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क) जाधव न्यायाच्या प्रतीक्षेतश्रीकांत जाधव या प्रामाणिक आयपीएस अधिकाऱ्याचा हरियाणात छळ होत असल्याकडे या भेटीत लक्ष वेधण्यात आले. जाधव यांची सध्या कर्नाल पोलीस प्रशिक्षण शाळेत नियुक्ती करण्यात आली आहे. ते हरियाणात पोलीस अधीक्षक असताना जनता दरबार भरवून लोकांच्या पोलीस विभागासंबंधी तक्रारी ऐकून घेत आणि कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तडकाफडकी कारवाई करीत. मुख्यमंत्र्यांचा फोन कॉल आल्यानंतरही मादक द्रव्य अमली पदार्थ तस्करांना सोडत नसत, अशी माहिती अनिस अहमद यांनी दिली. जाटांच्या आरक्षण आंदोलनाच्या काळात जाधव यांनी जमावाला शांत ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली होती, मात्र त्यामुळे राजकारण्यांचा राग ओढवून घेतला गेला. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या.ते पत्नी आणि मुलांसह पळून गेल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. खरे तर जाधव हे अविवाहित आहेत. प्रथम त्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर कर्नालच्या प्रशिक्षण शाळेत दुय्यम दर्जाचे काम देण्यात आले. ते अद्यापही चौकशीतून निर्दोष मुक्त होण्याच्या प्रतीक्षेत आहेत, असेही अनिस अहमद यांनी सांगितले. खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते : चौधरी वीरेंद्रसिंग हे मूळचे काँग्रेसी नेते असून खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते आहेत. ते उँचा कलान मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तीन वेळा हरियाणात कॅबिनेट मंत्री होते. हिस्सार लोकसभा मतदारसंघातूनही ते तीन वेळा निवडून आले. २0१0 च्या राज्यसभा निवडणुकीत त्यांनी ओ.पी. चौटाला यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. आॅगस्ट २0१४ मध्ये त्यांनी काँग्रेससोबतचे ४२ वर्षांपासूनचे नाते तोडून भाजपामध्ये प्रवेश केला. नोव्हेंबर २0१४ मध्ये ते पंचायतराज, पेयजल आणि स्वच्छता मंत्री बनले होते. या वर्षी जूनमध्ये राज्यसभेवर पुन्हा निवडून आल्यानंतर ते पोलादमंत्री बनले. त्यांचे निवासस्थान नेहमीच गदीर्ने फुललेले असून आतमध्ये जाण्यासाठी गर्दीतूनच वाट काढावी लागते.