शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

लबाडीने घेतलेला पगार परत करा!

By admin | Updated: January 20, 2016 03:26 IST

निवृत्तीचे वय ६२ वर्षे असूनही न्यायालयाची दिशाभूल करून मिळविलेल्या अंतरिम आदेशांच्या जोरावर ६५ वर्षांपर्यंत नोकरीत राहिलेल्या राज्यातील खासगी महाविद्यालयांच्या १० प्राचार्यांनी या

मुंबई : निवृत्तीचे वय ६२ वर्षे असूनही न्यायालयाची दिशाभूल करून मिळविलेल्या अंतरिम आदेशांच्या जोरावर ६५ वर्षांपर्यंत नोकरीत राहिलेल्या राज्यातील खासगी महाविद्यालयांच्या १० प्राचार्यांनी या वाढीव तीन वर्षांत लबाडीने कमावलेली पगाराची सर्व रक्कम तीन महिन्यांत राज्य सरकारला परत करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.हे प्राचार्य खोटेपणा करून निवृत्तीनंतरही तीन वर्षे नोकरीत राहिल्याने त्यांचा हा वाढीव सेवाकाळ पूर्णपणे बेकायदा आहे. त्यामुळे या काळात घेतलेले पगारासह अन्य कोणतेही लाभ ठेवून घेण्याचा त्यांना काहीही हक्क पोहोचत नाही. परिणामी त्यांनी लबाडीच्या वाढीव सेवाकाळात मिळालेले सर्व पैसे राज्य सरकारकडे जमा करावेत. अथवा त्यांच्या निवृत्तीनंतरच्या लाभांचा हिशेब करताना ही तीन वर्षांची रक्कम वळती करून घ्यावी. शिवाय पेन्शन व अन्य निवृत्तीलाभांसाठीही त्यांची ही सेवाची वाढीव तीन वर्षे जमेस धरली जाऊ नयेत,असेही न्यायालयाने स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर या प्रत्येक प्राचार्याने दाव्याच्या खर्चापोटी सरकारला प्रत्येकी १० हजार रुपये द्यावेत, असाही आदेश न्यायालयाने दिला.ज्या प्राचार्यांना न्यायालयानेहा दणका दिला आहे त्यांत किशोर रघुनाथ पवार, विश्वभर नागनाथ इंगोले, सुहास दिगंबरराव पेशवे, निर्मला अरुण वानखेडे, चंद्रकांत ज्ञानोबा घुमरे, रमेशचंद्र धोंडिबा खांडगे, शिवाजी अंबादास देवधे,सुभाष मधुसूदन कारंडे, क्रातीकुमार रंगराव पाटील आणि शिवपुत्र चंद्रमप्पा धुत्तरगाव यांचा समावेश आहे. या सर्वांनी उच्च न्यायालयाच्या मुंबई, नागपूर व औरंगाबाद खंडपीठाकडे वेळोवेळी याचिका केल्या होत्या. मुंबईत झालेल्या एकत्रित सुनावणीनंतर या सर्व याचिका फेटाळताना न्या. नरेश पाटील व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.प्राचार्यांचे निवृत्तीचे वय एरवी ६२ वर्षे आहे. परंतु योग्य उत्तराधिकारी वेळेवर मिळाला नाही तर, अपवादात्मक परिस्थितीत पदावरील प्राचार्याला वयाच्या ६५ वर्षांपर्यंत ठेवता येईल, असा नियम आहे. राज्य सरकारने ५ मार्च २०११रोजी असा आदेश काढला की, खासगी महाविद्यालयांनी त्यांच्या पदावरील प्राचार्यांना अशी मुदतवाढ देण्यापूर्वी किमान दोन वेळा त्या पदासाठी जाहिरात द्यावी. त्यानंतरही लायक उमेदवार मिळाला नाही तरच पदावरील प्राचार्यास मुदतवाढ देण्याचे प्रकरण कामगिरी आढावा समितीकडे पाठविले जावे. या प्राचार्यांनी यास आव्हान देणाऱ्या याचिका केल्या होत्या. सरकारी महाविद्यालयांना हा नियम लागल्याने त्यांचा मुख्य आव्हान मुद्दा पक्षपाताचा होता. परंतु याचिका प्रलंबित असताना सरकारने मूळ आदेशास शुद्धिपत्र काढून तो सरकारी महाविद्यालयांनाही लागू केला होता. त्यामुळे या मुद्द्यात खरे तर काही कायदेशीर दमही राहिला नव्हता. या सर्व याचिकांवर न्यायालयाच्या औरंगाबाद, नागपूर व मुंबई येथील खंडपीठांनी विविध वेळी अंतरिम आदेश दिले होते व हे सर्व याचिकाकर्ते प्राचार्य त्याचा फायदा घेऊन वयाची ६५ वर्षे पदावर कायम राहिले होते. अंतिम सुनावणीच्या वेळी खंडपीठाच्या असे निदर्शनास आले की, मुळात औरंगाबाद खंडपीठाच्या ज्या अंतरिम आदेशाचा हवाला देऊन नंतरच्या याचिकांमध्ये अंतरिम आदेश घेतले गेले त्यांत अर्जदारास वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत कायम ठेवावे, असे कुठेही म्हटले नव्हते. तरी न्यायालयाने दिलेल्या आदेशाविषयी खंडपीठांची दिशाभूल करून पुढील अंतरिम आदेश घेतले गेले.(विशेष प्रतिनिधी)