शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

आकाशवाणीच्या मराठी बातम्या बंद केल्याने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2016 20:21 IST

‘नमस्कार, आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे, सकाळचे सात वाजून दहा मिनिटे झाली आहेत’,अशी सुरुवात होऊन प्रादेशिक बातम्या ऐकणा-यांची आता निराशा होणार आहे. केंद्रीय माहिती

ऑनलाइन लोकमत
 
पुणे, दि. 10 -  ‘नमस्कार, आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे, सकाळचे सात वाजून दहा मिनिटे झाली आहेत’,अशी सुरुवात होऊन प्रादेशिक बातम्या ऐकणा-यांची आता निराशा होणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे मंगळवारी प्रसिध्द करण्यात आलेल्या अध्यादेशानुसार पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोट्यवधी लोकांच्या जिव्हाळयाचा विषय असलेल्या बातम्यांचा ‘आवाज’ बंद होणार असल्याने आकाशवाणीतील वृत्त निवेदकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी वृत्त निवेदकांकडून युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. खासदार अनिल शिरोळे यांच्याशी बोलणे झाल्यानंतर शिरोळे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वैैंकय्या नायडू यांना पत्र पाठवले आहे. तसेच, या निर्णयाबाबत टिवट करुन पुणेकरांनीही आपली मते नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
टीव्ही चॅनल, सोशल मिडीया आणि मोबाईलच्या जमान्यातही महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांची नाळ आकाशवाणीशी जोडली गेली आहे. सात वाजून दहा मिनिटांनी प्रसारित होणा-या बातम्या ऐकल्याशिवाय त्यांचा दिवस सुरु होत नाही. हे बातमीपत्र बंद करण्यााचा निर्णय चुकीचा आणि दुर्देवी असल्याचे वृत्त निवेदकांचे म्हणणे आहे. अध्यादेशानुसार पुणे केंद्रातील उपमुख्य संचालक पद कोलकाता तर वृत्त संपादक पद श्रीनगर केंद्रात हलवण्यात आले आहे. पुण्यातील वृत्तविभागामध्ये कोणतेही नवीन पद भरण्यात आलेले नाही, त्यामुळे वृत्तविभाग कोणाच्या भरवशावर चालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
वृत्त निवेदक स्वाती महाळंक म्हणाल्या, ‘पुणे आकाशवाणी केंद्राबाबत घेण्यात आलेला हा निर्णय एकतर्फी आहे. यामुळे हंगामी वृत्त निवेदकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहेच; परंतु, हा कोट्यवधी श्रोत्यांवर होणारा अन्याय आहे. पुणे आकाशवाणी केंद्रामध्ये अद्ययावत सोयीसुविधा, यंत्रणा उपलब्ध आहे. राज्यभरात मुंबईपाठोपाठ पुण्याची प्रसारणक्षमता सर्वाधिक आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला केंद्रांचे विलिनीकरण करायचे असेल तर औैरंगाबादमधील केंद्र पुण्यामध्ये विलीन करता आले असते. पुण्याहून प्रसारित होणा-या बातम्या दहा मिनिटांऐवजी पंधरा मिनिटांच्या करुन मराठवाड्यातील घडामोडींनाही न्याय देता आला असता. कॉस्ट कटिंगच्या नावाखाली चुकीचा निर्णय घेणा-या व्यक्तींना आकाशवाणीतील कामाचे महत्व, अनुभव याबाबत किती माहिती आहे, याबाबतही साशंकताच आहे. केंद्र सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी वैैयक्तिक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. याबाबत मी खासदार अनिल शिरोळे यांना भेटले. शिरोळे यांनी याबाबत वैंकय्या नायडूंना पत्र लिहिले असून याबाबत टिवटही केले आहे. पुणेकरांनी याबाबत मते नोंदवण्याचे आवाहनही केले आहे.
अविनाश पायगुडे म्हणाले, ‘पुण्याला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. केंद्र सरकारच्या अनेक महत्वाच्या संस्था पुण्यात आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा चार केंद्रांतून प्रादेशिक बातम्या देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. बातम्यांच्या माध्यमातून बारीकसारीक घटनांची नोंद लोकांपर्यंत पोचते. बातमीच्या तपशीलात लहानशी त्रुटी असेल तरी लोकांचे तातडीने फोन येतात. त्यांची आकाशवाणीशी अनेक वर्षांपासून घट्ट नाळ जुळलेली आहे. पुणे केंद्राला प्रत्यक्षात दोन पूर्ण वेळ वृत्त निवेदक देणे गरजेचे असताना सध्या एकच वृत्तनिवेदक आहे. आता, सध्या असलेली पदे काढून घेणे हा निव्वळ अविचारीपणा आहे. हंगामी वृत्त निवेदकांच्या रोजगारावरही या निर्णयामुळे गदा येणार आहे. त्यामुळे प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय मागे घेणे आवश्यक आहे.
सुधीर गाडगीळ म्हणाले, ‘पूर्वीच्या काळी टीव्हीचे पेव फुटलेले नसताता गावातील लोक चावडीवर बसून ७.१० च्या बातम्या भक्तीपूर्वक ऐकत असत. गावात वर्तमानपत्रही उशिरा येत असल्याने आजूबाजूच्या घडामोडींची माहिती मिळण्याचे आकाशवाणी हे एकमेव माध्यम होते. आता सर्व माध्यमांचा मारा होत असतानाही लोकांची आकाशवाणीवरील श्रध्दा यत्किंचितही कमी झालेली नाही. लोकांच्या जिव्हाळयाचा विषय असलेल्या ७ वाजून १० मिनिटांच्या बातम्या बंद झाल्यास कोट्यवधी लोकांना चुकल्याचुकल्यासारखे वाटेल. त्यामुळे, हा निर्णय मागे घेण्यात यावा, असे माझे मत आहे.
 
पुणे विभागामध्ये सध्या २ कायमस्वरुपी पदे आणि ३३ कॉन्ट्रॅक्टवरील पदे आहेत. त्यापैकी ८ बातमीदार तर इतर २५ कर्मचारी आहेत. २ कायमस्वरुपी पदापैकी वृत्तसंपादकांचे एक पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे, उर्वरित एक पद श्रीनगर येथे हलवण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यातील वृत्तविभागामध्ये प्रमुख जबाबदार पद राहिलेले नाही. आठ बातमीदार महिन्यातून केवळ सहा दिवस काम करत होते. त्यांचे एक दिवसाचे कॉन्ट्रॅकट महिन्यातून सहा वेळा केले जात होते, त्यांचे भवितव्यही आता अधांतरी आहे. 
 
यासंदर्भात आकाशवाणीच्या पुणे केंद्रातील वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आकाशवाणीहून सकाळी देण्यात येणा-या बातम्या या सर्वाधिक लोकप्रिय होत्या. एक कोटींपेक्षा अधिक लोक बातम्या ऐकत होते. केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशनुसार वृत्त विभागातील महत्वाची दोन पदे श्रीनगर आणि कोलकाता येथे हलवण्यात आली आहेत, तर नवीन कोणतेही पद येथे भरण्याची तरतूद नाही मग वृत्तविभागाचे काम चालणार कसे. बातम्यांच्या संदर्भातील निर्णय अद्याप झालेला नाही, परंतु वृत्त विभागच बंद झाला तर बातम्या देणार कुठून असा सवालही अधिका-याने केला.