शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पाणंद रस्ते उरले कागदावर

By admin | Updated: July 31, 2016 01:39 IST

नाणे मावळमध्ये पाणंद, तसेच गाव अंतर्गत रस्त्यांचे अस्तित्व फक्त कागदावर (नकाशा) उरले आहे.

करंजगाव : नाणे मावळमध्ये पाणंद, तसेच गाव अंतर्गत रस्त्यांचे अस्तित्व फक्त कागदावर (नकाशा) उरले आहे. हे रस्ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बहुतांश पाणंद, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात स्थानिक व्यक्ती अथवा शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी केले आहे. सह्याद्रीच्या कुशीत बसलेले व डोंगर, दर्या, निसर्गाचे मोठे देणे लाभलेल्या नाणे मावळामध्ये या भागात जांभवली, थोरण, शिरदे, पाले नामा, उकसान, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवाडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, कांबरे, कोंडीवडे, नाणे, नवीन उकसान, नाणोली, साई, वाउंड, कचरेवाडी, घोणशेत व इतर वाड्या-वस्त्या आहेत. मावळ तालुका पवन, आंदर आणि नाणे मावळ अशा तीन विभागांमध्ये विभागला आहे. तालुका विविध पर्यटनस्थळे, गडकिल्ले, धरणे, निसर्गरम्य डोंगर-दऱ्यांनी नटलेला आहे. पर्यटकांची मावळामध्ये रोज गर्दी असते. दु्रतगती महामार्गामुळे जवळ आलेली मुंबई, पुणे ही महानगरे, राष्ट्रीय महामार्ग, वाढते औद्योगिकीकरण आदीमुळे शहरीकरण वाढले आहे. खंडाळा लोणावळा, कामशेत, वडगाव, तळेगाव, सोमाटणे, देहुरोड आदी भागामध्ये शहरीकरण वाढल्यामुळे अनेकांनी खेडेगावाकडे मोर्चा वळविला. परिणामी ग्रामीण भागातील जमिनींनाही सोन्याचा भाव आला आहे. बांधकाम व्यावसायिक, व्यापारी आदींमध्ये मावळाचे आकर्षण वाढत आहे. त्यामुळे त्यांनी मावळामधे गुंतवणूक वाढवली. अनेकांनी जमिनी विकत घेऊन उद्योग-व्यवसाय, धरणाशेजारी रो हाऊस-बंगले बांधले. विकासाच्या या वाटचालीत गावोगावी असलेल्या जुन्या पाऊलवाटा, पाणंद, इतर रस्ते दिसेनासे होत आहेत. पाऊलवाटा, पांदण छोय्या अंतर्गत रस्त्यांचा उपयोग शेतकरी शेतऔजारे, बैल, जनावरे, शेतीपयोगी साहित्य ने-आण करण्यासाठी करीत असत. महिला पाणी भरण्यासाठी अथवा इतर कामासांठी त्यांचा वापर करीत असत. परंतु बांधकाम व्यावसायिकांनी खरेदी केलेल्या जमिनींमुळे जुन्या पाऊलवाटा सीमाभिंती कुंपणात बंदिस्त झाल्या. त्यामुळे विशेषत: शेतकऱ्यांची खूप गैरसोय होत आहे. त्यांना रस्ते बंद झाल्याने वळसा घेऊन शेताकडे जावे लागत आहे. कुंपणासाठी विनापरवाना वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे. त्यामुळे जंगलांचा ऱ्हास होत आहे. सिमेंटच्या वाढत्या जंगलांमुळे पशु-पक्षी जीवनावरही परिणाम होऊ लागला आहे. त्यांच्या स्वातंत्र्यवरच गदा आली आहे. सरकारी पाणंद रस्त्यावरदेखील बांधकाम व्यावसायिक व काही स्थानिकांनी संगनमताने अतिक्रमण केले आहे. २०-३० फूट रुंदीचे पाणंद, रस्ते आता फक्त नकाशावरच उरले आहेत. गावामध्ये काही जमीनदारांनी जमिनी खरेदी केल्या असून, सरकारची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता तेथे रस्ते तयार केले आहेत. अनेक ठिकाणी स्थानिकांच्या मदतीने पाणंद, रस्ते गिळंकृत केले आहेत. काही ठिकाणी अतिक्रमणामुळे चार-पाच फुटांचाच पाणंद रस्ता उरला आहे. अनेक पाणंद, रस्त्यांवर झाडे लावून अतिक्रमण केले आहे. शासनाने कागदोपत्री असलेल्या नोंदीप्रमाणे तत्काळ पाणंद,, तसेच गावांतर्गत रस्ते जाण्यासाठी खुले करावेत, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)>सिमेंटची जंगले : प्लॉटिंगचा व्यवसाय तेजीतअतिक्रमण करणारे हे जमीनदार किंवा बडी मंडळी असल्यामुळे तक्रार केली, तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे सहसा कोणी तक्रार करण्यास धजावत नाही. ग्रामीण भागात जमिनी खरेदी करून प्लॉटिंग करून विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. जागोजागी सिमेंटची जंगले उभी राहत असून कसलीही परवानगी न घेता स्थानिक व्यक्ती व त्या खात्यातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने डोंगरांचे उत्खनन करीत आहेत. उंच ठिकाणच्या बंगल्याच्या रस्त्यासाठी डोंगर, टेकडीचे उत्खनन होत आहे. ते करताना झाडांची कत्तल केली जाते. एजंटमार्फत शेतकरी जमिनी विकत आहेत. परंतु जमिनी न विकणाऱ्या शेतकऱ्यांना बांधकाम व्यावसायिक, विकसकाचा त्रास सहन करावा लागतो. एजंट जमिनी विकण्यास भाग पाडून स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत.