शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

जीवन प्राधिकरणच्या १५ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा

By admin | Updated: June 12, 2015 03:49 IST

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मान्यतेमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील १५ हजार कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

विलास गावंडे, यवतमाळमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मान्यतेमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील १५ हजार कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरविकास आणि ग्रामविकास विभागाने त्यांच्या हिश्श्याची रक्कम प्राधिकरणाला द्यावी आणि यासाठी प्राधिकरणाने पाठपुरावा करावा, असे सूचविण्यात आल्याने कर्मचाऱ्यांच्या आशा उंचावल्या आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांनी सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी निवेदन, आंदोलने केली; परंतु प्राधिकरणाने आर्थिक अडचण पुढे करत वेळकाढू धोरण अवलंबिले. अखेर या कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आर.एन. विठाळकर यांच्यासह ३० कर्मचाऱ्यांनी याचिका दाखल केली. कर्मचाऱ्यांनी ही लढाई जिंकली. प्राधिकरणाने कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचे २५० कोटी रुपये द्यावे, असा आदेश न्यायालयाने दिला. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या या आदेशानंतरही सरकारने अंमलबजावणी केली नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार थकबाकीचा विषय कॅबिनेटमध्ये ठेवण्यात आला होता. आता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात निर्णय दिला आहे. नगरविकास विभागाने त्यांच्या हिश्श्याचे १५८.१० कोटी आणि ग्रामविकास विभागाने त्यांच्या हिश्श्याचे ९१.९० कोटी प्राधिकरणाला देण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. तसे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांना ३ जूनच्या पत्रानुसार कळविले आहे. सदर दोन्ही विभागांकडून रक्कम उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा, असे सुचविण्यात आले आहे.