शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

येत्या वर्षापासून दप्तराचे ओझे कमी करणार

By admin | Updated: February 14, 2015 04:24 IST

शिक्षणमंत्र्यांनी शाळांमध्ये केलेल्या पाहणीमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे दप्तर त्यांच्या वजनापेक्षा अधिक असल्याचे पुन्हा समोर आले आहे.

मुंबई : शिक्षणमंत्र्यांनी शाळांमध्ये केलेल्या पाहणीमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे दप्तर त्यांच्या वजनापेक्षा अधिक असल्याचे पुन्हा समोर आले आहे. जून २0१६ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी झालेले असेल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी दिली.विलेपार्ले पूर्वेकडील पार्ले टिळक विद्यालय आणि महानगरपालिकेच्या दीक्षित प्राथमिक मराठी शाळेला त्यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांचे दप्तर वजनकाट्यावर वजन करून तपासले. या पाहणीत दप्तराचे वजन सरासरी ४ ते ६ किलो इतके असल्याचे आढळले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांचेही वजनकाट्यावर वजन करून पाहिले. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यास तज्ज्ञांची समिती गठीत केली आहे. दप्तराच्या ओझ्याविषयी आज केलेल्या पाहणीतील बाबी या समितीसमोर आपण मांडणार आहोत, असे तावडे यांनी या वेळी सांगितले.दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सर्व भाषा एकत्र आणि गणित, विज्ञान अशी विभागणी करता येईल का, शाळेत विविध विषयांच्या तासांचे जे वेळापत्रक आहे ते बदलता येऊ शकेल का, एकाच दिवशी विषयानुसार विभागणी करून जास्त वेळचे तास करता येतील का, पुस्तकांचे चाचणीनिहाय विभाजन, सर्व विषयांची तिमाही अभ्यासक्रमानुसार परीक्षा या बाबींचाही विचार करण्यात येईल, असेही ते या वेळी म्हणाले. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काय करता येईल, याबाबत तावडे यांनी विद्यार्थ्यांनाही प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनीही सूचना केल्या. तीन सत्रांत परीक्षेची तपासणी राज्यात तामिळनाडूच्या धर्तीवर तीन सत्रांत परीक्षा आणि त्यानुसार अभ्यासक्रम आखणी करणे शक्य आहे का, हेही तपासले जाईल, असेही तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)