शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

‘रत्नागिरी गॅस’चे जहाज बुडणार?

By admin | Updated: February 26, 2015 00:12 IST

खरेदी करारच रद्द : महागड्या वीज खरेदीला ‘महावितरण’चा नकार

संकेत गोयथळे - गुहागर  -- स्वस्त वीज बनवता येईल असा घरगुती गॅस पुरवला जात नाही म्हणून परदेशातून रिगॅसीफाईड नॅचरल गॅस (फछठॠ) घेतला; तर महागडी वीज महावितरण कंपनी घ्यायला तयार नाही, अशा स्थितीत राज्य सरकारने आरजीपीपीएलशी असलेला वीज खरेदी करारच रद्द केल्याने, एकेकाळी महाराष्ट्रावरील भारनियमनाचा अंधार दूर करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाचे भवितव्यच अंधारमय झाले आहे.दीड वर्षाहुन अधिक काळ गॅस अभावी प्रकल्प बंद ठेवण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने येथील कामगारवर्गही मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला. यातच गेले दोन महिने प्रकल्प पुन्हा कार्यान्वित होईल या दृष्टीने सकारात्मक हालचाल सुरु झाल्याने, रत्नागिरी गॅस प्रकल्पातून वीज निर्मिती सुरु होईल, अशी चर्चा रंगू लागली होती.काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय उर्जा व कोळसामंत्री पियुष गोयल, वित्तीय संस्था, एनपीसी गेल इंडिया, आरजीपीपीएल अधिकाऱ्यांशी या प्रकल्पाबाबत चर्चा केली. या प्रकल्पातून ५.५० रुपये दराने मिळणारी महागडी वीज परवडणारी नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. महाजनकोतर्फे ही वीज प्रती युनिट ३.३० रुपये दराने तसेच सरासरी चार रुपये दराने वीज खरेदी केली जात आहे.राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या महावितरण कंपनीने वीज खरेदी करार संपुष्टात आणण्याची भूमिका घेतली आहे. अन्य राज्यांना रत्नागिरी गॅस प्रकल्प वीज देऊ शकतो असे सांगितले असले, तरी प्रत्यक्ष ही बाब अंमलात आणणे कठीण आहे. महावितरणशिवाय अन्य ठिकाणी वीज वितरीत करायची झाल्यास, वेगळी वाहिनी टाकणे त्यासाठी जमिन संपादन व मोठे आर्थिक अंदाजपत्रक आवश्यक आहे. यानंतरही एखादे राज्य कायमस्वरुपी ही वीज खरेदी करेल, याची हमी नसल्याने अन्य राज्यांना वीज वितरीत करणे रत्नागिरी गॅस प्रकल्पाला शक्य नाही.काही दिवसांपूर्वीच दिल्लीमधील राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. केंद्रात भाजपची तर दिल्लीत आपची एकतर्फी सत्ता आहे. यातूनच दिल्लीकडे अद्यापपर्यंत पुरविला जाणारा गॅस रत्नागिरी गॅस प्रकल्पाच्या उर्जितावस्थेसाठी फिरवण्याचा धाडसी निर्णय केंद्र सरकार घेईल, याबाबत साशंकता आहे. रत्नागिरी गॅस प्रकल्प ही राष्ट्रीय गुंतवणूक आहे. महाराष्ट्रावरील भारनियमनाचे संकट दूर करण्यासाठी १ हजार ९०० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता असणारा हा वीज प्रकल्प केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे सुरु करण्यात आला. बुडीत गेलेला एन्रॉन प्रकल्प रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाने सुरु झाल्याने जगाचे याकडे लक्ष होते. या प्रकल्पाची सुरुवातही चांगली झाली. मात्र, त्यानंतर संकटाची मालिकाच प्रकल्पामागे सुरू झाली. अशा स्थितीत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीकडील गॅस पुरवठा काढून या प्रकल्पाला दिला जातो काय? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. तसे न झाल्यास एके काळी महाराष्ट्रावर आलेले भारनियमनाचे संकट दूर करण्यासाठी हजारो कोटी खर्च करुन सुरु करण्यात आलेल्या रत्नागिरी गॅस या प्रकल्पाचे भवितव्यच आता अंधारमय झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.ठोस भूमिकाच नाही !प्रकल्पामध्ये एनटीपीसी २८.५ गेल २८.५ स्वदेशी गुंतवणूक २८.५ व महावितरणचा १५ टक्के वाटा आहे. यापूर्वी गेल कंपनीकडून प्रकल्पाला होणारा गॅस पुरवठा, दिल्लीमध्ये होणारी वीज टंचाई लक्षात घेऊन दिल्लीकडे वळवण्यात आला होता. केंद्रीय मंत्री गोयल यांनी हा प्रकल्प सुरु करण्यासाठी सकारात्मक हालचाली सुरु केल्यानंतर गेल कंपनीनेही हा गॅस पुरवठा रत्नागिरी गॅस प्रकल्पाला व्हावा, यासाठी पत्रव्यवहार केला. मात्र, एक महिना उलटला तरी सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही.