शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका टोचणार रेल्वेचे कान

By admin | Updated: August 5, 2016 22:21 IST

गुरुवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी मुंबईची जीवनवाहिनी विस्कळीत झाली. अनेक भागांमध्ये रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यामुळे रेल्वे सेवेला ब्रेक लागला.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ५ : गुरुवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी मुंबईची जीवनवाहिनी विस्कळीत झाली. अनेक भागांमध्ये रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यामुळे रेल्वे सेवेला ब्रेक लागला. पावसाळ््यापूर्वी रेल्वे रुळालगतचे छोटे नाले साफ करण्यासाठी पालिकेने कोटयवधी रुपये दिले होते. मात्र त्यानंतरही दरवर्षी प्रमाणे यंदा हेच चित्र असल्याने पालिका आता रेल्वेचे कान टोचणार आहे.गुरुवारी रात्रीपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सकाळी मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते. पालिकेचे दावे फोल ठरवत सखल भाग पाण्याखाली गेला. मात्र पाणी साठल्याचा सर्वाधिक फटका रेल्वे वाहतुकीला बसला. विशेषत: मध्य रेल्वेची वाहतुकही काही तासांसाठी ठप्पच होती. सायन, कुर्ला, माटुंगा, सँडहर्स्ट रोड, मस्जिद बंदर येथील रेल्वे रुळ पाण्याखाली गेले होते.या प्रकरणाची पालिकेने गंभीर दखल घेतली आहे. शहरातील आपत्कालीन नियोजनाची जबाबदारी पालिकेकडे आहे. रेल्वेच्या हद्दीतील छोटे नाल्यांच्या साफसफाईसाठी पालिका रेल्वेला ठराविक रक्कम देत असते. मात्र वांरवार सुचना देवूनही रेल्वे हे छोटे नाले साफ केल्याचा भास निर्माण करते. प्रत्यक्षात पावसाळ््यात रेल्वेच्या साफसफाईची पोलखोल होत असल्याची नाराजी पालिकेच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.....................पालिका पाठवणार रेल्वे प्रशासनाला पत्र पालिका प्रशासन रेल्वे प्रशासनाला याप्रकरणी खरमरीत पत्र लिहणार आहे. पावसाळ््यात रेल्वे रुळावर साचलेल्या पाण्याची नोंद घेण्यात आली आहे. ही निरीक्षणे पत्राद्वारे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहेत. या वृत्ताला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.