शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रेबीजमुळे मृत्यू वाढले

By admin | Updated: May 20, 2016 01:26 IST

शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली

पुणे : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जानेवारीपासून आतापर्यंत ९ रुग्णांचा रेबीजने मृत्यू झाला आहे. इतक्या कमी कालावधीत होणारे मृत्यू धोकादायक असून, महापालिका या समस्येकडे कितपत गांभीर्याने पाहते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या ५० हजारांच्या घरात पोचली आहे. महापालिकेतर्फे यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असली तरीही ती पुरेशी नाही. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि महापालिकेत या कामासाठी असणारे अपुरे मनुष्यबळ यामुळे या समस्येवर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला अपयश येत असल्याचे दिसते. परिणामी चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच ५३१३ व्यक्तींना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. तर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मासिक आकडेवारीनुसार पुण्यात दर महिन्याला एक ते दीड हजार नागरिक भटक्या कुत्र्यांच्या दहशतीला बळी पडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. चालू वर्षी पुणे शहरात जानेवारी - ३, मार्च -४, एप्रिल - १ व चालू मे महिन्यात १ असे एकूण ९ रुग्णांचा रेबीजने मृत्यू झाला आहे. जानेवारीत १,७२८, फेब्रुवारीत १,९१७ नागरिकांना, तर मार्चमध्ये १,६६८ नागरिकांना कुत्री चावली आहेत. गेल्या काही वर्षांपासून शहरात भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा आलेख वाढला आहे. गेल्या वर्षभरात शहरात तब्बल १८,५६७ नागरिकांना कुत्र्यांच्या चाव्याचा सामना करावा लागला आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. यामध्ये प्रीव्हेन्शन आॅफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल्स अ‍ॅक्ट १९६०, अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल (डॉग) रुल्स २००१, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम (बीपीएससी अ‍ॅक्ट) ६४ नुसार रेबीज प्रतिबंधात्मक उपचार देणे, बीपीएमपी अ‍ॅक्ट ६६ (२४) नुसार रेबीज झालेल्या कुत्र्यांना ठार मारण्यात येते. तसेच पालिकेच्या कुत्रा बंदोबस्त विभागामार्फत शहरातील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांवर कारवाई केली जाते. त्यासाठी चारही झोनमध्ये महापालिकेच्या ४ गाड्या आहेत. प्रत्येक गाडीने दिवसाला २० कुत्री पकडली जातात. त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करून रेबीज प्रतिबंधात्मक लस देण्यात येते. त्यानंतर नियमानुसार पुन्हा पकडलेल्या ठिकाणीच सोडण्यात येते.पालिकेकडून अशापद्धतीने कुत्र्यांचे निर्बीजीकरण होत असले, तरी प्रत्यक्ष कुत्र्यांची संख्या म्हणावी तितकी कमी झालेली नाही. त्यामुळे कुत्र्यांचा चावा नागरिकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे दिसते. २०१२च्या एका अहवालानुसार, भारतात किमान २० हजार रेबीजची प्रकरणे समोर येतात तर, मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. >शहरातील भटक्या कुत्र्यांची ठोस आकडेवारी सांगता येत नसली तरी रस्त्यांवर ५० हजारांहून अधिक भटकी कुत्री असल्याचा अंदाज आहे. त्या तुलनेत कुत्र्यांच्या होणाऱ्या नसबंदी शस्त्रक्रियांची संख्या खूपच कमी असल्याचे दिसते. गेल्या वर्षभरात ११ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले आहे. ही निबीर्जीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर करण्याची आवश्यकता आहे. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे ते शक्य होत नसल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे.