शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीपासूनच करावा लागणार नीट, जेईईचा सराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 03:55 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रश्नपत्रिकांमध्ये केलेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांचा नीट, जेईईच्या सरावाला इयत्ता अकरावीपासूनच

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रश्नपत्रिकांमध्ये केलेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांचा नीट, जेईईच्या सरावाला इयत्ता अकरावीपासूनच सुरुवात होणार आहे. मंडळाने पहिल्यांदाच इयत्ता बारावीसह अकरावीचा आराखडा तयार करताना घटकनिहाय गुण निश्चित केले आहेत. तसेच प्रश्नांची काठीण्यपातळीही बारावीप्रमाणेच ठरविण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत अकरावीला फारसे महत्त्व न देणारे विद्यार्थी व शिक्षकांचाही कस लागणार आहे.राज्यातील विद्यार्थ्यांना नीट, जेईई या देशपातळीवरील प्रवेश परीक्षांना सामोरे जाता यावे, यासाठी राज्य मंडळाने इयत्ता अकरावी व बारावीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित व संख्याशास्त्र या चार विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदलला आहे. इयत्ता अकरावीसाठी सुरू शैक्षणिक वर्षापासून तर बारावीसाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून सुधारित आराखडा लागू होणार आहे. सुधारित आराखड्यामध्ये मंडळाने प्रश्नपत्रिकेची संपूर्ण रचना बदलली आहे. प्रश्नांची संख्या, त्यांचे गुण, घटकनिहाय प्रश्न, घटकनिहाय गुण, प्रश्नांना दिले जाणारे पर्याय यामध्ये कमी-अधिक प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. हा आराखडा अकरावी व बारावीसाठी सारखाच असणार आहे.चारही विषयांची काठीण्यपातळी जवळपास सारखीच ठेवण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांचे विषय ज्ञान, त्याची समज, सूत्र व संकल्पनांचा उपयोग करण्याची क्षमता या बाबी तपासल्या जाणार असून त्यासाठी गुण निश्चित करण्यात आले आहेत. यावर्षीपासून अकरावीला हा नवीन आराखडा लागू होणार आहे. प्रत्येक घटकाचा त्यानुसार विचार करावा लागणारआतापर्यंत केवळ बारावीसाठीच घटकनिहाय गुण निश्चित केले जात होते. सुधारित आराखड्यामध्ये अकरावीलाही हे गुण निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करताना प्राध्यापकांना प्रत्येक घटकाचा त्यानुसार विचार करावा लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही या घटकांचा अभ्यास करावा लागेल. त्यामुळे यापुढे कोणताही घटक बाजुला ठेवता येणार नाही. तसेच प्रश्नांची काठीण्यपातळीही जेईई व नीटप्रमाणे असेल. यामुळे अकरावीपासूनच विद्यार्थ्यांची नीट व जेईईची तयारी होण्यास सुरुवात होणार आहे.- पाठ्यपुस्तकातील कोणत्याही घटकांसाठी स्वतंत्र भाग दिला जाणार नाही. मात्र बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू), एका वाक्यात उत्तरे (व्हीएसए), थोडक्यात उत्तरे १ (एसए १) आणि थोडक्यात उत्तरे २ (एसए २) तर सविस्तर उत्तर (एलए) असे प्रश्ननिहाय चार भाग करण्यात आले आहे. यामध्ये कोणत्याही घटकातील प्रश्न कोणत्याही भागात असू शकतो. प्रत्येक भागासाठी गुणही निश्चित करण्यात आले आहेत. प्रश्नांना दिलेले जाणारे पर्याय कमी करण्यात आले असून एका प्रश्नाला केवळ एकच पर्यायी प्रश्न दिला जाईल.- आतापर्यंत प्रश्नपत्रिकेचे दोन भाग केले जात होते. भाग १ मध्ये ठराविक घटकांवरील प्रश्न व भाग २ मध्ये इतर घटकांवरील प्रश्न दिले जात होते. आता ही पद्धत बंद करण्यात आलेली आहे.राज्य मंडळाने अकरावी व बारावीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये केलेले बदल सकारात्मक आहेत. नीट व जेईईला सामोरे जाण्यासाठी हा आराखडा योग्य असून त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितपणे फायदा होईल. विशेषत: अकरावीसाठी प्रत्येक घटकनिहाय निश्चित करण्यात आलेले गुण महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्राध्यापकांना त्यानुसारच प्रश्नपत्रिका काढावी लागेल. पुर्वी अनेकदा काही घटक वगळले जात होते.- प्रा. किरण खाजेकर, अध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालयीन रसायनशास्त्र शिक्षक संघटना