शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

मराठवाड्याला फक्त ७ टीएमसी पाणी

By admin | Updated: March 24, 2015 01:20 IST

मराठवाड्याला हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळणार, या दिवास्वप्नात असलेल्या जनतेच्या पदरी घोर निराशा येणार आहे. कारण फक्त ७ टीएमसी पाणी उपलब्ध होणार

अतुल कुलकर्णी ल्ल मुंबईमराठवाड्याला हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळणार, या दिवास्वप्नात असलेल्या जनतेच्या पदरी घोर निराशा येणार आहे. कारण फक्त ७ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून, त्या अनुषंगानेच कामे हाती घेण्यात आल्याची माहिती विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून समोर आली आहे.कृष्णा खोऱ्याचा १० टक्के भूभाग मराठवाड्यात येतो. त्यानुसार कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाद्वारे उजनी जलाशयात येणाऱ्या ६६.२७ टीएमसी पाण्यापैकी २१ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय तात्कालिक मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी औरंगाबादेत झालेल्या बैठकीत २२ फेब्रुवारी रोजी घेतला होता. यातले १९ टीएमसी पाणी उस्मानाबादला आणि २ टीएमसी पाणी बीडला मिळणार होते. त्यानुसार २३ आॅगस्ट २००७ रोजी २३८२.५० कोटी रुपये खर्चाच्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. सिना कोळेगाव प्रकल्पातून मिळणारे पाण्याचे प्रमाण निश्चित झाले आणि एकूण २३.६६ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या सुधारित जल नियोजनास मान्यता देण्यात आली. त्यासाठी ४८४५.०५ कोटी रकमेसही मान्यता दिली गेली.मात्र पुन्हा एक गट सक्रिय झाला आणि ७ टीएमसी पाणी वापरासाठीचे काम २३४९.१० कोटीपर्यंत मर्यादित ठेवले गेले. दुसऱ्या टप्प्यात १६.६६ टीएमसी पाण्याची कामे हाती घेताना पुन्हा सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्याची अट टाकली गेली. यासाठी कृष्णा पाणी तंटा लवादाच्या निर्णयाचे कारण पुढे केले गेले आणि आता आंध्रातील गोदावरी खोऱ्यातील पोलावरम प्रकल्पाच्या अनुषंगाने कृष्णा खोऱ्यात उपलब्ध झालेल्या १४ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसी पाणी मराठवाड्याला दिले जाणार आहे. यासाठी आजवर ६२३.१७ कोटी रुपये खर्ची पडले आहेत. २०१४-१५ या वर्षात यासाठी १२५ कोटी निधी दिला गेला होता त्यापैकी ६४.०२ कोटी रुपये खर्च झाल्यावर या प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मान्यता नाही असे सांगून हे काम थांबवले गेले आहे. ही मान्यता महिन्या दीड महिन्यात मिळवू, प्र्रकाश जावडेकर हे या खात्याचे मंत्री आहेत असे सांगून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत मराठवाड्यातल्या आमदारांचे सोमवारी कोरडे सांत्वन केले.सिंचनविषयक विशेष चौकशी समितीच्या अहवालात नमूद केलेल्या १६ दोषयुक्त प्रकल्पांमध्ये कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीमार्फत तपासणी व फेररचना होण्यासाठी पाठविण्यात आलेल्या कामांच्या यादीत या प्रकल्पाचा समावेश आहे. शिवाय या प्रकल्पाची कामे आहे त्या स्थितीत संस्थगित ठेवण्यात आली असून, पर्यावरण विभागाची मान्यता मिळाल्याशिवाय कामे पुढे होणार नाहीत.