शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
3
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
4
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
5
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
6
अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
7
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
8
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
9
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
10
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
12
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
13
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
14
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
15
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
17
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
18
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
19
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
20
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी

कचरेवाला नाही, सफाईवाला म्हणा!

By admin | Updated: January 5, 2015 06:33 IST

आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यात सफाई कामगारांचे मोलाचे योगदान असते. कचरा उचलणाऱ्या व्यक्तींची समाजात अवहेलना केली जाते.

मुंबई : आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यात सफाई कामगारांचे मोलाचे योगदान असते. कचरा उचलणाऱ्या व्यक्तींची समाजात अवहेलना केली जाते. कचरेवाले आपण असून, ते साफसफाईचे काम करीत असल्याने त्यांना आपण सफाईवाला म्हटले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी रविवारी केले.भारतीय विज्ञान परिषदेत ‘स्वच्छ भारत’ या विषयावर झालेल्या परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात ओआरएफ संस्थेचे सुधींद्र कुलकर्णी, प्राचार्य उदय साळुंखे, विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस.बी. निमसे, पुणे येथील रुरल रिलेशन संस्थेचे प्रमुख प्रदीप लोखंडे, समग्र संस्थेचे स्वप्निल चतुर्वेदी, थ्रीएस अँड सारा या कंपनीचे मुख्य कार्यकारी राजीव खेर आदींनी स्वच्छ भारत याविषयी सध्या असलेल्या समस्या आणि त्यावरील उपायांचा वेध घेतला.देशात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असून, तो सोडविण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाची जोड देऊन तो अधिक गतीने सोडविता येईल. देशात सुरू झालेल्या स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने लोकांची मानसिकता बदलत असून, स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही मोठी स्वागतार्ह बाब असल्याचे माशेलकर या वेळी म्हणाले.महात्मा गांधी यांनी स्वच्छता आणि सत्यतेची संकल्पना देशातील जनतेत रुजवली. या संकल्पनेला आज पुन्हा एकदा बळकटी मिळाली असून, हा प्रश्न सोडविण्यासाठी लोकांची मानसिकताही तयार होत असल्याचेही त्यांनी सांगितले. ओआरएफचे सुधींद्र कुलकर्णी यांनी मुंबई, राज्यासह देशातील स्वच्छतेच्या अनेक प्रश्नांवर मत व्यक्त केले. मुंबईतील स्वच्छतागृहांची अवस्था, सफाई कामगारांचे प्रश्न याबाबतचे वास्तव त्यांनी परिषदेत मांडले. मुंबईत गटारांसह विविध ठिकाणी स्वच्छतेचे काम करणाऱ्या कामगारांपैकी महिन्यातून सुमारे २२, तर वर्षाला ३८५ जणांना आपला जीव गमवावा लागत असून, त्यांना पुरविण्यात येणाऱ्या अपुऱ्या सुविधांची माहितीही त्यांनी या वेळी दिली. (प्रतिनिधी)