शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

कचरेवाला नाही, सफाईवाला म्हणा!

By admin | Updated: January 5, 2015 06:33 IST

आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यात सफाई कामगारांचे मोलाचे योगदान असते. कचरा उचलणाऱ्या व्यक्तींची समाजात अवहेलना केली जाते.

मुंबई : आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यात सफाई कामगारांचे मोलाचे योगदान असते. कचरा उचलणाऱ्या व्यक्तींची समाजात अवहेलना केली जाते. कचरेवाले आपण असून, ते साफसफाईचे काम करीत असल्याने त्यांना आपण सफाईवाला म्हटले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी रविवारी केले.भारतीय विज्ञान परिषदेत ‘स्वच्छ भारत’ या विषयावर झालेल्या परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात ओआरएफ संस्थेचे सुधींद्र कुलकर्णी, प्राचार्य उदय साळुंखे, विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस.बी. निमसे, पुणे येथील रुरल रिलेशन संस्थेचे प्रमुख प्रदीप लोखंडे, समग्र संस्थेचे स्वप्निल चतुर्वेदी, थ्रीएस अँड सारा या कंपनीचे मुख्य कार्यकारी राजीव खेर आदींनी स्वच्छ भारत याविषयी सध्या असलेल्या समस्या आणि त्यावरील उपायांचा वेध घेतला.देशात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असून, तो सोडविण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाची जोड देऊन तो अधिक गतीने सोडविता येईल. देशात सुरू झालेल्या स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने लोकांची मानसिकता बदलत असून, स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही मोठी स्वागतार्ह बाब असल्याचे माशेलकर या वेळी म्हणाले.महात्मा गांधी यांनी स्वच्छता आणि सत्यतेची संकल्पना देशातील जनतेत रुजवली. या संकल्पनेला आज पुन्हा एकदा बळकटी मिळाली असून, हा प्रश्न सोडविण्यासाठी लोकांची मानसिकताही तयार होत असल्याचेही त्यांनी सांगितले. ओआरएफचे सुधींद्र कुलकर्णी यांनी मुंबई, राज्यासह देशातील स्वच्छतेच्या अनेक प्रश्नांवर मत व्यक्त केले. मुंबईतील स्वच्छतागृहांची अवस्था, सफाई कामगारांचे प्रश्न याबाबतचे वास्तव त्यांनी परिषदेत मांडले. मुंबईत गटारांसह विविध ठिकाणी स्वच्छतेचे काम करणाऱ्या कामगारांपैकी महिन्यातून सुमारे २२, तर वर्षाला ३८५ जणांना आपला जीव गमवावा लागत असून, त्यांना पुरविण्यात येणाऱ्या अपुऱ्या सुविधांची माहितीही त्यांनी या वेळी दिली. (प्रतिनिधी)