शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कचरेवाला नाही, सफाईवाला म्हणा!

By admin | Updated: January 5, 2015 06:33 IST

आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यात सफाई कामगारांचे मोलाचे योगदान असते. कचरा उचलणाऱ्या व्यक्तींची समाजात अवहेलना केली जाते.

मुंबई : आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यात सफाई कामगारांचे मोलाचे योगदान असते. कचरा उचलणाऱ्या व्यक्तींची समाजात अवहेलना केली जाते. कचरेवाले आपण असून, ते साफसफाईचे काम करीत असल्याने त्यांना आपण सफाईवाला म्हटले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी रविवारी केले.भारतीय विज्ञान परिषदेत ‘स्वच्छ भारत’ या विषयावर झालेल्या परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात ओआरएफ संस्थेचे सुधींद्र कुलकर्णी, प्राचार्य उदय साळुंखे, विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस.बी. निमसे, पुणे येथील रुरल रिलेशन संस्थेचे प्रमुख प्रदीप लोखंडे, समग्र संस्थेचे स्वप्निल चतुर्वेदी, थ्रीएस अँड सारा या कंपनीचे मुख्य कार्यकारी राजीव खेर आदींनी स्वच्छ भारत याविषयी सध्या असलेल्या समस्या आणि त्यावरील उपायांचा वेध घेतला.देशात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असून, तो सोडविण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाची जोड देऊन तो अधिक गतीने सोडविता येईल. देशात सुरू झालेल्या स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने लोकांची मानसिकता बदलत असून, स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही मोठी स्वागतार्ह बाब असल्याचे माशेलकर या वेळी म्हणाले.महात्मा गांधी यांनी स्वच्छता आणि सत्यतेची संकल्पना देशातील जनतेत रुजवली. या संकल्पनेला आज पुन्हा एकदा बळकटी मिळाली असून, हा प्रश्न सोडविण्यासाठी लोकांची मानसिकताही तयार होत असल्याचेही त्यांनी सांगितले. ओआरएफचे सुधींद्र कुलकर्णी यांनी मुंबई, राज्यासह देशातील स्वच्छतेच्या अनेक प्रश्नांवर मत व्यक्त केले. मुंबईतील स्वच्छतागृहांची अवस्था, सफाई कामगारांचे प्रश्न याबाबतचे वास्तव त्यांनी परिषदेत मांडले. मुंबईत गटारांसह विविध ठिकाणी स्वच्छतेचे काम करणाऱ्या कामगारांपैकी महिन्यातून सुमारे २२, तर वर्षाला ३८५ जणांना आपला जीव गमवावा लागत असून, त्यांना पुरविण्यात येणाऱ्या अपुऱ्या सुविधांची माहितीही त्यांनी या वेळी दिली. (प्रतिनिधी)