शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आनंद हवा, उन्माद नको

By admin | Updated: January 13, 2015 01:06 IST

मकरसंक्रांत उद्यावर येऊन ठेपली आहे. या दिवशी आपण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प करतो अन् आनंदाची देवाणघेवाण करतो. पण या सणाच्या नावाखाली पतंगबाजीचा

प्रशासनासह सामाजिक संघटनांच्या पुढाकाराची गरज नागपूर : मकरसंक्रांत उद्यावर येऊन ठेपली आहे. या दिवशी आपण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प करतो अन् आनंदाची देवाणघेवाण करतो. पण या सणाच्या नावाखाली पतंगबाजीचा जो उन्माद असतो त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आपल्या संस्कृतीचा आनंद साजरा करताना दुसऱ्याचा बळी घेणे किंवा जखमी करणे हे कुठेही सांगितलेले नाही. पण तरीही हे पतंगबाज रस्त्यांवर, घराच्या छतांवर अक्षरश: धुमाकूळ घालीत असतात. हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा. सामाजिक संघटनांच्या पुढाकाराची आणि प्रशासनाचीही तेवढीच गरज आहे.मकरसंक्रांतीचा सण हा नागपूर शहरातही मोठ्या प्रमाणावर पतंग उडवून साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाची खरेदी-विक्री केली जाते. नायलॉन मांजा हा नायलॉन धाग्यापासून तयार करण्यात येत असून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून अत्यंत मजबूत बनवला जातो. त्यामुळे नायलॉन मांजा सहसा तुटत नाही व काही वर्षे तसाच राहतो. या मांजाच्या वापरामुळे गंभीर स्वरुपाच्या जखमा होतात. अनेकांचे गळे चिरले जातात, नाक, कान व गालावर गंभीर जखमा होतात. रस्त्याने जात असलेल्या दुचाकी वाहनपालक नायलॉन मांजात अडकून गंभीर अपघाताला बळी पडतात. अशा प्रकारे नायलॉन मांजा नागरिकांच्या जीविताला व आरोग्याला धोका निर्माण करतो. तसेच नायलॉन मांजा झाडावर, विद्युत खांबावर, रस्त्यावर तसाच अडकून राहतो. त्यामुळे आरोग्यासह पर्यावरणासाठी सुद्धा तो धोकायदायक आहे.दोघांना गमवावा लागला होता जीव बेजबाबदार पतंगबाजामुळे गेल्या वर्षी दोन निर्दोष तरुणांचे बळी गेले होते. राहुल विश्वनाथ नागपुरे (वय २६) रा.सक्करदरा आणि दीपक नागोसे (वय २५) रा. जरीपटका अशी मृत तरुणींची नावे होती. हुडकेश्वरमधील भारतमाता नगरात राहणारा राहुल नागपुरे एमआयडीसीतील एका आॅईल कंपनीत कार्यरत होता. संक्रांतीनिमित्त राहुलच्या आई शकुंतलाबाई दर्शनासाठी सावनेरला गेल्या होत्या. बहीण माधुरीला ‘बाय’ करीत नेहमीप्रमाणे राहुल सकाळी १०.१५ च्या सुमारास दुचाकीने आशीर्वादनगरमधून निघाला. राहुलने हेल्मेट घातले होते. आशीर्वादनगरातील निशांत ट्रेडर्सजवळ अचानक धारदार मांजा राहुलच्या गळ्यावर आला. राहुलने हाताने मांजा दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकीकडे हवेतील पतंगीचा ताण आणि दुसरीकडून पतंगबाजाची ओढाताण सुरू असल्याने मांजाने ‘सुऱ्याचे’ काम केले. गळा चिरल्यामुळे राहुल दुचाकीवरून खाली पडला. ते पाहून परिसरातील नागरिक त्याच्या मदतीला धावले. त्यांनी राहुलला खासगी इस्पितळात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी राहुलला मृत घोषित केले. राहुल त्याच्या आई आणि बहिणीचा एकमात्र आधार होता. ध्यानीमनी नसताना आणि कोणताही दोष नसताना त्याचा अशा पद्धतीने बळी गेल्याने त्याची आई आणि बहिणीला जबर मानसिक धक्का बसला आहे. त्याचप्रकारे जरीपटक्यातील उदय लॉनजवळ राहणारा दीपक मिस्त्री (वय २५) दुपारी २.३० च्या सुमारास घराच्या गच्चीवर चढला. पतंगीच्या नादात त्याला भानच उरले नाही आणि तो इमारतीवरून सरळ खाली पडला. आजूबाजूच्यांनी त्याला लगेच मेयोत नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. यासोबतच अनेक जणांचे गाल, कान मांजामुळे चिरल्या गेले होतकायमस्वरूपी तोडगा निघावा; व्यापाऱ्यांची भूमिका नायलॉन मांजाबाबत काही वर्षांपासून वाद सुरू आहे. संक्रांत आली की नायलॉन मांजावर बंदी घातली जाते. नायलॉन मांजा घातक आहे बी बाब मान्य आहे. परंतु त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. त्याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. नायलॉन मांजावर बंदी घालायची असेल तर सरसकट बंदी घालण्यात यावी. केवळ सणापुरती नको. बंदीचा निर्णय सर्वांचा विचार करून करण्यात यावा, केवळ व्यापाऱ्यांना टारगेट करण्यात येऊ नये, अशी भूमिका जुनी शुक्रवारी येथील ठोक मांजा विक्रेते राकेश शाहू यांनी मांडली. नायलॉन मांजाबाबत दरवर्षी वाद होण्याऐवजी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, परंतु त्यासंबंधात काही निर्णय घेण्यापूर्वी विक्रेत्यांची भूमिका सुद्धा समजून घ्यावी, असेही येथील जवळपास सर्वच विक्रेत्यांनी सांगितले. मांजा घातक असला तरी पतंगबाजीचा उन्माद हा अधिक घातक आहे, त्यावर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचेही या विक्रेत्यांनी स्पष्ट केले. लोकमतची भूमिका मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंगबाजीच्या नावावर जो उन्माद उपराजधानीत होतो तो चीड आणणारा आहे. या पतंगबाजीमुळे ज्यांचा बळी जातो किंवा जे जखमी होतात, त्यांचे नुकसान कोणीही भरून काढू शकणार नाही. आमचा पतंग उडविण्याला विरोध नाही. पतंग उडवीत असताना नायलॉनचा मांजा, काचेचा चुरा वापरणे, ‘डीजे’चा धुमाकूळ या गोष्टींना आमचा विरोध आहे. ‘लोकमत’ची हीच भूमिका आहे. हा उन्माद असणाऱ्यांना आमचा विरोध आहे आणि ही विकृती थांबविण्यासाठी सामाजिक संघटना व नागरिकांनी समोर येऊन पुढाकार घेण्याची गरज आहे.