शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

पर्यायी विषयांची आवश्यकता नाही

By admin | Updated: September 20, 2016 01:27 IST

राज्यातील दहावीच्या इंग्रजी आणि गणित विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

पुणे : राज्यातील दहावीच्या इंग्रजी आणि गणित विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यातच एकाही विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवर नापास शेरा येणार नसल्याचे राज्य शासनाने अध्यादेश काढून प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित व इंग्रजी विषयासाठी पर्याय देण्याची खरंच गरज आहे का? तसेच विद्यार्थ्यांना केवळ पास करायचे आहे, की घडवायचे आहेत, असा प्रश्न तज्ज्ञांंकडून उपस्थित केला जात आहे. राज्य मंडळाच्या निकालाची टक्केवारी गेल्या काही वर्षांपासून वाढत चालली आहे. विद्यार्थ्यांना ८०/२० पॅटर्नमुळे गुणांची खिरापत वाटली जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने जुलै महिन्यातच पुरवणी परीक्षा घेतली जात आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी वाढविण्यासाठी हे निर्णय घेतले जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यामुळे गुणवत्तावाढीकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. दहावीमध्ये गणित विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०१३ नंतर दुपटीने कमी झाली आहे. मार्च २०१६ च्या परीक्षेत १५ लाख ९९ हजार २३२ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ८७ हजार १७० विद्यार्थी गणित विषयात नापास झाले. तर इंग्रजी विषयाची परीक्षा दिलेल्या १४ लाख ३८ हजार ९०६ विद्यार्थ्यांपैकी १ लाख १९ हजार २२३ विद्यार्थी नापास झाले. त्यातील काही विद्यार्थ्यांनी जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेत नापास झालेल्या विषयांची परीक्षा दिली. त्यामुळे या दोन विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, असे म्हणता येणार नाही. विद्यार्थ्यांना दहावीपासूनच पर्यायी विषय निवडण्याची संधी दिली तर नापास होण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थी गणित व इंग्रजी विषय घेणार नाहीत. दहावीमध्ये विद्यार्थी सर्व विषयांत परिपक्व होतातच असे नाही. पुढील काळात विद्यार्थ्यांची विज्ञान, वाणिज्य आदी शाखेतील प्रवेशाची दारे बंद होतील. त्यामुळे पर्यायी विषय देण्याचा निर्णय घेऊ नये, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)>गेल्या पाच वर्षात इंग्रजी विषयात ६९ लाख ९५ हजार १११ विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ८१ हजार ८८८ विद्यार्थी नापास झाले, तर गणित विषयाच्या ७७ लाख ४३ हजार ४१२ पैकी २ हजार १६0 विद्यार्थी नापास झाले. >आपल्याला विद्यार्थी घडवायचे आहेत की केवळ पास करायचे आहेत. यापूर्वीही पर्यायी विषय देण्याचे निर्णय घेतल्यामुळे जुन्या पिढ्यांचे नुकसान झाले होते. विद्यार्थ्यांना सामान्य गणित हा विषय देण्यात आला आहे. या विषयांना पर्याय दिल्याने शिक्षणाच्या हेतूला छेद दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना परिपक्व करण्यासाठी गणित व इंग्रजी विषयांना पर्याय देता येणार नाही. या निर्णयामुळे पुन्हा एकदा अनेक पिढ्या बरबाद होतील.- उज्ज्वलादेवी पाटील, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ