शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशामक केंद्राला नाही मुहूर्त

By admin | Updated: November 2, 2016 01:25 IST

चिखली, कुदळवाडी भागात भंगार मालाची गोदामे अनेक आहेत. सातत्याने या परिसरात छोट्या-मोठ्या आगीच्या घटना घडतात.

पिंपरी : चिखली, कुदळवाडी भागात भंगार मालाची गोदामे अनेक आहेत. सातत्याने या परिसरात छोट्या-मोठ्या आगीच्या घटना घडतात. या परिसरात लोकवस्तीही वाढली आहे. त्यामुळे या भागात अग्निशामक विभागाचे स्वतंत्र केंद्र होण्यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या मुख्य केंद्राकडून पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाची दखल घेऊन केवळ इमरतीची पायाभरणी केली. त्यानंतर मात्र पुढील काम होऊ शकले नाही. या भागात अत्यंत गरज असूनही पाच वर्षांपासून चिखलीतील अग्निशामक केंद्राचा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही.अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिखलीतील पेठ क्रमांक १८मध्ये अग्निशामक विभागाचे केंद्र उभारण्याची मागणी केली. चिखलीसह एमआयडीसीतही असे केंद्र उभारण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे पाठवला आहे. चिखलीतील प्रकल्पासाठी निदान कुदळ तरी लावली गेली. एमआयडीसीतील एच २ ब्लॉकमध्ये अग्निशामक केंद्राच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत प्रशासकीय पातळीवर काहीच हालचाली झाल्या नाहीत. आगीची दुर्घटना घडल्यानंतर थोडे दिवस चर्चा होते. चिखली व एमआयडीसीतील अग्निशामक केंद्राच्या प्रकल्प उभारणीबाबत प्रशासनातील अधिकारी, तसेच लोकप्रतिनिधींमध्ये उदासीनता दिसून येत आहे. महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडे असलेले मनुष्यबळसुद्धा अपुरे आहे. सद्य:स्थितीत १४५ कर्मचारीवर्ग या विभागाकडे उपलब्ध आहे. अग्निशामक विभागाच्या ताफ्यात केवळ १२ गाड्या आहेत. वाहनांची संख्या वाढवली, तर त्या तुलनेत वाहनचालकांची संख्या वाढणे अपेक्षित आहे. ७ ते ८ लाख लोकसंख्या होती, त्या वेळी अग्निशामककडे जेवढे मनुष्यबळ होते, तेवढेच आताही आहे. (प्रतिनिधी)>चिखली परिसरात वारंवार आगीच्या घटना घडू लागल्याने तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी गतवर्षी याची गंभीर दखल घेऊन उपाययोजनांचे पाऊल उचलले. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कुदळवाडी, चिखली परिसरातील भंगार मालाच्या व अन्य गोदामांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. सर्वेक्षणानंतर अहवाल अग्निशामक विभागाकडे देणे अपेक्षित होते. परंतु, अद्यापही अग्निशामक विभागाला चिखली परिसराचा सर्वेक्षण अहवाल मिळालेला नाही. सर्वेक्षण झाले का नाही? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पाच वर्षांपासून अग्निशामक विभागाचे अधिकारी चिखली आणि एमआयडीसीतील अग्निशामक केंद्र उभारणीसाठी पाठपुरावा करत आहेत.>उदासीनता : रखडला आरक्षणांचा विकासउदासीनतेमुळे आरक्षणांचा विकास रखडला आहे. आरक्षणे ताब्यात नाहीत, विकास कामे करता येत नाहीत. अशी सबब पुढे करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आरक्षणे ताब्यात असताना, अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत असतानाही विकास करता आलेला नाही. हे चिखलीतील अग्निशामक केंद्राच्या रखडलेल्या प्रकल्पामुळे निदर्शनास आले आहे. आरक्षणाची जागा ताब्यात आहे. काही अधिकाऱ्यांचा प्रतिसाद मिळतो आहे, तरी केवळ उदासीनतेमुळे या प्रकल्पांना मुहूर्त मिळालेला नाही. विकासकामे रखडल्याचे खापर अधिकाऱ्यांवर फोडणाऱ्या लोकप्रतिनिधींनी अशा अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा नागरी विकासावर होत आहे.