शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशामक केंद्राला नाही मुहूर्त

By admin | Updated: November 2, 2016 01:25 IST

चिखली, कुदळवाडी भागात भंगार मालाची गोदामे अनेक आहेत. सातत्याने या परिसरात छोट्या-मोठ्या आगीच्या घटना घडतात.

पिंपरी : चिखली, कुदळवाडी भागात भंगार मालाची गोदामे अनेक आहेत. सातत्याने या परिसरात छोट्या-मोठ्या आगीच्या घटना घडतात. या परिसरात लोकवस्तीही वाढली आहे. त्यामुळे या भागात अग्निशामक विभागाचे स्वतंत्र केंद्र होण्यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या मुख्य केंद्राकडून पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाची दखल घेऊन केवळ इमरतीची पायाभरणी केली. त्यानंतर मात्र पुढील काम होऊ शकले नाही. या भागात अत्यंत गरज असूनही पाच वर्षांपासून चिखलीतील अग्निशामक केंद्राचा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही.अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिखलीतील पेठ क्रमांक १८मध्ये अग्निशामक विभागाचे केंद्र उभारण्याची मागणी केली. चिखलीसह एमआयडीसीतही असे केंद्र उभारण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे पाठवला आहे. चिखलीतील प्रकल्पासाठी निदान कुदळ तरी लावली गेली. एमआयडीसीतील एच २ ब्लॉकमध्ये अग्निशामक केंद्राच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत प्रशासकीय पातळीवर काहीच हालचाली झाल्या नाहीत. आगीची दुर्घटना घडल्यानंतर थोडे दिवस चर्चा होते. चिखली व एमआयडीसीतील अग्निशामक केंद्राच्या प्रकल्प उभारणीबाबत प्रशासनातील अधिकारी, तसेच लोकप्रतिनिधींमध्ये उदासीनता दिसून येत आहे. महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडे असलेले मनुष्यबळसुद्धा अपुरे आहे. सद्य:स्थितीत १४५ कर्मचारीवर्ग या विभागाकडे उपलब्ध आहे. अग्निशामक विभागाच्या ताफ्यात केवळ १२ गाड्या आहेत. वाहनांची संख्या वाढवली, तर त्या तुलनेत वाहनचालकांची संख्या वाढणे अपेक्षित आहे. ७ ते ८ लाख लोकसंख्या होती, त्या वेळी अग्निशामककडे जेवढे मनुष्यबळ होते, तेवढेच आताही आहे. (प्रतिनिधी)>चिखली परिसरात वारंवार आगीच्या घटना घडू लागल्याने तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी गतवर्षी याची गंभीर दखल घेऊन उपाययोजनांचे पाऊल उचलले. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कुदळवाडी, चिखली परिसरातील भंगार मालाच्या व अन्य गोदामांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. सर्वेक्षणानंतर अहवाल अग्निशामक विभागाकडे देणे अपेक्षित होते. परंतु, अद्यापही अग्निशामक विभागाला चिखली परिसराचा सर्वेक्षण अहवाल मिळालेला नाही. सर्वेक्षण झाले का नाही? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पाच वर्षांपासून अग्निशामक विभागाचे अधिकारी चिखली आणि एमआयडीसीतील अग्निशामक केंद्र उभारणीसाठी पाठपुरावा करत आहेत.>उदासीनता : रखडला आरक्षणांचा विकासउदासीनतेमुळे आरक्षणांचा विकास रखडला आहे. आरक्षणे ताब्यात नाहीत, विकास कामे करता येत नाहीत. अशी सबब पुढे करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आरक्षणे ताब्यात असताना, अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत असतानाही विकास करता आलेला नाही. हे चिखलीतील अग्निशामक केंद्राच्या रखडलेल्या प्रकल्पामुळे निदर्शनास आले आहे. आरक्षणाची जागा ताब्यात आहे. काही अधिकाऱ्यांचा प्रतिसाद मिळतो आहे, तरी केवळ उदासीनतेमुळे या प्रकल्पांना मुहूर्त मिळालेला नाही. विकासकामे रखडल्याचे खापर अधिकाऱ्यांवर फोडणाऱ्या लोकप्रतिनिधींनी अशा अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा नागरी विकासावर होत आहे.