शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

इंजिनिरिंग कॉलेजच्या मानगुटीवर नॅकचे भूत

By admin | Updated: May 12, 2014 23:22 IST

महाविद्यालयांची संख्या घटण्याची शक्यता

वाशिम- विद्यापीठ अनुदान आयोगाने कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांच्या धर्तीवर आता अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण देणार्‍या महाविद्यालयाच्या मानगूटीवर नॅकचे भूत बसविले आहे. परिणामी महाविद्यालयांची संख्या घटण्याची शक्यता वाढली असुन संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) फेब्रुवारी २0१४ मध्ये तांत्रिक शिक्षण देणार्‍या सर्व महाविद्यालयांना संलग्नित विद्यापीठाकडून किंवा युजीसीकडून नियंत्रित करणारा कडक अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशात सर्व तंत्रशिक्षणाचा दर्जा सिद्ध करण्यासाठी नॅक व एनबीएकडून मूल्यांकन दर्जा प्राप्त करून घ्यावा लागणार आहे. संबंधित महाविद्यालयांना १८ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीकरिता नियमित प्राचार्य , शिक्षकांना नियमाप्रमाणे पगार शिक्षकांची किमान पात्रता (एमई, एम. फार्मसी किंवा एम. आर्किटे) आदी बाबींची पूर्तता होत नसेल तर एक वर्षासाठी विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया थांबविण्याची एवढेच नव्हे तर महाविद्यालयाची मान्यताच काढून घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना इंटरनेट, कॉम्प्युटर, पुस्तके न दिली गेल्यास कारवाई केली जाणार आहे. सन २0१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) महाविद्यालयांना नियंत्रित करणारे अधिकार काढून घेतले होते. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाला हे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार युजीसीने तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अत्यंत कडक नियम केले असून, त्यात भरीस भर म्हणून पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला महाविद्यालयांना नियंत्रित करण्याचे अधिकार देण्याचा अंतरिम आदेश काढला आहे. त्यामुळे सध्या महाविद्यालयांना नियंत्रित करण्याचे अधिकार युजीसीबरोबर एआयसीईटीला देखील देण्यात आले आहेत.कोणत्याही नियमातील तरतुदीचा भंग केल्यास संबंधित महाविद्यालयाच्या विरोधात फौजदारी किंवा दिवाणी कारवाई करण्याचे अधिकार विद्यापीठाला बहाल करण्यात आले आहेत. संलग्नित विद्यापीठाने प्रत्येक तंत्र व अभियांत्रिकी महाविद्यालयाचा स्थानिक चौकशी अहवाल युजीसीला देऊन त्याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकणे बंधनकारक केले आहे. महाविद्यालयातील भ्रष्टाचार कमी करून पारदर्शकता आणण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. महाविद्यालयाने नियम व अटींची पूर्तता न केल्यास संपूर्ण मान्यता काढण्यात येणार आहे. युजीसीने घालून दिलेल्या नियम व अटींची पूर्तता न करणार्‍या महाविद्यालयाला संबंधित विद्यापीठाने संलग्नीकरण दिल्यास त्या विद्यापीठाच्या १२-बची मान्यता काढण्याची तरतूद केली आहे.

** धाबे दणाणले.

युजीसीने पारित केलेल्या अध्यादेशामुळे तंत्र व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे धाबे दणाणले आहेत. बहुतांश महाविद्यालयात नियमानुसार शिक्षक आणि प्राचार्य भरती नसल्याने नॅक मूल्यांकन करणे अशक्य आहे. महाविद्यालयांना सांभाळून घेणे हेही आता विद्यापीठाच्या हातातही नाही

. ** महाविद्यालयांची संख्या कमी होणार

युजीसीच्या अध्यादेशामुळे देशातील भरमसाट वाढणार्‍या तंत्र व अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या आता कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाविद्यालयात कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत, कोणत्या नाही याची सुस्पष्टता या नियमामुळे आली आहे.