शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

इंजिनिरिंग कॉलेजच्या मानगुटीवर नॅकचे भूत

By admin | Updated: May 12, 2014 23:22 IST

महाविद्यालयांची संख्या घटण्याची शक्यता

वाशिम- विद्यापीठ अनुदान आयोगाने कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांच्या धर्तीवर आता अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण देणार्‍या महाविद्यालयाच्या मानगूटीवर नॅकचे भूत बसविले आहे. परिणामी महाविद्यालयांची संख्या घटण्याची शक्यता वाढली असुन संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) फेब्रुवारी २0१४ मध्ये तांत्रिक शिक्षण देणार्‍या सर्व महाविद्यालयांना संलग्नित विद्यापीठाकडून किंवा युजीसीकडून नियंत्रित करणारा कडक अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशात सर्व तंत्रशिक्षणाचा दर्जा सिद्ध करण्यासाठी नॅक व एनबीएकडून मूल्यांकन दर्जा प्राप्त करून घ्यावा लागणार आहे. संबंधित महाविद्यालयांना १८ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीकरिता नियमित प्राचार्य , शिक्षकांना नियमाप्रमाणे पगार शिक्षकांची किमान पात्रता (एमई, एम. फार्मसी किंवा एम. आर्किटे) आदी बाबींची पूर्तता होत नसेल तर एक वर्षासाठी विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया थांबविण्याची एवढेच नव्हे तर महाविद्यालयाची मान्यताच काढून घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना इंटरनेट, कॉम्प्युटर, पुस्तके न दिली गेल्यास कारवाई केली जाणार आहे. सन २0१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) महाविद्यालयांना नियंत्रित करणारे अधिकार काढून घेतले होते. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाला हे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार युजीसीने तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अत्यंत कडक नियम केले असून, त्यात भरीस भर म्हणून पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला महाविद्यालयांना नियंत्रित करण्याचे अधिकार देण्याचा अंतरिम आदेश काढला आहे. त्यामुळे सध्या महाविद्यालयांना नियंत्रित करण्याचे अधिकार युजीसीबरोबर एआयसीईटीला देखील देण्यात आले आहेत.कोणत्याही नियमातील तरतुदीचा भंग केल्यास संबंधित महाविद्यालयाच्या विरोधात फौजदारी किंवा दिवाणी कारवाई करण्याचे अधिकार विद्यापीठाला बहाल करण्यात आले आहेत. संलग्नित विद्यापीठाने प्रत्येक तंत्र व अभियांत्रिकी महाविद्यालयाचा स्थानिक चौकशी अहवाल युजीसीला देऊन त्याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकणे बंधनकारक केले आहे. महाविद्यालयातील भ्रष्टाचार कमी करून पारदर्शकता आणण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. महाविद्यालयाने नियम व अटींची पूर्तता न केल्यास संपूर्ण मान्यता काढण्यात येणार आहे. युजीसीने घालून दिलेल्या नियम व अटींची पूर्तता न करणार्‍या महाविद्यालयाला संबंधित विद्यापीठाने संलग्नीकरण दिल्यास त्या विद्यापीठाच्या १२-बची मान्यता काढण्याची तरतूद केली आहे.

** धाबे दणाणले.

युजीसीने पारित केलेल्या अध्यादेशामुळे तंत्र व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे धाबे दणाणले आहेत. बहुतांश महाविद्यालयात नियमानुसार शिक्षक आणि प्राचार्य भरती नसल्याने नॅक मूल्यांकन करणे अशक्य आहे. महाविद्यालयांना सांभाळून घेणे हेही आता विद्यापीठाच्या हातातही नाही

. ** महाविद्यालयांची संख्या कमी होणार

युजीसीच्या अध्यादेशामुळे देशातील भरमसाट वाढणार्‍या तंत्र व अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या आता कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाविद्यालयात कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत, कोणत्या नाही याची सुस्पष्टता या नियमामुळे आली आहे.