शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

नीरा-नृसिंहपूरचा होणार कायापालट

By admin | Updated: March 4, 2016 00:42 IST

विद्युतीकरण, पथदिवे व विद्युतजनित्र या कामांसाठी १४.१८ कोटी खर्च करणार आहे. दळणवळण व सोयी-सुविधांसाठी १0७.५३ कोटी, तर महसूल विभागाला भूसंपादनासाठी ९ कोटींचा निधी देण्यात

पुणे : १९९३ च्या भूकंपात तडे गेलेल्या व दुरवस्था झालेल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा नृसिंहपूर परिसराचा कायापालट होणार आहे. तीर्थक्षेत्र देहू, आळंदी देवस्थान विकासाच्या धर्तीवर या परिसराचा विकास होणार असून, २६०.८६ कोटींच्या बृहत आराखड्याला बुधवारी शासनाच्या शिखर समितीने मान्यता दिली आहे. पुढील तीन वर्षांत या तीर्थक्षेत्राला उजाळा मिळणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथील भाविकांचे हे तीर्थक्षेत्र श्रद्धास्थान असून, महिन्याला येथे ३ ते ४ लाख भाविक येतात. तालुक्यातील या तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा मंजूर झाल्याने अनेक दिवसांची मागणी मार्गी लागली आहे. २०१५-१६ ते २०१७-१८ दरम्यान तीन टप्प्यात कामे मार्गी लावण्यात येणार आहे. त्यानंतर या परिसराचा पूर्णपणे कायापालट होणार आहे. तीर्थक्षेत्राचा बृहत आराखडा व अंमलबजावणीचे टप्पे ठरविण्यात आले आहेत. पुरातत्त्व विभाग, जलसंपदा, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विद्युत महामंडळ, महसूलसह इतर विभागांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या अंतर्गत मंदिर परिसराचे पूर्ण संवर्धन करण्यात येणार आहे. त्यानुसार घाट संवर्धन व अस्तित्वातील घाटास संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. बुडीत बंधारा बांधणे, जलक्रीडेसाठी धक्के, तराफे बांधणे, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची दुरुस्ती करणे, सुशोभीकरण करणे, सार्वजनिक सोयीसुविधांसह रस्त्यांचे रुंदीकरण, पथसुशोभीकरण, भक्त व पर्यटक निवास बांधकाम आदी कामे करण्यात येणार आहेत. या सर्व आराखड्याचे संनियंत्रण पर्यटन विभागाकडे राहणार आहे. (प्रतिनिधी)पुरातत्त्व विभाग : मंदिर परिसराचे संवर्धन, घाट संवर्धन व अस्तित्वातील घाटास संरक्षण भिंत बांधण्याचे काम करणार असून, ३४.८२ कोटींचा यावर खर्च करणार आहे. जलसंपदा विभाग : बुडीत बंधारे बांधणे, जलक्रीडा प्रकाराकरिता धक्के व तराफे बांधणे, अस्तितत्वातील कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरस्ती करणार असून, यासाठी ३0.३७ कोटी रुपये खर्च करणार आहे. पर्यटन/सा.बां. विभाग : सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी ११.२७ कोटी , अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण व पथसुशोभीकरण १५.३३ कोटी, भक्त व पर्यटक निवासासाठी १७.९६ कोटी, तर माणकेश्वर वाडा संरक्षक भिंतीचे संवर्धन व बांधकामासाठी १.६८ कोटी असे ४६.१८ कोटींची कामे करणार आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण : पाणीपुरवठा व मलनिस्सारण व्यवस्थेसाठी १७.४६ कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी १.७६ कोटी असे १९.२२ कोटींची कामे करणार आहे.विद्युत महामंडळ : विद्युतीकरण, पथदिवे व विद्युतजनित्र या कामांसाठी १४.१८ कोटी खर्च करणार आहे.दळणवळण व सोयी-सुविधांसाठी १0७.५३ कोटी, तर महसूल विभागाला भूसंपादनासाठी ९ कोटींचा निधी देण्यात येणार असून, इतर अनुषंगिक खर्चासाठी २.५0 कोटी ठेवण्यात येणार आहेत. पुणे : शिवनेरी किल्ला, सिंहगड किल्ला, लोणावळा येथील पर्यटन विकासाचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून, येत्या २ महिन्यात तो राज्यशासनाला सादर करण्यात येईल. भीमाशंकरचा प्रस्ताव तयार असून त्यावर रविवारी बैैठक घेतली जाणार असल्याचे, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.राव म्हणाले, शिवनेरी किल्ल्याच्या विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यासाठी आर्किआॅलॉजिकल कन्सलटंट नेमण्यात आला आहे. त्यांचा अभ्यास पूर्ण झाल्यावर प्रस्तावात ते नमूद करून अंतिम प्रस्ताव तयार करण्यात येईल. भिमाशंकर तिर्थक्षेत्राच्या विकासाचे नियोजन करण्यासाठी कन्सलटंट नेमण्यात आला आहे. त्याचे काम सुरू आहे. येत्या ६ मार्चला त्यासंदर्भात बैठक घेऊन प्रस्ताव तयार करण्यात येईल आणि तो पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला सादर करण्यात येणार आहे. लोणावळयाचा विकास साहसी क्रीडाप्रकारांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तर सिंहगड किल्ल्याच्या विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. तेथे पुणे महापालिका आणि पुरातत्व खात्याकडून अगोदरच काही कामे करण्यात येत आहेत. पण तेथे रोपवे उभारण्याचा, रस्ता रूंदीकरण, पाणीपुरवठा आदी प्रकल्प या प्रस्तावात प्रस्तावित करण्यात येणार आहे. भिमाशंकर तिर्थक्षेत्राच्या विकासासाठीचा प्रस्ताव १०० कोटी रूपयांचा तयार करण्यात आला आहे. पुणे, सातारा सोलापूरला जोडणारहे तीर्थक्षेत्र पुणे शहरापासून १२४, सोलापूरपासून ८२, तर सातारापासून १११ किलोमीटर अंतरावर असून, तेथून येथे येणाऱ्यासाठी रस्ते आहेत. मात्र, सद्य:स्थितीतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, त्यांचा दर्जा व रुंदीकरणाचाही भविष्यात विचार असून, तसा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्रस्थळावर १0 मीटर रुंदीचे १.५ किलोमीटर,६ मीटर रुंदीचे २.५ किलोमीटर रस्ते करण्यात येणार असून, भव्य असे प्रवेशद्वार करण्यात येणार आहे.