शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

शिक्षणात क्रांती होण्याची गरज

By admin | Updated: January 15, 2016 01:40 IST

जागतिक स्तरावरील दर्जाच्या स्पर्धेत उतरायचे असेल, तर मुंबईसह देशातील विद्यापीठांना अध्यापन, संशोधन आणि विद्यार्थ्यांचे संगोपन या तीनही विभागांत क्रांतीची गरज असल्याचे

मुंबई : जागतिक स्तरावरील दर्जाच्या स्पर्धेत उतरायचे असेल, तर मुंबईसह देशातील विद्यापीठांना अध्यापन, संशोधन आणि विद्यार्थ्यांचे संगोपन या तीनही विभागांत क्रांतीची गरज असल्याचे मत प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. बाळकृष्ण पिसुपती यांनी व्यक्त केले. मुंबई विद्यापाठीच्या सर कावसजी जहांगीर सभागृहात पार पडलेल्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते.पिसुपती म्हणाले की, ‘रोजच्या शैक्षणिक विश्वापार काही गोष्टी वाचून समजून घेण्यास विद्यार्थ्यांना उद्युक्त करायला हवे. आधुनिक शिक्षणासमोरील हे मोठे आव्हान आहे. फक्त पाठ्यक्रमावर आधारित शिक्षण न देता, विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार असणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना नवे संशोधन प्रकल्प देऊन साधणार नाही, तर विद्यार्थी आणि शिक्षकांनाही प्रशिक्षण आणि नवे वळण द्यावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी आवडेल तेच करता येईल, असे मार्ग शोधायला हवेत. तसे करताना जोखीम स्वीकारण्याची तयारीही ठेवावी लागेल. फक्त हे सर्व करताना निष्ठेला कधीही वेठीस धरू नका. कारण निष्ठा ही यशाचा पाया आहे,’ असे पिसुपती या वेळेस म्हणाले. या वेळी राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव हे अध्यक्षस्थानी होते, तर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या उपस्थित दीक्षांत समारंभ पार पडला. गेल्या पाच वर्षांत विथ्द्यापीठात १०७ टक्क्यांनी पदवी आणि ११८ टक्क्यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे, तर दुरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १६२ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर्नल्समध्ये १७१ टक्क्यांनी संशोधन पेपर्समध्ये वाढ झाल्याचे प्रशासनाने सांगितले. गेल्या पाच वर्षांत १८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने येथील प्राध्यापकांचा गौरव केल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.डिजिटल विद्यापीठ!नजीकच्या काळात मुंबई विद्यापीठात अनेक आॅनलाइन अभ्यासक्रम राबविले जाणार असून, त्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये सहभागी होत, विद्यापीठाने अनेक महत्त्वाकांक्षी आणि अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. ज्यामध्ये डिजिटल विद्यापीठ, कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रम, इन्क्लुझिव लीडरशीप असे महत्त्वाचे उपक्रम विद्यापीठ येत्या काळात राबविणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.एक लाखाहून अधिक पदव्या या वर्षीच्या दीक्षान्त सोहळ््यात पदवी आणि पदव्युत्तर मिळून १ लाख ४६ हजार २४८ पदव्या प्रदान करण्यात आल्या. ज्यामध्ये १ लाख २१ हजार ८२९ पदवी आणि २४,४१९ पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कलाशाखेच्या २५,३१०, विज्ञानच्या १७ हजार २०७, वाणिज्यमधील ६४,७३८, तंत्रज्ञान शाखेतील २१,३५८, व्यवस्थापनात १२,१७४ आणि विधी शाखेच्या ५,४६१ विद्यार्थ्यांना पदव्या बहाल करण्यात आल्या आहेत. २७१ पीएच. डी आणि ३६ एमफील पदवी बहाल करण्यात आल्या आहेत, तर ६१ सुवर्ण पदक, १ रौप्य पदक, ३ कांस्य पदक, २ कुलपती पारितोषिक आणि १ कुलपती पदक बहाल केले आहे.