शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

आत्महत्या रोखण्यासाठी वाणांचे संशोधन गरजेचे

By admin | Updated: January 5, 2015 06:34 IST

वातारणातील बदलांचा प्रतिकुल परिणाम शेतीवर होत आहे. बदलत्या वातावरणाशी सुसंगत असे ताण सहन करू शकणाऱ्या वाणांचे संशोधन प्रगतिपथावर

मुंबई : वातारणातील बदलांचा प्रतिकुल परिणाम शेतीवर होत आहे. बदलत्या वातावरणाशी सुसंगत असे ताण सहन करू शकणाऱ्या वाणांचे संशोधन प्रगतिपथावर असून दुष्काळ, तापमान, किडी-रोग असे ताण सहन करणाऱ्या वाणांचे प्रसारण करणे आवश्यक आहे, या संशोधनामुळे शेतकरी आत्महत्या कमी होतील, असे प्रतिपादन राष्ट्रीय पीक जीनोम संसोशन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. असिस दत्ता यांनी रविवारी केले. मुंबई विद्यापीठातील भारतीय विज्ञान परिषदेत ‘ताण सहन करणाऱ्या पिकांचे संशोधन आणि भविष्यातील आव्हाने’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात ते बोलत होते. ही परिषद सी.एस. नौटीयाल आणि सी.आर. भाटीया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. देशातील ३५ ते ४0 टक्के कृषी उत्पादन काढणीच्या जुन्या पद्धतीमुळे वाया जाते. वाया जाणाऱ्या उत्पादनाचे मूल्य ६0 हजार कोटी असून, इंग्लंडची ती वार्षिक गरज असल्याचे ते म्हणाले. हैदराबाद येथील जैवशास्त्र शाळेचे समन्वयक डॉ. ए.एस. राघवेंद्र यांनी ताण सहन करणाऱ्या पिकांमधील फोटोरेस्पीरेशन या विषयावर सादरीकरण केले. (प्रतिनिधी)