शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

कला, सामाजिक चळवळीला नानांचाच आधार

By admin | Updated: December 25, 2014 00:55 IST

कोल्हापूरकरांसाठी अनुकरणीय पाऊल : मला मिळालेल्या भाकरीतला एक तुकडा या समाजाने दिला आहे

कोल्हापूर : संगीत परंपरेचे मंदिर असलेला गायन समाज देवल क्लब, बालमजुरांना मुक्त करणारी ‘अवनि’ आणि मतिमंदांना स्वावलंबी बनवणारी ‘चेतना’ या संस्थांना आर्थिक सहकार्य करण्याची जबाबदारी अभिनेता नाना पाटेकर यांनी जाहीर केली आहे. यापूवीर्ही त्यांनी देवल क्लब आणि महापालिकेच्या शूटिंग रेंजला अर्थसाहाय्य केले आहे. मला मिळालेल्या भाकरीतला एक तुकडा या समाजाने दिला आहे, असा कृतज्ञ भाव ठेवत पाटेकर यांनी कोल्हापूरला आपल्या दानशूरतेची प्रचिती दिली आहे. कला, सांस्कृतिक आणि सामाजिक अशा विषयांना वाहून कार्य करणाऱ्या संस्था दानशूर व्यक्ती आणि लोकाश्रयावरच आपले कार्य नेटाने पुढे चालवीत असतात. नाना पाटेकर हे उत्तम कलाकार आहेतच; पण सामाजिक भान असलेले संवेदनशील माणूसही आहेत. आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींवर ते थेट प्रहार करतात अशी त्यांची ख्याती आहे. या ख्यातीची प्रचिती देत त्यांनी काही वर्षांपूर्वी कोल्हापूर महापालिकेला शूटिंग रेंजसाठी टार्गेट रनरसाठी लाखाची मदत केली होती. कोल्हापुरात गानपरंपरा निर्माण करणारी आणि राजर्षी शाहू महाराजांचा आश्रय लाभलेली गायन समाज देवल क्लब ही संस्था म्हणजे शास्त्रीय संगीतासह वाद्य, नृत्याचे मंदिरच. या संस्थेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वषार्निमित्त आयोजित कार्यक्रमाला नाना पाटेकर यांना आमंत्रित केले होते. यावेळी पाटेकर यांनी संस्थेच्या नूतन वास्तूसाठी पाच लाखांचा निधी जाहीर केला आणि तो दिलादेखील. यातून संस्थेने आॅडिटोरिअम उभारले. निधीचा उल्लेख वास्तूवर कुठेही होऊ नये, अशीही इच्छा त्यांनी केली होती. त्यांनी वास्तूची पाहणीदेखील केल्याचे श्रीकांत डिग्रजकर यांनी सांगितले. काल, मंगळवारी ‘किफ’मध्ये झालेल्या एका समारंभात त्यांनी पुन्हा एकदा देवल क्लबला अर्थसाहाय्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले. शिवाय ‘चेतना’ आणि ‘अवनि’चीही जबाबदारी स्वीकारली. त्यांचा हा निर्णय कोल्हापूरकरांचा सामाजिक आणि सांस्कृतिक जाणिवांवरील काजळी दूर करणारा ठरला आहे. (प्रतिनिधी)गायन समाज देवल क्लब राजर्षी शाहू महाराजांचा राजाश्रय लाभलेल्या देवल क्लबने शासनाच्या व दानशूर व्यक्तींच्या मदतीतून नूतन वास्तू उभारली. या संस्थेत शास्त्रीय संगीताच्या मैफली, भरतनाट्य, कथ्थक नृत्याचे सादरीकरण, वाद्यांच्या सुरावटी अशी सांगीतिक चळवळ सुरू असते. मात्र या इमारती सुसज्ज झालेल्या नाहीत. वास्तूचे इंटिरिअर होणे बाकी आहे. रंगमंच, ध्वनिव्यवस्था, बैठक व्यवस्था, आलेल्या पाहुण्यांसाठी निवासाची सोय, कलादालन, लिफ्टची सोय या सगळ्या बाबींची पूर्तता होण्यासाठी आणखी दोन कोटींचा निधी लागणार आहे. चेतना विकास संस्था मतिमंद मुलांना समाजप्रवाहात आणण्यासाठी काम करणाऱ्या चेतना विकास संस्थेला जागेचा मोठा प्रश्न आहे. शेंडापार्कात आता जिथे संस्था चालवली जाते ती जागा संस्थेच्या नावावर नाही; त्यामुळे तेथे एक वीटही हलविता येत नाही; त्यामुळे या जागेच्या सातबारावर संस्थेची नोंद होणे आणि त्यानंतर इमारत बांधकाम, अद्ययावत सुविधा, उपकरणे, मुलांना स्वावलंबी बनविण्यासाठी काही उद्योग निर्माण करणे या दोन गोष्टींची संस्थेला गरज आहे. यासाठी लागणाऱ्या निधीचीही रक्कम १० कोटींच्या आसपास जाते. अवनि बालमजुरांना मुक्त करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धडपडणाऱ्या ‘अवनि’ संस्थेच्या वतीने हणरबरवाडी येथे शाळाबाह्ण व बालकामगार मुलींसाठी निवासी संकुल उभारण्यात येणार आहे. संस्थेने यासाठी एक एकर जागा खरेदी आहे. मात्र, बांधकामासाठी पाच कोटींचा निधी लागणार आहे. येथे मुलींच्या राहण्यापासून ते शैक्षणिक सुविधांपर्यंतच्या सोयी तसेच बालगृह निर्माण करण्यात येणार आहे.