शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

मानव विकासात मुंबईची पीछेहाट

By admin | Updated: December 31, 2014 01:14 IST

महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची मानव विकास निर्देशांकात मुंबईची (आठवा क्रमांक) पीछेहाट झाली आहे, तर पुणे शहर तालुक्याने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे.

मिलिंदकुमार साळवे ल्ल श्रीरामपूर (अहमदनगर)महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची मानव विकास निर्देशांकात मुंबईची (आठवा क्रमांक) पीछेहाट झाली आहे, तर पुणे शहर तालुक्याने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. २०१२ च्या महाराष्ट्र मानव विकास अहवालात मुंबई, ठाणे, नाशिक व नागपूर या महानगरांभोवतीच विकास केंद्रीत झाला असून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही आदिवासी तालुक्यांमध्ये मात्र विकासाची गंगा पोहोचलीच नसल्याचे वास्तव उघड झाले आहे.संबंधित अहवाल अजून अधिकृतपणे प्रकाशित व्हायचा आहे. राज्यातील ३५६ तालुक्यांपैकी मानव विकास निर्देशांकात तळाचे म्हणजे शेवटचे १५ तालुके आदिवासी आहेत. पहिल्या पंधरामध्ये तीन तालुके असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातीलडहाणू (३४२), विक्रमगड (३५१) जव्हार, तलासरी व मोखाडा तालुक्यांचा शेवटच्या १५ मध्ये समावेश आहेत. एकीकडे ठाणे शहर तालुका विकासात आघाडीवर तर शहरापासून काही किलोमीटरवर असलेले आदिवासी तालुके मात्र तळाशी असल्याचे विरोधाभासी चित्र आहे. मुंबईचाही मानव विकास निर्देशांक घसरला असून पुणे, नागपूर, ठाणे व नाशिक या शहरांनी आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र मानव विकास मिशन या राज्य सरकारनेच स्थापन केलेल्या स्वतंत्र संस्थेने महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या विकासाचे मूल्यमापन करून त्यांचा मानव विकास निर्देशांक तयार केला आहे.पहिले १५ तालुकेपुणे शहर, नागपूर शहर, ठाणे शहर, हवेली (पुणे), नाशिक, कल्याण, पनवेल (रायगड), मुंबई, वसई (ठाणे), उल्हासनगर, (ठाणे), सातारा, करवीर (कोल्हापूर), अंबरनाथ (ठाणे), वर्धा व नागपूर ग्रामीण.तळाचे १५ तालुके(सर्व आदिवासी)डहाणू, चिखलदरा, नवापूर, त्रिंबक, एटापल्ली, जव्हार, तलासरी, सुरगणा, पेठ, विक्रमगड, सिरोंचा, मोखाडा, अक्कलकुवा, भामरागड, अक्राणा.मराठवाडा मागेचमराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक राज्याच्या ०.५८ टक्के सरासरीपेक्षा खाली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मराठवाड्यातील काही तालुक्यांची निर्देशांक उंचावण्यासाठी विशेष अभियानांतर्गत निवड करण्यात आली आहे.च्शिक्षण, आरोग्य व दरडोई उत्पन्न यांच्या आधारे मानव विकास निर्देशांक काढला जातो. या तिन्ही क्षेत्रांतील विकास अपेक्षित पातळीपेक्षा कमी असेल तर तो कमी निर्देशांक व जास्त असेल तर तो जास्त निर्देशांक मानला जातो. या तीन क्षेत्रांतील मागासलेपण शोधण्याचे काम या माध्यमातून केले जाते. शून्य ते एक अशी या निर्देशांकाची मोजणी होते. एक शतांशापासून एकपर्यंत चढत्या क्रमाने निर्देशांक काढला जातो.मी दोन वर्षांपूर्वी अध्यक्ष होतो. त्यामुळे अहवाल कधी प्रकाशित होणार याविषयी माहिती नाही. - कृष्णा भोगे,माजी अध्यक्ष, महाराष्ट्र मानव विकास मिशन