शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
3
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उडी मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
4
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
5
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
6
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
7
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
8
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
9
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
10
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
11
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
12
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
13
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
14
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
15
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
16
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
17
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
18
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
19
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
20
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन

मानव विकासात मुंबईची पीछेहाट

By admin | Updated: December 31, 2014 01:14 IST

महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची मानव विकास निर्देशांकात मुंबईची (आठवा क्रमांक) पीछेहाट झाली आहे, तर पुणे शहर तालुक्याने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे.

मिलिंदकुमार साळवे ल्ल श्रीरामपूर (अहमदनगर)महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची मानव विकास निर्देशांकात मुंबईची (आठवा क्रमांक) पीछेहाट झाली आहे, तर पुणे शहर तालुक्याने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. २०१२ च्या महाराष्ट्र मानव विकास अहवालात मुंबई, ठाणे, नाशिक व नागपूर या महानगरांभोवतीच विकास केंद्रीत झाला असून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही आदिवासी तालुक्यांमध्ये मात्र विकासाची गंगा पोहोचलीच नसल्याचे वास्तव उघड झाले आहे.संबंधित अहवाल अजून अधिकृतपणे प्रकाशित व्हायचा आहे. राज्यातील ३५६ तालुक्यांपैकी मानव विकास निर्देशांकात तळाचे म्हणजे शेवटचे १५ तालुके आदिवासी आहेत. पहिल्या पंधरामध्ये तीन तालुके असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातीलडहाणू (३४२), विक्रमगड (३५१) जव्हार, तलासरी व मोखाडा तालुक्यांचा शेवटच्या १५ मध्ये समावेश आहेत. एकीकडे ठाणे शहर तालुका विकासात आघाडीवर तर शहरापासून काही किलोमीटरवर असलेले आदिवासी तालुके मात्र तळाशी असल्याचे विरोधाभासी चित्र आहे. मुंबईचाही मानव विकास निर्देशांक घसरला असून पुणे, नागपूर, ठाणे व नाशिक या शहरांनी आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र मानव विकास मिशन या राज्य सरकारनेच स्थापन केलेल्या स्वतंत्र संस्थेने महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या विकासाचे मूल्यमापन करून त्यांचा मानव विकास निर्देशांक तयार केला आहे.पहिले १५ तालुकेपुणे शहर, नागपूर शहर, ठाणे शहर, हवेली (पुणे), नाशिक, कल्याण, पनवेल (रायगड), मुंबई, वसई (ठाणे), उल्हासनगर, (ठाणे), सातारा, करवीर (कोल्हापूर), अंबरनाथ (ठाणे), वर्धा व नागपूर ग्रामीण.तळाचे १५ तालुके(सर्व आदिवासी)डहाणू, चिखलदरा, नवापूर, त्रिंबक, एटापल्ली, जव्हार, तलासरी, सुरगणा, पेठ, विक्रमगड, सिरोंचा, मोखाडा, अक्कलकुवा, भामरागड, अक्राणा.मराठवाडा मागेचमराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक राज्याच्या ०.५८ टक्के सरासरीपेक्षा खाली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मराठवाड्यातील काही तालुक्यांची निर्देशांक उंचावण्यासाठी विशेष अभियानांतर्गत निवड करण्यात आली आहे.च्शिक्षण, आरोग्य व दरडोई उत्पन्न यांच्या आधारे मानव विकास निर्देशांक काढला जातो. या तिन्ही क्षेत्रांतील विकास अपेक्षित पातळीपेक्षा कमी असेल तर तो कमी निर्देशांक व जास्त असेल तर तो जास्त निर्देशांक मानला जातो. या तीन क्षेत्रांतील मागासलेपण शोधण्याचे काम या माध्यमातून केले जाते. शून्य ते एक अशी या निर्देशांकाची मोजणी होते. एक शतांशापासून एकपर्यंत चढत्या क्रमाने निर्देशांक काढला जातो.मी दोन वर्षांपूर्वी अध्यक्ष होतो. त्यामुळे अहवाल कधी प्रकाशित होणार याविषयी माहिती नाही. - कृष्णा भोगे,माजी अध्यक्ष, महाराष्ट्र मानव विकास मिशन