शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

मानव विकासात मुंबईची पीछेहाट

By admin | Updated: December 31, 2014 01:14 IST

महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची मानव विकास निर्देशांकात मुंबईची (आठवा क्रमांक) पीछेहाट झाली आहे, तर पुणे शहर तालुक्याने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे.

मिलिंदकुमार साळवे ल्ल श्रीरामपूर (अहमदनगर)महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची मानव विकास निर्देशांकात मुंबईची (आठवा क्रमांक) पीछेहाट झाली आहे, तर पुणे शहर तालुक्याने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. २०१२ च्या महाराष्ट्र मानव विकास अहवालात मुंबई, ठाणे, नाशिक व नागपूर या महानगरांभोवतीच विकास केंद्रीत झाला असून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही आदिवासी तालुक्यांमध्ये मात्र विकासाची गंगा पोहोचलीच नसल्याचे वास्तव उघड झाले आहे.संबंधित अहवाल अजून अधिकृतपणे प्रकाशित व्हायचा आहे. राज्यातील ३५६ तालुक्यांपैकी मानव विकास निर्देशांकात तळाचे म्हणजे शेवटचे १५ तालुके आदिवासी आहेत. पहिल्या पंधरामध्ये तीन तालुके असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातीलडहाणू (३४२), विक्रमगड (३५१) जव्हार, तलासरी व मोखाडा तालुक्यांचा शेवटच्या १५ मध्ये समावेश आहेत. एकीकडे ठाणे शहर तालुका विकासात आघाडीवर तर शहरापासून काही किलोमीटरवर असलेले आदिवासी तालुके मात्र तळाशी असल्याचे विरोधाभासी चित्र आहे. मुंबईचाही मानव विकास निर्देशांक घसरला असून पुणे, नागपूर, ठाणे व नाशिक या शहरांनी आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र मानव विकास मिशन या राज्य सरकारनेच स्थापन केलेल्या स्वतंत्र संस्थेने महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या विकासाचे मूल्यमापन करून त्यांचा मानव विकास निर्देशांक तयार केला आहे.पहिले १५ तालुकेपुणे शहर, नागपूर शहर, ठाणे शहर, हवेली (पुणे), नाशिक, कल्याण, पनवेल (रायगड), मुंबई, वसई (ठाणे), उल्हासनगर, (ठाणे), सातारा, करवीर (कोल्हापूर), अंबरनाथ (ठाणे), वर्धा व नागपूर ग्रामीण.तळाचे १५ तालुके(सर्व आदिवासी)डहाणू, चिखलदरा, नवापूर, त्रिंबक, एटापल्ली, जव्हार, तलासरी, सुरगणा, पेठ, विक्रमगड, सिरोंचा, मोखाडा, अक्कलकुवा, भामरागड, अक्राणा.मराठवाडा मागेचमराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक राज्याच्या ०.५८ टक्के सरासरीपेक्षा खाली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मराठवाड्यातील काही तालुक्यांची निर्देशांक उंचावण्यासाठी विशेष अभियानांतर्गत निवड करण्यात आली आहे.च्शिक्षण, आरोग्य व दरडोई उत्पन्न यांच्या आधारे मानव विकास निर्देशांक काढला जातो. या तिन्ही क्षेत्रांतील विकास अपेक्षित पातळीपेक्षा कमी असेल तर तो कमी निर्देशांक व जास्त असेल तर तो जास्त निर्देशांक मानला जातो. या तीन क्षेत्रांतील मागासलेपण शोधण्याचे काम या माध्यमातून केले जाते. शून्य ते एक अशी या निर्देशांकाची मोजणी होते. एक शतांशापासून एकपर्यंत चढत्या क्रमाने निर्देशांक काढला जातो.मी दोन वर्षांपूर्वी अध्यक्ष होतो. त्यामुळे अहवाल कधी प्रकाशित होणार याविषयी माहिती नाही. - कृष्णा भोगे,माजी अध्यक्ष, महाराष्ट्र मानव विकास मिशन