शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

मोदींचा मुक्काम... अन् वाढलेले ‘हार्ट बिट’ !

By admin | Updated: August 22, 2014 01:33 IST

मुसळधार पावसामुळे मोदींना तासभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुक्काम ठोकण्याची पाळी आली. त्यांच्या तासभर मुक्कामामुळे मात्र विमानतळावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे ‘हार्ट बिट’

अधिकाऱ्यांची धावपळ : कँटीनमधील खाद्यपदार्थही संपलेदयानंद पाईकराव - नागपूर मुसळधार पावसामुळे मोदींना तासभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुक्काम ठोकण्याची पाळी आली. त्यांच्या तासभर मुक्कामामुळे मात्र विमानतळावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे ‘हार्ट बिट’ वाढून त्यांची चांगलीच धावपळ झाली. अखेर दुपारी ४.३५ वाजता पावसाचा जोर ओसरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने मौदाकडे रवाना झाले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दुपारी ३.०५ वाजताच्या दरम्यान बोईंग ७३७ क्रमांकाच्या इंडियन एअर फोर्सच्या विशेष विमानाने नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. जोरदार पाऊस असल्यामुळे विमानाजवळ जाऊन त्यांचे स्वागत करण्याची संधी विमानतळावर उपस्थित भाजपचे नेते, पदाधिकाऱ्यांना मिळाली नाही. विमानातून खाली उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात दुपारी ३.२० वाजता कारमध्ये बसून टर्मिनल बिल्डींगच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये आले. थोडा पाऊस कमी झाल्यानंतर मौदाकडे रवाना होण्याचा त्यांचा बेत होता. दुपारी ३.३२ पर्यंत ते व्हीआयपी लाऊंजमध्ये बसून होते. परंतु खराब वातावरणामुळे एअर फोर्सच्या हेलिकॉप्टरने उड्डाण करण्याचे टाळले. ३.४७ वाजेपर्यंत पाऊस थोडाही कमी न झाल्यामुळे मोदींचा मौदा दौरा रद्द करण्यात आल्याची बातमी आली. ४.१० वाजता पुन्हा मोदी रस्ते मार्गाने मौदाकडे जाण्याचा विचार करीत असल्याचा दुसरा निरोप आला. परंतु पुन्हा २० मिनिटांनी ४.३० वाजता पाऊस पूर्णपणे थांबला आणि मोदींचे हेलिकॉप्टर तयार करण्याची तयारी सुरू झाली. हेलिकॉप्टर उड्डाणासाठी तयार झाल्यानंतर मोदी व्हीआयपी लाऊंजमधून बाहेर पडून कारने हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचले. दुपारी ४.४१ वाजता त्यांचे हेलिकॉप्टर मौदाच्या दिशेने झेपावले. तेथून सायंकाळी ६.०१ वाजता ते नागपूरला परतले आणि ६.१३ वाजता कस्तूरचंद पार्ककडे रवाना झाले. तेथील कार्यक्रम आटोपून ते सायंकाळी ७.५६ वाजता विशेष विमानाने दिल्लीकडे रवाना झाले.कँटीनचे पदार्थ संपलेपंतप्रधान मोदींना ‘अटेंड’ करण्यासाठी ४० ते ५० पदाधिकारी विमानतळाच्या टर्मिनल बिल्डींगमध्ये उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था करताना अधिकाऱ्यांची धावपळ झाली. त्यांनी विमानतळावरील कँटीनमधून सँडविच, कुकीज, नमकीन आणि इतर खाद्यपदार्थ बोलविले. परंतु एवढ्या लोकांना खाद्यपदार्थ पुरविताना कँटीनमधील खाद्यपदार्थच संपून गेले होते.दर दहा मिनिटांनी तपासली ‘व्हिजिबिलीटी’हेलिकॉप्टरला आकाशात उड्डाण भरण्यासाठी किमान १५०० मीटरची ‘व्हिजिबिलीटी’ (दृष्यता) असणे गरजेचे आहे. परंतु मुसळधार पावसामुळे ‘व्हिजिबिलीटी’ ५०० मीटरपर्यंत खालावली होती. अशा परिस्थितीत हेलिकॉप्टर आकाशात झेपावणे शक्य नव्हते. त्यामुळे विमानतळावरील अधिकाऱ्यांना दर दहा मिनिटांनी ‘व्हिजिबिलीटी’ तपासावी लागत होती.अधिकाऱ्यांनी बजावली चोख कामगिरीपंतप्रधान मोदींचा दौरा, त्यातल्या त्यात मुसळधार पाऊस सुरू झालेला असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकाऱ्यांचे ‘टेन्शन’ आणखीनच वाढले. ‘व्हिजिबिलीटी’ तपासणे, पंतप्रधानांची व्हीआयपी लाऊंजमध्ये व्यवस्था करणे आणि यासोबतच नियमित येणाऱ्या प्रवासी विमानांचेही व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली. परंतु कार्यकारी विमानतळ संचालक मनीष कुमार, विशेष कार्य अधिकारी शफिक शहा, संचार प्रमुख प्रशांत निखारे यांनी चोख कामगिरी बजावून सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या.