शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

मोदींचा मुक्काम... अन् वाढलेले ‘हार्ट बिट’ !

By admin | Updated: August 22, 2014 01:33 IST

मुसळधार पावसामुळे मोदींना तासभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुक्काम ठोकण्याची पाळी आली. त्यांच्या तासभर मुक्कामामुळे मात्र विमानतळावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे ‘हार्ट बिट’

अधिकाऱ्यांची धावपळ : कँटीनमधील खाद्यपदार्थही संपलेदयानंद पाईकराव - नागपूर मुसळधार पावसामुळे मोदींना तासभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुक्काम ठोकण्याची पाळी आली. त्यांच्या तासभर मुक्कामामुळे मात्र विमानतळावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे ‘हार्ट बिट’ वाढून त्यांची चांगलीच धावपळ झाली. अखेर दुपारी ४.३५ वाजता पावसाचा जोर ओसरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने मौदाकडे रवाना झाले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दुपारी ३.०५ वाजताच्या दरम्यान बोईंग ७३७ क्रमांकाच्या इंडियन एअर फोर्सच्या विशेष विमानाने नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. जोरदार पाऊस असल्यामुळे विमानाजवळ जाऊन त्यांचे स्वागत करण्याची संधी विमानतळावर उपस्थित भाजपचे नेते, पदाधिकाऱ्यांना मिळाली नाही. विमानातून खाली उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात दुपारी ३.२० वाजता कारमध्ये बसून टर्मिनल बिल्डींगच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये आले. थोडा पाऊस कमी झाल्यानंतर मौदाकडे रवाना होण्याचा त्यांचा बेत होता. दुपारी ३.३२ पर्यंत ते व्हीआयपी लाऊंजमध्ये बसून होते. परंतु खराब वातावरणामुळे एअर फोर्सच्या हेलिकॉप्टरने उड्डाण करण्याचे टाळले. ३.४७ वाजेपर्यंत पाऊस थोडाही कमी न झाल्यामुळे मोदींचा मौदा दौरा रद्द करण्यात आल्याची बातमी आली. ४.१० वाजता पुन्हा मोदी रस्ते मार्गाने मौदाकडे जाण्याचा विचार करीत असल्याचा दुसरा निरोप आला. परंतु पुन्हा २० मिनिटांनी ४.३० वाजता पाऊस पूर्णपणे थांबला आणि मोदींचे हेलिकॉप्टर तयार करण्याची तयारी सुरू झाली. हेलिकॉप्टर उड्डाणासाठी तयार झाल्यानंतर मोदी व्हीआयपी लाऊंजमधून बाहेर पडून कारने हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचले. दुपारी ४.४१ वाजता त्यांचे हेलिकॉप्टर मौदाच्या दिशेने झेपावले. तेथून सायंकाळी ६.०१ वाजता ते नागपूरला परतले आणि ६.१३ वाजता कस्तूरचंद पार्ककडे रवाना झाले. तेथील कार्यक्रम आटोपून ते सायंकाळी ७.५६ वाजता विशेष विमानाने दिल्लीकडे रवाना झाले.कँटीनचे पदार्थ संपलेपंतप्रधान मोदींना ‘अटेंड’ करण्यासाठी ४० ते ५० पदाधिकारी विमानतळाच्या टर्मिनल बिल्डींगमध्ये उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था करताना अधिकाऱ्यांची धावपळ झाली. त्यांनी विमानतळावरील कँटीनमधून सँडविच, कुकीज, नमकीन आणि इतर खाद्यपदार्थ बोलविले. परंतु एवढ्या लोकांना खाद्यपदार्थ पुरविताना कँटीनमधील खाद्यपदार्थच संपून गेले होते.दर दहा मिनिटांनी तपासली ‘व्हिजिबिलीटी’हेलिकॉप्टरला आकाशात उड्डाण भरण्यासाठी किमान १५०० मीटरची ‘व्हिजिबिलीटी’ (दृष्यता) असणे गरजेचे आहे. परंतु मुसळधार पावसामुळे ‘व्हिजिबिलीटी’ ५०० मीटरपर्यंत खालावली होती. अशा परिस्थितीत हेलिकॉप्टर आकाशात झेपावणे शक्य नव्हते. त्यामुळे विमानतळावरील अधिकाऱ्यांना दर दहा मिनिटांनी ‘व्हिजिबिलीटी’ तपासावी लागत होती.अधिकाऱ्यांनी बजावली चोख कामगिरीपंतप्रधान मोदींचा दौरा, त्यातल्या त्यात मुसळधार पाऊस सुरू झालेला असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकाऱ्यांचे ‘टेन्शन’ आणखीनच वाढले. ‘व्हिजिबिलीटी’ तपासणे, पंतप्रधानांची व्हीआयपी लाऊंजमध्ये व्यवस्था करणे आणि यासोबतच नियमित येणाऱ्या प्रवासी विमानांचेही व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली. परंतु कार्यकारी विमानतळ संचालक मनीष कुमार, विशेष कार्य अधिकारी शफिक शहा, संचार प्रमुख प्रशांत निखारे यांनी चोख कामगिरी बजावून सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या.