शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
2
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
3
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
5
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
6
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
7
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
8
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
9
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
10
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
11
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
12
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
13
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
14
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
15
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
16
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
17
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
18
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
19
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम

राज्यमंत्री खोतकर यांचा ५०० कोटींचा घोटाळा

By admin | Updated: August 18, 2016 07:01 IST

राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री व शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी ५०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन-शर्मा यांनी केला आहे. खोतकर

मुंबई : राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री व शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी ५०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन-शर्मा यांनी केला आहे. खोतकर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या ९ वर्षांपासून सभापती असून पदाचा गैरवापर करून त्यांनी हा घोटाळा केल्याचा दावा मेनन यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.खोतकर यांनी नातेवाइकांसह मित्र परिवाराला बाजार समितीमधील सुमारे २५० हून अधिक गाळे बेकायदेशीरपणे विकल्याचे मेनन यांचे म्हणणे आहे. त्या म्हणाल्या की, बाजारभावानुसार येथील एका गाळ्याची किंमत ४० ते ५० लाख रुपये आहे. मात्र खोतकर यांनी त्यांच्या नजीकच्या ४० लोकांना सुमारे २५० हून अधिक गाळे प्रत्येकी ५० हजार रुपयांपासून ५ लाखांपर्यंतच्या किमतीला विकले आहेत. अशा प्रकारे गेल्या ९ वर्षांत खोतकर यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मेनन यांनी केला आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरव्यवहारांवर लेखा परीक्षकांनीही बोट ठेवले आहे. मात्र तरीही सभापती म्हणून खोतकर यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. कारण ते स्वत: या घोटाळ्यात सामील असल्याचे मेनन यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांकडे क्लीन चीट बँक!याआधी भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याविरोधात आपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांना मुख्यमंत्र्यांना क्लीन चीट दिली. त्यामुळे खोतकर यांनाही मुख्यमंत्र्यांकडून क्लीन चीट मिळेल. मुख्यमंत्र्यांकडे क्लीन चीट देणारी बँक आहे, अशा शब्दांत मेनन यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली........मग ही कृषी उत्पन्न बाजार समिती कशी?खोतकर यांनी जालनाच्या बाजार समितीमध्ये वाटप केलेले गाळे हे बिगर कृषी व्यवसायांसाठी दिल्याचे मेनन यांनी सांगितले. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या बाजार समितीमध्ये आॅटोमोबाईल, स्टील, फर्निचर, पाईप, पत्रा, जनरल यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. शिवाय मल्टीप्लेक्स आणि पेट्रोलपंप यांचे बांधकाम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) नियमानुसार लिलावजालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळ्यांचा राज्य व विभागीय पातळीवरील वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन नियमानुसार लिलाव करण्यात आलेला आहे. त्याद्वारे गाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. नियमबाह्य कुठलेही काम झालेले नाही. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित व धादांत खोटे आहेत, असे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले.