शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

अनेकांनी गमावली कुटुंबे

By admin | Updated: August 1, 2014 01:01 IST

गावातील दुर्घटनेत अनेकांनी आपली संपूर्ण कुटुंबेच गमावली आहेत, तर काहींचा वंशच संपण्याचीही भीती आहे

माळीण : गावातील दुर्घटनेत अनेकांनी आपली संपूर्ण कुटुंबेच गमावली आहेत, तर काहींचा वंशच संपण्याचीही भीती आहे. येथील भागू सोनू दांगडे यांच्या कुटुंबातील कोणीही वाचण्याची शक्यता नाही. शेतीचा व्यवसाय करणाऱ्या दांगडे कुटुंबातील भागू दांगडे यांच्यासह त्यांच्या पत्नी सुमन दांगडे आणि दोन मुले, तर थोरला भाऊ संदीप दांगडे आणि त्यांच्या पत्नीसह चार वर्षांचा मुलगा अद्यापही बेपत्ता आहे. निसर्गरम्य गाव झालं होत्याचं नव्हतं.आंबेगाव तालुक्यात दोन वेळा तहसीलदार म्हणून काम केलेले पुनाजी रामचंद्र कोथरे यांचे १५ ते १६ नातेवाईक बेपत्ता झाले आहेत. ते म्हणाले, ‘‘गेली २० ते २५ वर्षे मी येथे येत आहे. माझी सासरवाडी येथे आहे. सध्या फक्त मोकळं घर होतं, ते गाडलं गेलं. मी दोन वेळा तहसीलदार म्हणून काम केल्याने मला या गावाची बारकाईने माहिती आहे. खूप सुंदर आणि निसर्गरम्य गाव होते. मात्र, आता हे गावच नष्ट झाले आहे. ’’...पण तो आलाच नाही! दिगत या माळीण गावापलीकडेच असणाऱ्या गावातील लीला कारोटे या भातआवणीसाठी गावाला आल्या होत्या. त्यांच्या बहिणीचे हे गाव. सहा महिन्यांपूर्वीच त्या बहिणीच्या दहाव्याला आल्या होत्या. बहिणीच्या मुलाने मावशीकडे येणार म्हणून सांगितले होते. पण आज या घटनेची माहिती समजली. मेव्हणे आणि त्यांचा मुलगा बेपत्ता आहे. लीलाबार्इंना हे सांगताना गहिवरून आले होते. वडिलांच्या दशक्रियेसाठी आलेल्या मुलीवर काळाचा घालागोहे येथे अश्विनी काळूराम भवारी या आपल्या दोन मुलांसमवेत वडिलांच्या दशक्रिया विधीसाठी आल्या होत्या. कालच्या घटनेत अश्विनी यांच्यासह त्यांचा मुलगा आर्यन (वय ४) आणि श्रावणी (वय ५) या तिघांचा मृत्यू झाला. माळीणपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोहे गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.