शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

अनेकांनी गमावली कुटुंबे

By admin | Updated: August 1, 2014 01:01 IST

गावातील दुर्घटनेत अनेकांनी आपली संपूर्ण कुटुंबेच गमावली आहेत, तर काहींचा वंशच संपण्याचीही भीती आहे

माळीण : गावातील दुर्घटनेत अनेकांनी आपली संपूर्ण कुटुंबेच गमावली आहेत, तर काहींचा वंशच संपण्याचीही भीती आहे. येथील भागू सोनू दांगडे यांच्या कुटुंबातील कोणीही वाचण्याची शक्यता नाही. शेतीचा व्यवसाय करणाऱ्या दांगडे कुटुंबातील भागू दांगडे यांच्यासह त्यांच्या पत्नी सुमन दांगडे आणि दोन मुले, तर थोरला भाऊ संदीप दांगडे आणि त्यांच्या पत्नीसह चार वर्षांचा मुलगा अद्यापही बेपत्ता आहे. निसर्गरम्य गाव झालं होत्याचं नव्हतं.आंबेगाव तालुक्यात दोन वेळा तहसीलदार म्हणून काम केलेले पुनाजी रामचंद्र कोथरे यांचे १५ ते १६ नातेवाईक बेपत्ता झाले आहेत. ते म्हणाले, ‘‘गेली २० ते २५ वर्षे मी येथे येत आहे. माझी सासरवाडी येथे आहे. सध्या फक्त मोकळं घर होतं, ते गाडलं गेलं. मी दोन वेळा तहसीलदार म्हणून काम केल्याने मला या गावाची बारकाईने माहिती आहे. खूप सुंदर आणि निसर्गरम्य गाव होते. मात्र, आता हे गावच नष्ट झाले आहे. ’’...पण तो आलाच नाही! दिगत या माळीण गावापलीकडेच असणाऱ्या गावातील लीला कारोटे या भातआवणीसाठी गावाला आल्या होत्या. त्यांच्या बहिणीचे हे गाव. सहा महिन्यांपूर्वीच त्या बहिणीच्या दहाव्याला आल्या होत्या. बहिणीच्या मुलाने मावशीकडे येणार म्हणून सांगितले होते. पण आज या घटनेची माहिती समजली. मेव्हणे आणि त्यांचा मुलगा बेपत्ता आहे. लीलाबार्इंना हे सांगताना गहिवरून आले होते. वडिलांच्या दशक्रियेसाठी आलेल्या मुलीवर काळाचा घालागोहे येथे अश्विनी काळूराम भवारी या आपल्या दोन मुलांसमवेत वडिलांच्या दशक्रिया विधीसाठी आल्या होत्या. कालच्या घटनेत अश्विनी यांच्यासह त्यांचा मुलगा आर्यन (वय ४) आणि श्रावणी (वय ५) या तिघांचा मृत्यू झाला. माळीणपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोहे गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.