शहरं
Join us  
Trending Stories
1
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
2
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
3
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
4
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
5
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
8
शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
9
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
10
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
11
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
12
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
13
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
14
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
15
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
16
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
17
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
19
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
20
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक

माणूस घडविण्याचे साहित्य निर्माण व्हावे: वसंत आबाजी डहाके

By admin | Updated: January 29, 2017 02:32 IST

अकोल्यात थाटात उद्घाटन; चौथे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन

अकोला, दि. २८- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्वसमावेशक असे साहित्य निर्माण केले. त्यांच्या साहित्यामध्ये सौंदर्य आणि समाजासाठीची उपयुक्ततासुद्धा आहे. साहित्य हे पुस्तकातून शिकण्याची गोष्ट नव्हे. आंतरमनातून साहित्य जन्माला येते. ज्या साहित्यात समाज, देश, राजकारण आणि विकासाचा विचार मांडलेला आहे, असे साहित्य राष्ट्रसंतांनी लिहिले आणि समाजासमोर मांडले; परंतु सद्यस्थितीत माणूस भौतिक संपत्तीच्या मागे धावत आहे. माणसातील माणूसपण हरवत आहे. त्यामुळे माणूस घडविण्याचे साहित्य निर्माण व्हायला हवे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक आणि अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीतर्फे स्वराज्य भवन प्रांगणातील ऋषिवर्य घुसरकर महाराज साहित्य नगरीमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या चौथ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले. यावेळी ग्रामगीता विचारपीठावर खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी, गुरुकुंज आश्रमाचे सर्व सेवाधिकारी प्रकाश महाराज वाघ, जैव राष्ट्रसंत जनसाहित्यिक डॉ. सुभाष सावरकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक पटोकार, रमेशचंद्र सरोदे, किसन पारिसे, महादेवराव भुईभार, माजी महापौर सुमन गावंडे व प्राचार्य संगीता बघेले आदींची प्रमुख उपस्थिती होती. वसंत डहाके बोलताना म्हणाले, बालपणी माझाही राष्ट्रसंतांशी संबंध आला. त्यांची भजने मी वाचली. ग्रामगीता वाचल्यावर त्यांनी काळाचा, परिस्थितीचा विचार करून साहित्य लिहिले. प्रेरणादायी आणि बोध देणारे साहित्य राष्ट्रसंतांनी निर्माण केले. त्यांच्या साहित्यामध्ये समाजाची जडणघडण, ग्रामविकास, स्वच्छता, राजकारण, देशाच्या विकासाबाबत भाष्य आहे. अंधश्रद्धेवर प्रहार करून समाजाला जागे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. देशभक्ती जागविण्यासाठीसुद्धा भजने, साहित्याचा आधार घेतला. त्यामुळेच त्यांचे साहित्य जगात पोहोचले. सुंदर आणि उपयुक्त असे साहित्य राष्ट्रसंतांनी समाजासाठी निर्माण केले, असे त्यांनी सांगितले. राज्याराज्यांमध्ये पाण्यावरून वाद होत आहे. माणसातील माणूसपण हरवत चालले आहे. त्यामुळेच समाजाला उपयुक्त अशा साहित्याची गरज आहे. त्यासाठी नवोदित साहित्यिकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी केले. आभार प्रा. डॉ. राजीव बोरकर यांनी मानले. ग्रामगीता जीवन गौरव पुरस्कार प्रदानराष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनामध्ये भजनसम्राट स्व. रामभाऊ गाडगे स्मृतिप्रीत्यर्थ ग्रामगीता जीवन गौरव पुरस्कार हभप रामधन महाराज, डॉ. भास्करराव विघे यांना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त प्रा. गोपाल मानकर, श्रीकृष्ण डांबलकर यांचा सत्कार करण्यात आला.सेंद्रिय शेतीसाठी शेतकर्‍यांना अनुदान: कृषी मंत्री फुंडकरराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा मी एक कार्यकर्ता आहे. राष्ट्रसंतांनी गोरगरीब, दु:खी, कष्टी समाजाचा विचार केला. ग्रामविकास आणि शेतीचा विकास त्यांनी ग्रामगीतेतून मांडला; परंतु थोडेबहुत राजकारणीच समाजकारण करताना दिसतात. ग्रामगीता वाचून राजकारण केले तर राष्ट्रसंतांना अपेक्षित समाज, राष्ट्र घडेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सेंद्रिय शेतीचा ग्रामगीतेतून पुरस्कार केला आहे. त्यामुळे राज्यात सेंद्रिय शेतीचा कसा विकास होईल आणि क्षेत्र कसे वाढेल, यादृष्टीने आपण प्रयत्न करू. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकर्‍यांना अनुदान उपलब्ध करून देऊ, असे मत कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी व्यक्त केले.