शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
2
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
3
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
4
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
5
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
6
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
7
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
8
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
9
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
10
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
11
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
12
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
13
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
14
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
15
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
16
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
17
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
18
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
19
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
20
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश

‘मेक इन इंडिया’ची कामगारांवर गदा?

By admin | Updated: January 25, 2015 01:06 IST

कारखानदारांना प्रोत्साहित करण्यासाठी कामगार कायद्यांची अनेक बंधने शिथिल करण्याचा प्रस्ताव राज्याच्या कामगार मंत्रालयाने केला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात सहभागी होण्यास उद्योजक आणि कारखानदारांना प्रोत्साहित करण्यासाठी कामगार कायद्यांची अनेक बंधने शिथिल करण्याचा प्रस्ताव राज्याच्या कामगार मंत्रालयाने केला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.सूत्रांनुसार इंडस्ट्रियल डिस्प्युट््स अ‍ॅक्ट, फॅक्टरीज अ‍ॅक्ट आणि कॉन्ट्र्ॅक्ट लेबर अ‍ॅक्ट यासारख्या केंद्रीय कायद्यांमध्ये राज्यापुरत्या सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. अर्थात या दुरुस्त्या आधी राज्य मंत्रिमंडळाने व नंतर विधिमंडळाने मंजूर कराव्या लागतील. त्यानंतर राष्ट्रपतींची संमती मिळाल्यावरच त्या लागू होऊ शकतील.कारखानदारीला प्रोत्साहन मिळावे यासाठी जुनाट कामगार कायद्यांमधील जाचक तरतुदी शिथिल करण्याचे धोरण भारतीय जनता पार्टीने याआधीच जाहीर केले आहे. त्यानुसार राजस्थान आणि मध्य प्रदेश या भाजपाशासित राज्यांच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रातीही कायद्यांमध्ये अशा दुरुस्त्या करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.या सुधारणा लागू झाल्या तर महाराष्ट्रातील ९५ टक्के कारखान्यांच्या मालकांना सरकारच्या पूर्वसंमतीखेरीज कारखाना बंद करण्याची अथवा कामगारांना ‘ले-आॅफ’ देण्याची अधिक सुलभपणे मुभा मिळेल. राज्यात सुमारे ४१ हजार औद्योगिक आस्थापने आहेत. त्यापैकी सुमारे ३९ हजार कारखान्यांना या प्रस्तावित सुधारणांचा लाभ होऊ शकेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक औद्योगिकरण झालेले राज्य असून, वर्ष २०१३-१४ मध्ये राज्यातील कारखानदारीचे एकूण उत्पादन २,२६७ अब्ज रुपयांचे झाले होते. सध्याच्या कायद्यांनुसार, आर्थिकष्ट्या परवडत नसल्याने उत्पादन बंद झालेले कारखाने कायमचे बंद करणे अथवा ते पुन्हा सुरू व्हावेत यासाठी कामगार कपात करणेयावर अनेक बंधने आहेत. बदललेल्या स्पर्धात्मक जगात टिकाव धरायचा असेल तर उद्योग चालविण्याचे किंवा तो बंद करण्याचे स्वातंत्र्य असायला हवे, असे उद्योजक कारखानदारांचे म्हणणे आहे. मात्र यामुळे कामगारांच्या रोजगारावर आणि नोकरीच्या स्वातंत्र्यावर गदा येणार असल्याने कामगार संघटनांचा या प्रस्तावित कायदा दुरुस्तीला विरोध आहे. (विशेष प्रतिनिधी) इंडस्ट्रियल डिस्प्युट््स अ‍ॅक्ट१सध्या १०० किंवा त्याहून अधिक कामगार नोकरीस असलेला कारखाना मालक सरकारच्या पूर्वसंमतीशिवाय बंद करू शकत नाही किंवा कामगार कपातही करू शकत नाही. ही मर्यादा वाढवून ३०० कामगार करण्याचा प्रस्ताव आहे.२सध्या सरकारने संमती दिल्यावर केल्या जाणाऱ्या कामगार कपातीत कपात केलल्या कामगारास नोकरीच्या प्रत्येक वर्षासाठी १५ दिवसांच्या पगाराएवढी भरपाई द्यावी लागते. ही रक्कम दुप्पट करून ३० दिवसांच्या पगाराएवढी करण्याचा प्रस्ताव आहे.३याहून दुप्पट म्हणजे झालेल्या नोकरीच्या प्रत्येक वर्षासाठी ६० दिवसांचा पगार भरपाई म्हणून दिला जाणार असेल, तर ३०० हून अधिक कामगार असलेल्या कारखान्यांनाही सरकारच्या पूर्वसंमतीशिवाय कामगार करू देण्याचा प्रस्ताव फॅक्टरीज अ‍ॅक्टच्सध्या विजेवर चालणाऱ्या व किमान १० कामगार असलेल्या किंवा विजेशिवाय चालणाऱ्या व किमान २० कामगार असलेल्या कारखान्यांना या कायद्यानुसार सुरक्षा उपाय व कामाच्या अटींची अनेक बंधने आहेत.च्कामगारसंख्येची ही किमान मर्यादा वाढवून विजेवर चालणाऱ्या कारखान्यांसाठी २० तर विजेशिवाय चालणाऱ्या कारखान्यांसाठी ४० अशी करण्याचा प्रस्ताव आहे.कॉन्ट्रॅक्ट लेबर अ‍ॅक्ट : सध्या या कायद्यानुसार २० किंवा त्याहून अधिक कंत्राटी कामगार असलेल्या उद्योग/ कारखान्यांना सरकारकडे नोंदणी करणे सक्तीचे आहे. ही मर्यादा वाढवून ५० किंवा त्याहून अधिक कामगार अशी करण्याचा प्रस्ताव आहे.