शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

उपचारापुरताच महाराष्ट्र दिन !

By admin | Updated: May 3, 2015 00:25 IST

नुकताच महाराष्ट्र दिन होऊन गेला. या दिवसाच्या आगेमागे महाराष्ट्र सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, राजकीय पक्ष मराठीबद्दल काही ना काही घोषणा करीत असतात.

डॉ. दीपक पवार - नुकताच महाराष्ट्र दिन होऊन गेला. या दिवसाच्या आगेमागे महाराष्ट्र सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, राजकीय पक्ष मराठीबद्दल काही ना काही घोषणा करीत असतात. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू असतो. फेसबुक - टिष्ट्वटर यासारखी माध्यमे लोकप्रिय झाल्यानंतर ‘महाराष्ट्र दिन आहे की दीन’ अशा प्रकारचे सचित्र विनोदही प्रसिद्ध होताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतलेल्या लोकांनी १ मे रोजी कामगार दिनही आहे, हे लक्षात घेऊन त्याच दिवशी महाराष्ट्राची निर्मिती व्हावी, असा आग्रह धरला. पण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा कणा असलेला हा कामगार ह्या राज्यात दूरवर फेकला गेला आहे. ज्या बहुजनांच्या विकासाचं स्वप्न अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर यांनी पाहिले आणि डफावर थाप मारून समोरच्या भारलेल्या जनतेपुढे मांडलं, त्या बहुजनांचं परिघीकरण झालं आहे. सत्तेचे आणि भांडवलदारांचे दलाल जागोजागची मचानं हेरून नेम धरून टपून बसले आहेत. श्रीमंतांना हवं असं शहर, राज्य उभारण्यासाठी २४* ७ काम चालू आहे. जवळपास सगळी प्रसारमाध्यमे याच कामाला जुंपलेली आहेत. अपवाद असतीलही, पण ते नियम सिद्ध करण्यापुरतेच आहेत. आपण सगळ््यांनी मिळून जे संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले, त्याची आता काय स्थिती आहे? मुंबई शहर पुरतं भांडवलदारांच्या घशात गेलं आहे. तीच अवस्था इतर महानगरांची आणि जिल्ह्यांच्या शहरांची आहे. रावणाला जशी दहा तोंडं तशी आमच्या राजकीय वर्गालाही आहेत. त्यातले काही चेहरे बिल्डर, विकासक यांचे आहेत. याशिवाय साखरसम्राटांपासून दूधसम्राटांपर्यंत इतर सगळे पारंपरिक चेहरे आहेतच. सगळ््यांची तालुक्यापासून राज्यापर्यंत संस्थाने आहेत. त्याचा अधिकृत-अनधिकृत काळा-पांढरा व्यवहार आहे. त्यानी उपकृत केलेल्या माणसांच्या फौजा आहेत. मध्ययुगात असलेल्या भाटचारणांप्रमाणे आजच्या युगातही भाटचारण आहेत. त्याला काधी जनसंपर्काचं तर कधी लाइझनिंगचं नाव आहे. कधी कधी आध्यात्मिक गुरूही ते काम दाम घेऊन करू लागलेत. मंत्रालयात, विधान भवनात मंत्र्यांच्या निवासस्थानाशी लागलेल्या रांगा, दलाल आणि मध्यस्थांची चिठ्ठ्याचपाट्यांची देवाणघेवाण आणि रात्री उशिरा होणारी पेटी - खोक्यांची देवाणघेवाण हे समकालीन महाराष्ट्राचे दागिने आहेत! एखाद्या माणसाला अ‍ॅलर्जी होऊन त्याचं अंग फोडांनी भरून जावं तसा महाराष्ट्राचा नकाशा सद्गुण आणि विवेकाच्या अ‍ॅलर्जीने भरून गेला आहे. म्हणूनच या राज्यात कॉ़ पानसरे, डॉ़ नरेंद्र दाभोळकरांसाख्या विवेकी लोकांना जागा नसते. पण गल्लोगल्लीच्या बाबा-बापूंना मात्र रस्ते अडवून जागा मिळतात. असं राज्य महान लोकांचं राष्ट्र असं मानणं हा गंभीर गुन्हा मानला पाहिजे. मध्यंतरी परेश मोकाशींचा एलिझाबेथ एकादशीसारखा नितांत सुंदर सिनेमा आला. त्यात राणी एलिझाबेथचा उल्लेख आला म्हणून त्या सिनेमावर बंदी घालावी, अशी मागणी वारकऱ्यांच्या पुढाऱ्यांनी केली. विठ्ठलाशी नातं सांगणाऱ्या लोकांनी इतका अडाणीपणा करावा आणि त्यांना महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी एका शब्दानेही बोलू नये, हे लाजिरवाणं आहे. दुसरीकडे जातीअंताची धुरा खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या मंडळींमध्ये जात इतकी खोलवर भिनली आहे, की आता त्यांची प्रमाणपत्रं घेतल्याशिवाय तुम्ही पुरोगामी आहात का हे तुम्हाला सिद्ध करता येत नाही. अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींप्रमाण दुर्मीळ होऊ पाहणारे समाजवादी इतकी अस्पृश्यता पाळतात, की मनुवाद्यांनीही त्यांचं अनुकरण करावं. ही सगळी माणसं समकालीन महाराष्ट्रात आहेत आणि त्यांचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करतात. मग महाराष्ट्र मोठा कसा होईल? ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले’ असं सेनापती बापटांनी म्हटले हाते आणि ते आजही आपण मिरवतो. पण कर्तृत्व, संवेदनशीलता आणि विवेक या तीनही आघाड्यांवर महाराष्ट्र मेला तर नाही ना, असा प्रश्न आपण स्वत:ला विचारला पाहिजे. गेल्या ५० वर्षांत आपण ज्ञाननिर्मिती केली का, विचारांच्या नव्या दिशा शोधल्या का, महाराष्ट्राच्या सामूहिक स्वप्नांच्या पूर्ततेसाठी निष्ठेने झटलो का, या प्रश्नांची उत्तरं देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ही उत्तरं देण्यासाठी आपण जितका वेळ लावू तितका महाराष्ट्र दिन हा उपचार होऊन बसेल; तसा तो आताही उपचार झालेला आहेच!