शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

सत्ता दिल्यास एलबीटी रद्द

By admin | Updated: July 23, 2014 00:19 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत संधी दिल्यास नोव्हेंबरअखेर स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्यात येईल. त्याऐवजी पर्यायी कर दिला जाणार नाही.

पुणो : आगामी विधानसभा निवडणुकीत संधी दिल्यास नोव्हेंबरअखेर स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्यात येईल. त्याऐवजी पर्यायी कर दिला जाणार नाही. सत्ता स्थापनेनंतरच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत त्यावर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिले. 
पूना र्मचट चेंबरतर्फे देण्यात येणा:या आदर्श व्यापारी उत्तम पुरस्काराचे वितरण फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. पंचशील रियाल्टीचे चेअरमन अतुल चोरडिया यांना राज्यस्तरीय, तर कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष व उद्योजक कृष्णकुमार गोयल यांना शहर पातळीवरील पुरस्काराने गौरविण्यात आले. बाळासाहेब कर्नावट यांना आदर्श व्यापारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महापौर चंचला कोद्रे, आमदार माधुरी मिसाळ, वेकफिल्ड कंपनीचे प्रमुख मुकेश मल्होत्र, पूना र्मचट चेंबरचे अध्यक्ष वालचंद संचेती, पूना र्मचट चेंबरचे उपाध्यक्ष प्रवीण चोरबेले, सचिव जवाहरलाल बोथरा, सहसचिव अशोक लोढा या वेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘‘जगातील बहुतांश देशांत बहुविध करप्रणाली नाही. त्यामुळे यापुढील काळात ही प्रणाली बदलावी लागेल. केवळ दोन ते तीन प्रकारच्या करप्रणाली स्वीकारून अर्थव्यवस्था संचालित करावी लागेल. व्यापा:यांना देखील विविध करप्रणालींचा त्रस होत आहे. जकात हटविताना एलबीटी हटविण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही. आगामी निवडणुकीत संधी दिल्यास पहिल्याच कॅबिनेट बैठकीत एलबीटी हटविण्यात येईल. कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा, अन्नसुरक्षा मानदे कायदा यातील त्रुटीदेखील दूर करण्यात येतील. 
देशात संक्रमणावस्था असून, उद्योग-व्यापार जगतात नैराश्याचे वातावरण आहे. त्यात आत्मविश्वासाचे वातावरण 
निर्माण केले पाहिजे. अर्थव्यवस्था संचालित करणारे, तसेच रोजगार निर्माण करणारे व्यापारीदेखील सैनिकांप्रमाणोच देशभक्त असल्याचे ध्यानात घेतले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. 
स्वत:चा मासिक ताळेबंद तयार कर, महिनाअखेरीस काय गमावले काय कमावले याचा विचार कर, असा वडिलांनी दिलेला सल्ला बिझनेस मंत्र ठरल्याचे अतुल चोरडिया यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले. 
(प्रतिनिधी)
 
4किराणा व्यवसायापासून सुरुवात करीत विविध उद्योगांची उभारणी केली. प्रामाणिकपणा व कष्टाची तयारी असल्यास कोणत्याही क्षेत्रत यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे व्यावसायिकांनी एकाच व्यवसायावर अवलंबून न राहता इतर क्षेत्रतही ठसा उमटवावा, असा सल्ला कृष्णकुमार गोयल यांनी दिला. 
 
4जकात हटविताना एलबीटी हटविण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही.
4अर्थव्यवस्था संचालित करणारे व्यापारीदेखील सैनिकांप्रमाणोच देशभक्त आहेत.