शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

वेडात दौडल्या ‘करवीर कन्या’ सात..!-लेह- लडाखची खडतर सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 20:36 IST

कोल्हापूर : एकीकडे उंचच उंच कडे, दुसºया बाजूला खोल दºया, क्षणाक्षणाला बदलणारे वातावरण, तुटलेले रस्ते, रस्त्यांतूनच वाहणारे पाणी... अशा खडतर परिस्थितीत कोल्हापूरच्या सात करवीरकन्यांनी

ठळक मुद्देस्कूटरवरून १५०० किलोमीटर प्रवासतिरंग्याला सलाम करताना आमचा ऊर भरून आला प्रवासात हिमवर्षाव सुरू झाला आणि सर्वांनाच वेगळा अनुभव मिळाला.मात्र या धाडसी महिलांनी जिद्दीने ही मोहीम पूर्ण केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : एकीकडे उंचच उंच कडे, दुसºया बाजूला खोल दºया, क्षणाक्षणाला बदलणारे वातावरण, तुटलेले रस्ते, रस्त्यांतूनच वाहणारे पाणी... अशा खडतर परिस्थितीत कोल्हापूरच्या सात करवीरकन्यांनी मनाली, लेह, लडाख, सियाचीन, कारगील असा १५०० किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास केला आणि तोही विदाउट गिअर स्कूटरने! आतापर्यंत मुख्यत: बुलेटवरून हा प्रवास पुरुष करत होते परंतू विदाऊट गिअरच्या गाड्या व महिलांनी ही सफर पहिल्यांदाच धाडसाने पूर्ण केली.

शहीद फौजदार राजू जाधव मेमोरिअल फाउंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त या साहसी प्रवास मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. फाउंडेशनचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जाधव, योगगुरू अरुण बेळगावकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आखण्यात आली होती. २ आॅगस्ट ते १८ आॅगस्ट २०१७ या कालावधीत ही मोहिम झाली. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या साहसी मोहिमेची माहिती देण्यात आली.

उद्यान रचनाकार शरयू पै, सांगली जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील, चैत्रा राजू राऊत,आर्किटेक्चरचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या जुईली शिरोडकर, वैशाली कुलकर्णी,अकौंटचे काम करणाºया उल्फत मुल्ला, डॉ. उज्ज्वला लाड, या सातजणींनी हा भीमपराक्रम करून दाखविला.

हिमाचल प्रदेशातील मंडी येथून या मोहिमेचा प्रारंभ झाला. मनालीतील वास्तव्यानंतर १३ हजार फूट उंचीवरील रोहतांग पासकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. चंद्रा व भागा नद्यांचा संगम ते पांग हा १६४ किलोमीटरचा खडतर प्रवास पूर्ण करून १६ हजार ४६५ फूट उंचीवरील लाचुंगलाकडे त्यांनी प्रयाण केले. यानंतरच्या प्रवासात हिमवर्षाव सुरू झाला आणि सर्वांनाच वेगळा अनुभव मिळाला. यानंतर लेह, सियाचीन ते परत श्रीनगर या प्रवासामध्ये या सर्वांना निसर्गाची विविध रूपं पाहायला मिळाली.

वारा आणि बर्फवर्षाव यांमुळे मातीच्या ढिगाºयांनी धारण केलेले वेगवेगळे आकार, आकाशामध्ये विविध रंगांच्या छटांचे ढग हे या सर्वांनाच खडतर प्रवासामुळे झालेले श्रम विसरायला लावत होते.या मोहिमेचे मार्गदर्शक अरुण बेळगावकर म्हणाले, आमच्यासोबतच्या या सात महिला लेह, लडाख, सियाचीन परिसरात स्कूटरने प्रवास करणार आहेत, याची माहिती मिळालेले सर्वजण आम्हांला वेड्यात काढत होते. या कमी सीसीच्या गाड्या घेऊन हे शक्य नसल्याचे ते सांगत होते. मात्र या धाडसी महिलांनी जिद्दीने ही मोहीम पूर्ण केली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जाधव म्हणाले, ‘मोहिमेच्या समारोपावेळी १५ आॅगस्टला आम्ही कारगील विजय स्मारकस्थळी उपस्थित होतो. कारगीलमध्ये शहीद झालेल्या सर्वांनाच अभिवादन करताना आणि दुसरीकडे फडक त्या तिरंग्याला सलाम करताना आमचा ऊर भरून आला होता. या मोहिमेमध्ये मेकॅनिकल महेश दैव, शार्दूल पावनगडकर, रणजित ढवळे, तुकाराम जाधव (कंदलगाव), अनिल शिरोडकर सहभागी झाले होते..राष्ट्रहिताच्या संदेशाचा प्रसारया मोहिमेमध्ये या सर्वांनीच बेटी बचाओ, स्वच्छ भारत - सुंदर भारत, सेव्ह द वॉटर या राष्ट्रहिताच्या संदेशांचाही प्रसार केला. याचेही या परिसरातील नागरिक आणि प्रवाशांनी तसेच लष्कराच्या जवानांनी कौतुक केले. जाधव यांना कंदलगावातील मुलींनी राख्या दिल्या होत्या. त्या त्यांनी जवानांनाआम्हीही करू शकतो!खडतर प्रवास, तोही स्कूटरवरून सुरू असल्याचे पाहून अनेक प्रवाशांनी आम्हांला सलाम केला. चाकोरीबाहेर जाऊनही प्रतिकूल परिस्थितीत आम्ही वेगळे काही करू शकतो, हा आत्मविश्वास या मोहिमेने दिल्याची प्रतिक्रिया या सर्वांनी व्यक्त केली.कोल्हापुरातील सात करवीर क न्यांनी आॅगस्ट महिन्यात मनाली, लेह, लडाखमध्ये स्कूटरवरून १५०० किलोमीटरचा प्रवास केला. अतिउंचावरील खारदुंगला पास (१८ हजार ३८० फूट) येथे पोहोचल्यानंतर सहभागी सर्वांनी असा आनंद व्यक्त केला.