शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डी झाली मोठी खेळाडूंचा खो-खो?

By admin | Updated: November 12, 2014 22:50 IST

रत्नागिरी जिल्हा : अनेक कंपन्यांची खेळाडूंकडे पाठ

संजय सुर्वे- शिरगाव आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीयस्तरावर रत्नागिरी जिल्ह्यातील कबड्डीपटूंची कामगिरी सामान्य जनतेला पाहायला मिळत नव्हती. मात्र, प्रो कबड्डीने अवघ्या देशात हा खेळ लोकप्रिय बनला. रत्नागिरी जिल्ह्याचे चार सुपुत्र दूरचित्रवाहिन्यांवर चमकले. मात्र, उद्योग क्षेत्राने खेळाडूंकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. कोकणात गावागावात विविध कार्यक्रमांचे औचित्याने कबड्डी स्पर्धा होतच असतात. लाखो रुपयांची उलाढाल यात होत असते. या खेळाइतके प्रेम आणि क्रीडा रसिक कोकणात अन्य खेळाला मिळालेले नाही, हे वास्तव आहे. तरीही प्रत्यक्ष खेळाडूंंच्या करिअरकडे तळमळीने व गांभीर्याने कोणीच पाहात नाही. कोणत्याही खर्चाशिवाय खेळला जाणाऱ्या खेळात चपळ, कोकणी तरुण बालपणापासून पुढे येतो. मात्र, शिकताना मंडळातून खेळत मोठा झालेला खेळाडू ज्यावेळी उद्योग व्यवसायाकडे जातो तिथे त्याचा कोणताच सन्मान होत नाही, किंबहुना जिल्ह्यात पोषक वातावरण नाही. प्रत्येक खेळाडूच्या प्रगतीमागे त्याला नोकरी, उद्योग अत्यावश्यक असतो. मात्र, खूप विनंती करुन त्यांना कंत्राटी कामगार म्हणून ठेवले जात आहे. चिपळूणच्या गुरुकुल व मंडणगडच्या नम्रता प्रतिष्ठानने खेळाडूंना आर्थिक मदतीचा हात पुढे करत किंबहुना स्वावलंबी बनवण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. याखेरीज अनेक भागात खेळणारे मंडळाचे गुणी खेळाडू केवळ कबड्डीच्या प्रेमापोटी आणि रसिकांच्या टाळ्यांवर आनंदी होत वर्षानुवर्ष खेळतात.खेळातील कौशल्य दिसताच प्रचंड कौतुक होते. मात्र, त्यांचे भविष्य मात्र तिथे घडेलच, अशी शक्यता नाही. तरीही जिद्दी खेळाडू खेळतच राहतात. खेळाडूंना अंगावर न घेण्याची भूमिका ठेवणारे उद्योग संयोजकाना मात्र, आर्थिक बळ देतात, असे दिसून येते. मुंबई, पुणे, कोल्हापूर, रायगड अशा ठिकाणी विविध कंपन्या खेळाडूंच्या खेळासोबत क्रीडा विकासाला चालना देत स्वतंत्र संघ खेळवत राहाणे प्रतिष्ठेचे मानतात. सर्वाधिक गुणी खेळाडू देणाऱ्या जिल्ह्यात मात्र कोणतीही बँक, कंपन्या प्रत्यक्ष खेळाडूच्या जीवनाला दिशा देण्यासाठी त्यांना नोकरी देत नाहीत. कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अनेक कंपन्यानी संघ पाठवावा, अशी अपेक्षा असताना जिल्ह्यातून एखादाच संघ तिथे पोहोचतो ही वस्तुस्थिती आहे. निमंत्रितांच्या राज्य स्पर्धेत नामवंत कंपन्यांचे बनियन घातलेले मजबूत खेळाडू पाहून ग्रामीण भागातील खेळाडू पुढे येत नाहीत. पण, त्यांना संधी मिळण्यास पाच पाच वर्षे वाट पाहावी लागते.नोकरी पाहिजे नोकरी...जिल्ह्यातील उद्योगांची खेळाडूंकडे पाठ.कबड्डीपटूंना कंपनीत नोकऱ्या हव्या.कंपन्यांचे संघ दुर्मीळ.केवळ कबड्डीप्रेमापोटी अनेकांचा रोजचा खेळ.स्पर्धा संयोजकांना पाठबळ.नम्रता प्रतिष्ठानने खेळाडूंना दिला आर्थिक हात.