शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

कोयनेचे पाणी मुंबईपर्यंतही नेणे शक्य

By admin | Updated: February 24, 2015 00:00 IST

रवींद्र वायकर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला गती देण्याचे आश्वासन

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला गती देणे तसेच महामार्गावरील कशेडी बोगद्याचे काम तातडीने सुरु करणे ही कामे सर्वोच्च प्राधान्याने करण्यात येतील, असा निर्धार गृहनिर्माण, उच्च, तंत्रशिक्षणमंत्री व पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. त्याचप्रमाणे कोयनेतील पाणी रत्नागिरी, रायगड, एवढेच नव्हे तर मुंबईपर्यंतही नेणे शक्य आहे, असे प्रतिपादन वायकर यांनी केले.विकास कार्यक्रमांना गती देणे तसेच तालुकास्तरावर नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी वायकर हे सोमवारी चार दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. या जिल्हा दौऱ्यात ते रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवरुख-संगमेश्वर, गुहागर येथे तालुकास्तरीय जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवणार आहेत. तत्पूर्वी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील विविध विकास योजनांच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. बैठकीत जिल्ह्यातील रस्ते विकास तसेच सिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरणावर प्रामुख्याने भर देण्यात आला. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.वायकर म्हणाले की, मुंबई - गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या मार्गाचे चौपदरीकरण तातडीने होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीची मोजणी, भूसंपादनासह येणारे सर्व अडथळे दूर केले जातील. त्यासाठी अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने आणि समन्वय ठेवून काम करावे, अशी सूचना केली. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या जमीन सीमांकनाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जमीनमोजणी आणि भूसंपादनाच्या प्रक्रियेत निधीची उपलब्धता किंवा धोरणात्मक अडचणी आल्यास त्या मंत्रालयस्तरावर तातडीने दूर करण्यात येतील, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिला.महामार्गाचे काम इंदापूर ते कशेडी, कशेडी ते ओझरखोल आणि ओझरखोल ते झाराप या तीन टप्यात सुरु असून, इंदापूर ते कशेडी हे अंतर ७७ किलोमीटरचे आहे. यापैकी १९ किलोमीटर रस्ता घाटातला असून, प्रस्तावित कशेडी बोगदा १.७२ किलोमीटरचा आहे. भविष्यातील वाहतूक वाढीचा विचार करुन येथे तीन पदरांचे दोन बोगदे असतील. यामुळे घाटातील वळणाचे अंतर कमी होईल. बोगद्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी रायगड जिल्ह्यातील भोगाव व कातळी, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी आणि खवटी या चार गावांमध्ये भूसंपादन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील कोयना, पोफळी, कोळकेवाडी आणि कोळकेवाडी टप्पा -४ या चार ठिकाणी कोयनेच्या पाण्यावर अनुक्रमे ४० मेगावॅट, ६०० मेगावॅट, ३२० मेगावॅट आणि १००० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. या १९६० मेगावॅट वीजनिर्मितीसाठी किमान ५०० ते कमाल ३ हजार एमएलडी पाणी सोडले जाते. या सोडलेल्या पाण्यापैकी अपवादवगळता जवळपास सर्व पाणी समुद्रात वाया जाते. पाण्याचा इतका मोठा अपव्यय अव्यवहार्य असून, त्यावर तोडगा काढला पाहिजे. या पाण्याचा वापर चिपळूण तालुका, तसेच रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील गावांना कसा करता येईल, याचा विचार सुरु आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील एकूण धरणांची संख्या, अपूर्ण धरणांची संख्या, कामे बंद असलेली धरणांची संख्या, धरणात उपलब्ध पाणीसाठा या सगळ्यांचा विचार करुन पाण्याचा वापर शेतीसाठी कसा वाढवता येईल, अधिकाधिक जमीन लागवडीखाली कशी आणता येईल, याचाही जलसंपदा, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचार करावा, असे त्यांनी बैठकीत सांगितले. (प्रतिनिधी)समिती स्थापणारजिल्ह्याची गरज भागवून उरलेले पाणी मुंबईसारख्या महानगराला उपलब्ध करण्याचाही विचार केला पाहिजे. ही पाणी वाहून नेण्याची योजना व्यवहार्य असून, राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून ती निश्चितपणे मार्गी लावण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.काम वेगाने सुरूकशेडी बोगद्याचे काम युद्धपातळीवर करण्याचा निर्धार.महामार्गाचे काम इंदापूर ते कशेडी, कशेडी ते ओझरखोल आणि ओझरखोल ते झाराप असे सुरु.१९ किलोमीटर रस्ता घाटातला असून, कशेडी बोगदा १.७२चा.कोयनेतील पाण्याचा वापर चिपळूण, तसेच रत्नागिरी व रायगडमधील गावांना कसा करता येईल, याचा विचार सुरु.