शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

कोयनेचे पाणी मुंबईपर्यंतही नेणे शक्य

By admin | Updated: February 24, 2015 00:00 IST

रवींद्र वायकर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला गती देण्याचे आश्वासन

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला गती देणे तसेच महामार्गावरील कशेडी बोगद्याचे काम तातडीने सुरु करणे ही कामे सर्वोच्च प्राधान्याने करण्यात येतील, असा निर्धार गृहनिर्माण, उच्च, तंत्रशिक्षणमंत्री व पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. त्याचप्रमाणे कोयनेतील पाणी रत्नागिरी, रायगड, एवढेच नव्हे तर मुंबईपर्यंतही नेणे शक्य आहे, असे प्रतिपादन वायकर यांनी केले.विकास कार्यक्रमांना गती देणे तसेच तालुकास्तरावर नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी वायकर हे सोमवारी चार दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. या जिल्हा दौऱ्यात ते रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवरुख-संगमेश्वर, गुहागर येथे तालुकास्तरीय जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवणार आहेत. तत्पूर्वी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील विविध विकास योजनांच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. बैठकीत जिल्ह्यातील रस्ते विकास तसेच सिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरणावर प्रामुख्याने भर देण्यात आला. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.वायकर म्हणाले की, मुंबई - गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या मार्गाचे चौपदरीकरण तातडीने होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीची मोजणी, भूसंपादनासह येणारे सर्व अडथळे दूर केले जातील. त्यासाठी अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने आणि समन्वय ठेवून काम करावे, अशी सूचना केली. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या जमीन सीमांकनाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जमीनमोजणी आणि भूसंपादनाच्या प्रक्रियेत निधीची उपलब्धता किंवा धोरणात्मक अडचणी आल्यास त्या मंत्रालयस्तरावर तातडीने दूर करण्यात येतील, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिला.महामार्गाचे काम इंदापूर ते कशेडी, कशेडी ते ओझरखोल आणि ओझरखोल ते झाराप या तीन टप्यात सुरु असून, इंदापूर ते कशेडी हे अंतर ७७ किलोमीटरचे आहे. यापैकी १९ किलोमीटर रस्ता घाटातला असून, प्रस्तावित कशेडी बोगदा १.७२ किलोमीटरचा आहे. भविष्यातील वाहतूक वाढीचा विचार करुन येथे तीन पदरांचे दोन बोगदे असतील. यामुळे घाटातील वळणाचे अंतर कमी होईल. बोगद्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी रायगड जिल्ह्यातील भोगाव व कातळी, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी आणि खवटी या चार गावांमध्ये भूसंपादन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील कोयना, पोफळी, कोळकेवाडी आणि कोळकेवाडी टप्पा -४ या चार ठिकाणी कोयनेच्या पाण्यावर अनुक्रमे ४० मेगावॅट, ६०० मेगावॅट, ३२० मेगावॅट आणि १००० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. या १९६० मेगावॅट वीजनिर्मितीसाठी किमान ५०० ते कमाल ३ हजार एमएलडी पाणी सोडले जाते. या सोडलेल्या पाण्यापैकी अपवादवगळता जवळपास सर्व पाणी समुद्रात वाया जाते. पाण्याचा इतका मोठा अपव्यय अव्यवहार्य असून, त्यावर तोडगा काढला पाहिजे. या पाण्याचा वापर चिपळूण तालुका, तसेच रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील गावांना कसा करता येईल, याचा विचार सुरु आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील एकूण धरणांची संख्या, अपूर्ण धरणांची संख्या, कामे बंद असलेली धरणांची संख्या, धरणात उपलब्ध पाणीसाठा या सगळ्यांचा विचार करुन पाण्याचा वापर शेतीसाठी कसा वाढवता येईल, अधिकाधिक जमीन लागवडीखाली कशी आणता येईल, याचाही जलसंपदा, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचार करावा, असे त्यांनी बैठकीत सांगितले. (प्रतिनिधी)समिती स्थापणारजिल्ह्याची गरज भागवून उरलेले पाणी मुंबईसारख्या महानगराला उपलब्ध करण्याचाही विचार केला पाहिजे. ही पाणी वाहून नेण्याची योजना व्यवहार्य असून, राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून ती निश्चितपणे मार्गी लावण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.काम वेगाने सुरूकशेडी बोगद्याचे काम युद्धपातळीवर करण्याचा निर्धार.महामार्गाचे काम इंदापूर ते कशेडी, कशेडी ते ओझरखोल आणि ओझरखोल ते झाराप असे सुरु.१९ किलोमीटर रस्ता घाटातला असून, कशेडी बोगदा १.७२चा.कोयनेतील पाण्याचा वापर चिपळूण, तसेच रत्नागिरी व रायगडमधील गावांना कसा करता येईल, याचा विचार सुरु.