शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
5
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
6
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
7
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
8
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
9
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
10
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
11
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
12
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
13
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
14
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
15
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
16
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
17
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
18
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
19
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
20
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...

आयुर्वेदाच्या जोपासनेसाठी पायाभूत सुविधा आणि संशोधन आवश्यक - श्रीपाद नाईक

By admin | Updated: June 4, 2017 13:37 IST

जगभरात आयुर्वेद उपचार पध्दती दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे पण भारताची ताकत ही आयुर्वेद आहे हे जगाला आपण

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 -   जगभरात आयुर्वेद उपचार पध्दती दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे पण भारताची ताकत ही आयुर्वेद आहे हे जगाला आपण दाखवून दिले पाहिजे . आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार जगामध्ये पोहचवणे हे आमचे ध्येय आहे , आयुर्वेद जगाच्या भल्यासाठी आहे. आयुर्वेदाची जोपासना आणि प्रचार करायचा असेल तर त्यासाठी आपली पायाभूत सुविधा आणि संशोधन बळकट केले पाहिजे असे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुंबईत आयोजित ‘साण्डू आयुर्वेद गौरव’ आणि ‘साण्डू आयुर्वेद भूषण’ पुरस्कार सोहळ्य दरम्यान म्हणाले. ११८ वर्षांची दैदिप्यमान वाटचाल करणाऱ्या ‘साण्डू’ या जगविख्यात आयुर्वेद कंपनीने आपल्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून वैद्यकीय क्षेत्रात अविरत व निःस्पृह सेवा देणाऱ्या मान्यवर वैद्यांचा सत्कार सोहळा रविवारी आयोजित केला होता.
केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आयुर्वेदाचा महिमा कायम ठेवत लाखो रुग्णांच्या आयुष्यातील दुःख कमी करण्यास हातभार लावणाऱ्या वैद्यांचा सत्कार रविवारी करण्यात आला. वैद्य अनंत धर्माधिकारी (पुणे) आणि वैद्य मदन गुलाटी (चंदिगढ) यांना ‘साण्डू आयुर्वेद गौरव’ पुरस्कार तसेच वैद्य सुविनय दामले (कुडाळ- सिंधुदुर्ग), वैद्य चंद्रकांत त्रिपाठी (जळगाव) आणि वैद्य मनोज उपाध्याय (सुरत- गुजरात) यांना ‘साण्डू आयुर्वेद भूषण’ पुरस्कार केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक व साण्डू आयुर्वेद कंपनीचे शशांक साण्डू’ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. माटुंगा येथील वेलिंगकर इन्स्टिट्यूट सभागृहात हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
आयुर्वेद हे रामबाण उपचार पध्दती करावी असे आमचे प्रयत्न आहे. भारत आणि अमेरिका आयुर्वेदाचा प्रचार वाढवण्यासाठी लवकरच सामंजस्य करणार आहे असे हि केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी पुढे सांगितले.
दिवसभर चाललेल्या या सोहळ्यात आयुर्वेदाशी संबधित विषयांवरील चर्चासत्रांचे आयोजन केले गेले. पहिल्या सत्रात “२१व्या शतकातील आयुर्वेदाची उपयुक्तता व शक्ती” या विषयावर महाराष्ट्र शासनाच्या आयुर्वेद विभागाचे संचालक वैद्य कुलदीपराज कोहली
 यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर “बदलती संस्कृती..बदलता आहार” या विषयावर वैद्य श्री सुविनय दामले (सिंधुदुर्ग) यांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. दुपारच्या दुसऱ्या सत्रात “कॅन्सर व आयुर्वेद” यावर वैद्य समीर जमदग्नी (पुणे) यांनी आपले विचार या कार्यक्रमात मांडले.
आयुर्वेद हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ब्रिटीशांच्या राजवटीच्या काळात मात्र या प्राचीन शास्त्रास तुच्छ समजण्याची प्रवृत्ती निर्माण झाली होती. पण नेमक्या याच काळात काही अत्यंत समर्पित अशा लोकांनी या अतुलनीय अशा वारशाच्या जपणूकीचा जणू ध्यास घेतला होता. या कार्यात साण्डू हे नाव आघाडीवर होते. लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी मंत्राने प्रेरित होऊन १० मे १८९९ रोजी साण्डू ब्रदर्सनी आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीमध्ये क्रांती आणण्याचे ठरविले. आयुर्वेदीक औषधांचा प्रसार आणि तळागाळातील लोकांनाही आयुर्वेदाचा लाभ या उदात्त आणि स्वच्छ हेतूंचा सतत पाठपुरावा हाच साण्डूच्या यशाचा पाया आहे. उच्च दर्जामुळे साण्डूची औषधे अत्यंत लोकप्रिय ठरली. १० मे १८९९ रोजी मुंबईत ठाकुरद्वार येथे सुरु झालेली फॅक्टरी नंतर वाढत्या मागणीच्या पूर्ततेसाठी चेंबूर येथे हलविण्यात आली असे साण्डू’ आयुर्वेद कंपनीचे शशांक साण्डू यांनी सांगितले