शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

आयुर्वेदाच्या जोपासनेसाठी पायाभूत सुविधा आणि संशोधन आवश्यक - श्रीपाद नाईक

By admin | Updated: June 4, 2017 13:37 IST

जगभरात आयुर्वेद उपचार पध्दती दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे पण भारताची ताकत ही आयुर्वेद आहे हे जगाला आपण

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 -   जगभरात आयुर्वेद उपचार पध्दती दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे पण भारताची ताकत ही आयुर्वेद आहे हे जगाला आपण दाखवून दिले पाहिजे . आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार जगामध्ये पोहचवणे हे आमचे ध्येय आहे , आयुर्वेद जगाच्या भल्यासाठी आहे. आयुर्वेदाची जोपासना आणि प्रचार करायचा असेल तर त्यासाठी आपली पायाभूत सुविधा आणि संशोधन बळकट केले पाहिजे असे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुंबईत आयोजित ‘साण्डू आयुर्वेद गौरव’ आणि ‘साण्डू आयुर्वेद भूषण’ पुरस्कार सोहळ्य दरम्यान म्हणाले. ११८ वर्षांची दैदिप्यमान वाटचाल करणाऱ्या ‘साण्डू’ या जगविख्यात आयुर्वेद कंपनीने आपल्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून वैद्यकीय क्षेत्रात अविरत व निःस्पृह सेवा देणाऱ्या मान्यवर वैद्यांचा सत्कार सोहळा रविवारी आयोजित केला होता.
केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आयुर्वेदाचा महिमा कायम ठेवत लाखो रुग्णांच्या आयुष्यातील दुःख कमी करण्यास हातभार लावणाऱ्या वैद्यांचा सत्कार रविवारी करण्यात आला. वैद्य अनंत धर्माधिकारी (पुणे) आणि वैद्य मदन गुलाटी (चंदिगढ) यांना ‘साण्डू आयुर्वेद गौरव’ पुरस्कार तसेच वैद्य सुविनय दामले (कुडाळ- सिंधुदुर्ग), वैद्य चंद्रकांत त्रिपाठी (जळगाव) आणि वैद्य मनोज उपाध्याय (सुरत- गुजरात) यांना ‘साण्डू आयुर्वेद भूषण’ पुरस्कार केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक व साण्डू आयुर्वेद कंपनीचे शशांक साण्डू’ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. माटुंगा येथील वेलिंगकर इन्स्टिट्यूट सभागृहात हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
आयुर्वेद हे रामबाण उपचार पध्दती करावी असे आमचे प्रयत्न आहे. भारत आणि अमेरिका आयुर्वेदाचा प्रचार वाढवण्यासाठी लवकरच सामंजस्य करणार आहे असे हि केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी पुढे सांगितले.
दिवसभर चाललेल्या या सोहळ्यात आयुर्वेदाशी संबधित विषयांवरील चर्चासत्रांचे आयोजन केले गेले. पहिल्या सत्रात “२१व्या शतकातील आयुर्वेदाची उपयुक्तता व शक्ती” या विषयावर महाराष्ट्र शासनाच्या आयुर्वेद विभागाचे संचालक वैद्य कुलदीपराज कोहली
 यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर “बदलती संस्कृती..बदलता आहार” या विषयावर वैद्य श्री सुविनय दामले (सिंधुदुर्ग) यांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. दुपारच्या दुसऱ्या सत्रात “कॅन्सर व आयुर्वेद” यावर वैद्य समीर जमदग्नी (पुणे) यांनी आपले विचार या कार्यक्रमात मांडले.
आयुर्वेद हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ब्रिटीशांच्या राजवटीच्या काळात मात्र या प्राचीन शास्त्रास तुच्छ समजण्याची प्रवृत्ती निर्माण झाली होती. पण नेमक्या याच काळात काही अत्यंत समर्पित अशा लोकांनी या अतुलनीय अशा वारशाच्या जपणूकीचा जणू ध्यास घेतला होता. या कार्यात साण्डू हे नाव आघाडीवर होते. लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी मंत्राने प्रेरित होऊन १० मे १८९९ रोजी साण्डू ब्रदर्सनी आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीमध्ये क्रांती आणण्याचे ठरविले. आयुर्वेदीक औषधांचा प्रसार आणि तळागाळातील लोकांनाही आयुर्वेदाचा लाभ या उदात्त आणि स्वच्छ हेतूंचा सतत पाठपुरावा हाच साण्डूच्या यशाचा पाया आहे. उच्च दर्जामुळे साण्डूची औषधे अत्यंत लोकप्रिय ठरली. १० मे १८९९ रोजी मुंबईत ठाकुरद्वार येथे सुरु झालेली फॅक्टरी नंतर वाढत्या मागणीच्या पूर्ततेसाठी चेंबूर येथे हलविण्यात आली असे साण्डू’ आयुर्वेद कंपनीचे शशांक साण्डू यांनी सांगितले