शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

साथीचे आजार रोखण्यास यंत्रणा अपुरी

By admin | Updated: May 17, 2016 01:43 IST

चिकुनगुनिया व डेंगीसारख्या डासांपासून प्रसार होणाऱ्या साथीच्या रोगांच्या नियंत्रणासाठी महापालिकेने तितिकीशी प्रभावी व पुरेशी यंत्रणा राबवलेली नाही

येरवडा : पुणे हे राज्यातील अतिशय महत्त्वाचे शहर आहे, मात्र चिकुनगुनिया व डेंगीसारख्या डासांपासून प्रसार होणाऱ्या साथीच्या रोगांच्या नियंत्रणासाठी महापालिकेने तितिकीशी प्रभावी व पुरेशी यंत्रणा राबवलेली नाही. पुण्याच्या तुलनेत मुंबई, सोलापूर व पिंंपरी-चिंचवडसारख्या शहरांसह राज्याच्या ग्रामीण भागामध्येही अशा रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना होत असल्या तरी शहरात रोगनियंत्रणासाठी आवश्यक असलेले सर्वेक्षण व त्यानंतरच्या उपाययोजनांसाठी आवश्यक कर्मचारी (आॅन फिल्ड स्टाफ) पुणे महापालिकेकडे कमी प्रमाणात आहे, त्यामुळेच कदाचित शहरात चिकुनगुनिया व डेंगीच्या रुग्णांचे प्रमाण इतर शहरांच्या तुलनेत जास्त असल्याचे मत राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने यावर्षीपासून १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंगी दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात राज्यभर करण्यात आलेल्या उपाययोजना व उपक्रमांची माहिती देण्यासाठी विश्रांतवाडीजवळील आरोग्य विभागाच्या उपसंचालनालयामध्ये (परिवर्तन) आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. जगताप यांनी ही माहिती दिली. या वेळी सहायक संचालक डॉ. बाळकृष्ण कांबळे, डॉ. हेमंत जोशी, भावना चौधरी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, कीटकशास्त्रज्ञ बी. आर. माने उपस्थित होते. पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. सोमनाथ परदेशींना आपण अनेक वेळा पत्रे पाठवून सूचना केल्या आहेत. तसेच आपल्या विभागाचे अधिकारी त्यांना भेटले आहेत, मात्र परदेशी त्यांची जबाबदारी कनिष्ठांवर ढकलतात, तसेच त्यांच्या कनिष्ठांकडूनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप डॉ. जगताप यांनी केला. (वार्ताहर)।झिकाचा रुग्ण आपल्याकडे नाहीउत्तर अमेरिकेसारख्या थंड हवामान असलेल्या देशामध्ये आढळलेला झिका विषाणूचा रुग्ण अद्याप आपल्याकडे तरी दिसून आलेला नाही. त्यामुळे या विषाणूचा आपल्याकडे अजिबात प्रसार झालेला नाही. तरीही परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळ प्राधिकरण व राज्याच्या आरोग्य विभागाकडून तपासणी करण्याची खबरदारी घेतली जात असल्याचे कांचन जगताप यांनी सांगितले.शहरी भागात जास्त रुग्ण चिकुनगुनिया व डेंगीचे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अधिक रुग्ण आढळतात. यावर्षी जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यांत राज्यात डेंगीचे ५६४ रुग्ण आढळले आहेत, तर यामध्ये एकाचाही मृत्यू झालेला नाही. याच कालावधीत केरळमध्ये ९७९, तामिळनाडूत ८९४, कर्नाटकमध्ये ८६४ तर गुजरातमध्ये डेंगीचे ३३७ रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ५६४ रुग्णांपैकी ग्रामीण भागातील २६९ तर शहरी भागातील ३९५ रुग्ण आहेत. सन २०१४ मध्ये राज्यात डेंगीचा उद्रेक झाला होता. त्यावर्षी राज्यात ८५७३ रुग्णांना डेंगी झाला तर यामध्ये १४४ जण दगावले होते. त्यानंतर केलेल्या उपाययोजनांमुळे सन २०१५ मध्ये डेंगीच्या रुग्णांचा आकडा ५११९ वर आला तर त्यावर्षी ३३ जण यामुळे दगावले होते.