शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

साथीचे आजार रोखण्यास यंत्रणा अपुरी

By admin | Updated: May 17, 2016 01:43 IST

चिकुनगुनिया व डेंगीसारख्या डासांपासून प्रसार होणाऱ्या साथीच्या रोगांच्या नियंत्रणासाठी महापालिकेने तितिकीशी प्रभावी व पुरेशी यंत्रणा राबवलेली नाही

येरवडा : पुणे हे राज्यातील अतिशय महत्त्वाचे शहर आहे, मात्र चिकुनगुनिया व डेंगीसारख्या डासांपासून प्रसार होणाऱ्या साथीच्या रोगांच्या नियंत्रणासाठी महापालिकेने तितिकीशी प्रभावी व पुरेशी यंत्रणा राबवलेली नाही. पुण्याच्या तुलनेत मुंबई, सोलापूर व पिंंपरी-चिंचवडसारख्या शहरांसह राज्याच्या ग्रामीण भागामध्येही अशा रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना होत असल्या तरी शहरात रोगनियंत्रणासाठी आवश्यक असलेले सर्वेक्षण व त्यानंतरच्या उपाययोजनांसाठी आवश्यक कर्मचारी (आॅन फिल्ड स्टाफ) पुणे महापालिकेकडे कमी प्रमाणात आहे, त्यामुळेच कदाचित शहरात चिकुनगुनिया व डेंगीच्या रुग्णांचे प्रमाण इतर शहरांच्या तुलनेत जास्त असल्याचे मत राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने यावर्षीपासून १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंगी दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात राज्यभर करण्यात आलेल्या उपाययोजना व उपक्रमांची माहिती देण्यासाठी विश्रांतवाडीजवळील आरोग्य विभागाच्या उपसंचालनालयामध्ये (परिवर्तन) आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. जगताप यांनी ही माहिती दिली. या वेळी सहायक संचालक डॉ. बाळकृष्ण कांबळे, डॉ. हेमंत जोशी, भावना चौधरी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, कीटकशास्त्रज्ञ बी. आर. माने उपस्थित होते. पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. सोमनाथ परदेशींना आपण अनेक वेळा पत्रे पाठवून सूचना केल्या आहेत. तसेच आपल्या विभागाचे अधिकारी त्यांना भेटले आहेत, मात्र परदेशी त्यांची जबाबदारी कनिष्ठांवर ढकलतात, तसेच त्यांच्या कनिष्ठांकडूनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप डॉ. जगताप यांनी केला. (वार्ताहर)।झिकाचा रुग्ण आपल्याकडे नाहीउत्तर अमेरिकेसारख्या थंड हवामान असलेल्या देशामध्ये आढळलेला झिका विषाणूचा रुग्ण अद्याप आपल्याकडे तरी दिसून आलेला नाही. त्यामुळे या विषाणूचा आपल्याकडे अजिबात प्रसार झालेला नाही. तरीही परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळ प्राधिकरण व राज्याच्या आरोग्य विभागाकडून तपासणी करण्याची खबरदारी घेतली जात असल्याचे कांचन जगताप यांनी सांगितले.शहरी भागात जास्त रुग्ण चिकुनगुनिया व डेंगीचे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अधिक रुग्ण आढळतात. यावर्षी जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यांत राज्यात डेंगीचे ५६४ रुग्ण आढळले आहेत, तर यामध्ये एकाचाही मृत्यू झालेला नाही. याच कालावधीत केरळमध्ये ९७९, तामिळनाडूत ८९४, कर्नाटकमध्ये ८६४ तर गुजरातमध्ये डेंगीचे ३३७ रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ५६४ रुग्णांपैकी ग्रामीण भागातील २६९ तर शहरी भागातील ३९५ रुग्ण आहेत. सन २०१४ मध्ये राज्यात डेंगीचा उद्रेक झाला होता. त्यावर्षी राज्यात ८५७३ रुग्णांना डेंगी झाला तर यामध्ये १४४ जण दगावले होते. त्यानंतर केलेल्या उपाययोजनांमुळे सन २०१५ मध्ये डेंगीच्या रुग्णांचा आकडा ५११९ वर आला तर त्यावर्षी ३३ जण यामुळे दगावले होते.