शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

साथीचे आजार रोखण्यास यंत्रणा अपुरी

By admin | Updated: May 17, 2016 01:43 IST

चिकुनगुनिया व डेंगीसारख्या डासांपासून प्रसार होणाऱ्या साथीच्या रोगांच्या नियंत्रणासाठी महापालिकेने तितिकीशी प्रभावी व पुरेशी यंत्रणा राबवलेली नाही

येरवडा : पुणे हे राज्यातील अतिशय महत्त्वाचे शहर आहे, मात्र चिकुनगुनिया व डेंगीसारख्या डासांपासून प्रसार होणाऱ्या साथीच्या रोगांच्या नियंत्रणासाठी महापालिकेने तितिकीशी प्रभावी व पुरेशी यंत्रणा राबवलेली नाही. पुण्याच्या तुलनेत मुंबई, सोलापूर व पिंंपरी-चिंचवडसारख्या शहरांसह राज्याच्या ग्रामीण भागामध्येही अशा रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना होत असल्या तरी शहरात रोगनियंत्रणासाठी आवश्यक असलेले सर्वेक्षण व त्यानंतरच्या उपाययोजनांसाठी आवश्यक कर्मचारी (आॅन फिल्ड स्टाफ) पुणे महापालिकेकडे कमी प्रमाणात आहे, त्यामुळेच कदाचित शहरात चिकुनगुनिया व डेंगीच्या रुग्णांचे प्रमाण इतर शहरांच्या तुलनेत जास्त असल्याचे मत राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने यावर्षीपासून १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंगी दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात राज्यभर करण्यात आलेल्या उपाययोजना व उपक्रमांची माहिती देण्यासाठी विश्रांतवाडीजवळील आरोग्य विभागाच्या उपसंचालनालयामध्ये (परिवर्तन) आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. जगताप यांनी ही माहिती दिली. या वेळी सहायक संचालक डॉ. बाळकृष्ण कांबळे, डॉ. हेमंत जोशी, भावना चौधरी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, कीटकशास्त्रज्ञ बी. आर. माने उपस्थित होते. पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. सोमनाथ परदेशींना आपण अनेक वेळा पत्रे पाठवून सूचना केल्या आहेत. तसेच आपल्या विभागाचे अधिकारी त्यांना भेटले आहेत, मात्र परदेशी त्यांची जबाबदारी कनिष्ठांवर ढकलतात, तसेच त्यांच्या कनिष्ठांकडूनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप डॉ. जगताप यांनी केला. (वार्ताहर)।झिकाचा रुग्ण आपल्याकडे नाहीउत्तर अमेरिकेसारख्या थंड हवामान असलेल्या देशामध्ये आढळलेला झिका विषाणूचा रुग्ण अद्याप आपल्याकडे तरी दिसून आलेला नाही. त्यामुळे या विषाणूचा आपल्याकडे अजिबात प्रसार झालेला नाही. तरीही परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळ प्राधिकरण व राज्याच्या आरोग्य विभागाकडून तपासणी करण्याची खबरदारी घेतली जात असल्याचे कांचन जगताप यांनी सांगितले.शहरी भागात जास्त रुग्ण चिकुनगुनिया व डेंगीचे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अधिक रुग्ण आढळतात. यावर्षी जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यांत राज्यात डेंगीचे ५६४ रुग्ण आढळले आहेत, तर यामध्ये एकाचाही मृत्यू झालेला नाही. याच कालावधीत केरळमध्ये ९७९, तामिळनाडूत ८९४, कर्नाटकमध्ये ८६४ तर गुजरातमध्ये डेंगीचे ३३७ रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ५६४ रुग्णांपैकी ग्रामीण भागातील २६९ तर शहरी भागातील ३९५ रुग्ण आहेत. सन २०१४ मध्ये राज्यात डेंगीचा उद्रेक झाला होता. त्यावर्षी राज्यात ८५७३ रुग्णांना डेंगी झाला तर यामध्ये १४४ जण दगावले होते. त्यानंतर केलेल्या उपाययोजनांमुळे सन २०१५ मध्ये डेंगीच्या रुग्णांचा आकडा ५११९ वर आला तर त्यावर्षी ३३ जण यामुळे दगावले होते.