शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीचे घोडे अडले दक्षिणोत

By admin | Updated: September 20, 2014 02:06 IST

शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीची अंतिम टप्प्यावरील चर्चा आजवर निवडून न आलेल्या जागांच्या अदलाबदलीवर येऊन ठेपली आहे.

वसंत भोसले - कोल्हापूर
शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीची अंतिम टप्प्यावरील चर्चा आजवर निवडून न आलेल्या जागांच्या अदलाबदलीवर येऊन ठेपली आहे. हा मुद्दा विचारात घेतला, तर दक्षिण महाराष्ट्रामधील 26 विधानसभा मतदारसंघांपैकी 14 मतदारसंघांच्या अदलाबदलाची चर्चा करावी लागणार आहे. जे मतदारसंघ शिवसेना किंवा भाजपाकडे असून केव्हाही जिंकलेले नाहीत. त्यामुळे या चर्चेच्या अडलेल्या घोडय़ाचा पाय दक्षिण महाराष्ट्रात अडकलेला आहे काय? अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे. 
दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात दहा, तर सांगली आणि सातारा जिल्ह्यांत प्रत्येकी आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी आठ शिवसेनेकडे, तर दोन भाजपाकडे आहेत. भाजपाने इचलकरंजीमध्ये गतनिवडणुकीतच विजय नोंदविला आहे. तर दक्षिण कोल्हापूर त्यांना जिंकता आलेला नाही. शिवसेनेकडे कोल्हापूर शहर, करवीर, कागल, चंदगड, राधानगरी, शिरोळ, हातकणंगले आणि शाहूवाडी हे आठ मतदारसंघ आहेत. त्यापैकी चंदगड, राधानगरी आणि शिरोळमध्ये त्यांना केव्हाही यश मिळालेले नाही. महायुतीमध्ये सामील झालेल्या स्वाभिमानी संघटनेने हे तिन्ही मतदारसंघ आता मागितलेले आहेत. त्यामुळे 
सेनेचे आता तीन मतदारसंघ कमी होणार आहेत. सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार भाजपाकडे, तर चार शिवसेनेकडे आहेत. भाजपाने सांगली, मिरज आणि जतमध्ये गतनिवडणुकीत विजय नोंदविला. ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात भाजपाला केव्हाच विजय मिळविता आलेला नाही. युती झाल्यापासून गेल्या 25 वर्षात शिवसेनेला सांगली जिल्ह्यात एकही जागा जिंकता आलेली नाही. तासगाव, खानापूर, पलूस-कडेगाव आणि शिराळा या मतदारसंघात भाजपाला तगडे उमेदवार मिळू शकतात, पण खानापूरचा अपवाद वगळता इतर मतदारसंघ शिवसेना सोडण्यास तयार नाही. तासगावमधून गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या विरोधात माजी मंत्री अजितराव घोरपडे भाजपाकडून इच्छुक आहेत. त्यांनी नुकताच प्रवेशही केला आहे, पण ही जागा शिवसेनेकडे आहे. पलूस-कडेगावमध्ये वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या विरोधात माजी आमदार पृथ्वीराज देशमुख भाजपाकडून लढण्यास तयार आहेत, पण ही जागा देखील शिवसेनेकडे आहे. खानापूरमधून कॉँग्रेसचे आमदार सदाशिवराव पाटील यांच्या विरोधात शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल बाबर लढणार आहेत. त्यांनी नुकताच प्रवेशही केलेला आहे.
साता:यात आठपैकी चार जागा सेना व भाजपाकडे आहेत. त्यापैकी सातारा आणि माण या जागा पूर्वी भाजपाने एकवेळ जिंकलेल्या आहेत. दक्षिण आणि उत्तर क:हाड या जागा भाजपाला जिंकता आलेल्या नाहीत.  शिवसेनेकडे कोरेगाव, वाई, फलटण आणि पाटण या जागा आहेत. त्यापैकी केवळ पाटणमधून शंभूराजे देसाई यांनी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या विरोधात विजय मिळविला आहे. महायुतीत स्वाभिमानी संघटनेची भर पडली असून, त्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील 7 जागांवर हक्क सांगितला आहे, त्या कोणत्या पक्षाच्या कोटय़ातून द्यायच्या यावरूनही महायुतीमध्ये ताण-तणाव चालू आहे. ज्या जागा जिंकलेल्या नाहीत त्यावर महायुतीचे घोडे अडले आहे. त्यामध्ये सर्वाधिक वाटा दक्षिण महाराष्ट्राचा आहे. शिवाय राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध अधिक यश मिळेल या अपेक्षेने महायुतीतील अनेक घटक पक्ष अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी आपली बाजू लावून धरत आहेत, त्यामुळे ही कोंडी निर्माण झाली आहे.
 
दक्षिण महाराष्ट्रातील 26 पैकी 14 जागा (शिवसेना-1क् तर भाजपा-4) त्या-त्या पक्षाला केव्हाही जिंकता आलेल्या नाहीत. येथेच वाटणीवरून युतीमध्ये रस्सीखेच चालू आहे.
 
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नाराज माजी आमदार
-मंत्री महायुतीकडे जाऊ इच्छितात, पण त्यांचा अधिकाधिक कल भाजपाकडेच आहे. पण भाजपाकडे देण्यासाठी मतदारसंघच नाहीत.
 
26 पैकी 1क् जागांवर आजर्पयत भाजपा लढत आलेला आहे. तर शिवसेना उर्वरित 16 जागांवर लढली आहे.