शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

महायुतीचे घोडे अडले दक्षिणोत

By admin | Updated: September 20, 2014 02:06 IST

शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीची अंतिम टप्प्यावरील चर्चा आजवर निवडून न आलेल्या जागांच्या अदलाबदलीवर येऊन ठेपली आहे.

वसंत भोसले - कोल्हापूर
शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीची अंतिम टप्प्यावरील चर्चा आजवर निवडून न आलेल्या जागांच्या अदलाबदलीवर येऊन ठेपली आहे. हा मुद्दा विचारात घेतला, तर दक्षिण महाराष्ट्रामधील 26 विधानसभा मतदारसंघांपैकी 14 मतदारसंघांच्या अदलाबदलाची चर्चा करावी लागणार आहे. जे मतदारसंघ शिवसेना किंवा भाजपाकडे असून केव्हाही जिंकलेले नाहीत. त्यामुळे या चर्चेच्या अडलेल्या घोडय़ाचा पाय दक्षिण महाराष्ट्रात अडकलेला आहे काय? अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे. 
दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात दहा, तर सांगली आणि सातारा जिल्ह्यांत प्रत्येकी आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी आठ शिवसेनेकडे, तर दोन भाजपाकडे आहेत. भाजपाने इचलकरंजीमध्ये गतनिवडणुकीतच विजय नोंदविला आहे. तर दक्षिण कोल्हापूर त्यांना जिंकता आलेला नाही. शिवसेनेकडे कोल्हापूर शहर, करवीर, कागल, चंदगड, राधानगरी, शिरोळ, हातकणंगले आणि शाहूवाडी हे आठ मतदारसंघ आहेत. त्यापैकी चंदगड, राधानगरी आणि शिरोळमध्ये त्यांना केव्हाही यश मिळालेले नाही. महायुतीमध्ये सामील झालेल्या स्वाभिमानी संघटनेने हे तिन्ही मतदारसंघ आता मागितलेले आहेत. त्यामुळे 
सेनेचे आता तीन मतदारसंघ कमी होणार आहेत. सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार भाजपाकडे, तर चार शिवसेनेकडे आहेत. भाजपाने सांगली, मिरज आणि जतमध्ये गतनिवडणुकीत विजय नोंदविला. ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात भाजपाला केव्हाच विजय मिळविता आलेला नाही. युती झाल्यापासून गेल्या 25 वर्षात शिवसेनेला सांगली जिल्ह्यात एकही जागा जिंकता आलेली नाही. तासगाव, खानापूर, पलूस-कडेगाव आणि शिराळा या मतदारसंघात भाजपाला तगडे उमेदवार मिळू शकतात, पण खानापूरचा अपवाद वगळता इतर मतदारसंघ शिवसेना सोडण्यास तयार नाही. तासगावमधून गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या विरोधात माजी मंत्री अजितराव घोरपडे भाजपाकडून इच्छुक आहेत. त्यांनी नुकताच प्रवेशही केला आहे, पण ही जागा शिवसेनेकडे आहे. पलूस-कडेगावमध्ये वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या विरोधात माजी आमदार पृथ्वीराज देशमुख भाजपाकडून लढण्यास तयार आहेत, पण ही जागा देखील शिवसेनेकडे आहे. खानापूरमधून कॉँग्रेसचे आमदार सदाशिवराव पाटील यांच्या विरोधात शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल बाबर लढणार आहेत. त्यांनी नुकताच प्रवेशही केलेला आहे.
साता:यात आठपैकी चार जागा सेना व भाजपाकडे आहेत. त्यापैकी सातारा आणि माण या जागा पूर्वी भाजपाने एकवेळ जिंकलेल्या आहेत. दक्षिण आणि उत्तर क:हाड या जागा भाजपाला जिंकता आलेल्या नाहीत.  शिवसेनेकडे कोरेगाव, वाई, फलटण आणि पाटण या जागा आहेत. त्यापैकी केवळ पाटणमधून शंभूराजे देसाई यांनी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या विरोधात विजय मिळविला आहे. महायुतीत स्वाभिमानी संघटनेची भर पडली असून, त्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील 7 जागांवर हक्क सांगितला आहे, त्या कोणत्या पक्षाच्या कोटय़ातून द्यायच्या यावरूनही महायुतीमध्ये ताण-तणाव चालू आहे. ज्या जागा जिंकलेल्या नाहीत त्यावर महायुतीचे घोडे अडले आहे. त्यामध्ये सर्वाधिक वाटा दक्षिण महाराष्ट्राचा आहे. शिवाय राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध अधिक यश मिळेल या अपेक्षेने महायुतीतील अनेक घटक पक्ष अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी आपली बाजू लावून धरत आहेत, त्यामुळे ही कोंडी निर्माण झाली आहे.
 
दक्षिण महाराष्ट्रातील 26 पैकी 14 जागा (शिवसेना-1क् तर भाजपा-4) त्या-त्या पक्षाला केव्हाही जिंकता आलेल्या नाहीत. येथेच वाटणीवरून युतीमध्ये रस्सीखेच चालू आहे.
 
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नाराज माजी आमदार
-मंत्री महायुतीकडे जाऊ इच्छितात, पण त्यांचा अधिकाधिक कल भाजपाकडेच आहे. पण भाजपाकडे देण्यासाठी मतदारसंघच नाहीत.
 
26 पैकी 1क् जागांवर आजर्पयत भाजपा लढत आलेला आहे. तर शिवसेना उर्वरित 16 जागांवर लढली आहे.