शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारचे पुनश्च हरिओम, पहिला दिवस रांगेचा अन् गर्दीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 08:41 IST

पुनश्च हरिओमच्या तिसºया टप्प्याला सोमवारी दहा टक्के मनुष्यबळाने कार्यालये सुरू झाली.

मुंबई/ ठाणे/ पालघर/ नवी मुंबई/ अलिबाग : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन-अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळ लॉकडाऊनमध्ये काढल्यानंतर सोमवारपासून ‘अनलॉक’चा पुढचा टप्पा सुरू झाला. मात्र सार्वजनिक वाहतुकीची पुरेशी सोय नसल्याने कार्यालये गाठण्यासाठी निघालेल्यांचे अतोनात हाल झाले. सकाळपासूनच ठिकठिकाणी गर्दी, लांबचलांब रांगा आणि वाहतूककोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागला.

मुंबईच्या जनजीवनाने कोरोनापूर्व काळ गाठला. लोकल वाहतूक, शॉपिंग मॉल व प्रार्थनास्थळे बंद होती, हाच अपवाद आजच्या गर्दीत होता. मास्कचा अपवाद वगळता नेहमीची लगबग, घाई, वाहतूककोंडी, गर्दीचे चित्र मुंबईसह उपनगरांत व ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. मुंबईत कामासाठी येताना दोन ते पाच तास लावाव्या लागलेल्या रांगा, नंतर वाहतूक कोंडी व घरी परतताना पुन्हा त्याच स्थितीत अडकून नोकरदारांचे हाल झाले. रेल्वे वाहतूक बंद असल्याने रस्ते वाहतुकीच्या मर्यादांमुळे अनेकांना कार्यालयात पोहोचण्यासाठी पाच ते सात तास कसरत करावी लागली. ठाणे, डोंबिवली, कल्याण ते कर्जत, कसारा, भार्इंदर, वसई-विरार, पनवेल, नवी मुंबई या परिसरातून मुंबईकडे येणारे मेटाकुटीला आले. एसटी, परिवहन सेवा, खासगी टॅक्सी या अपुऱ्या पडल्या. पुनश्च हरिओमच्या तिसºया टप्प्याला सोमवारी दहा टक्के मनुष्यबळाने कार्यालये सुरू झाली. खासगी व प्रवासी वाहनांना परवानगी आहे.

अपेक्षित उपस्थिती नाहीनवी मुंबईकरांनीही बसची संख्याही कमी असल्यामुळे खासगी वाहनांना प्राधान्य दिले. तर नवी मुंबईतील अनेक कार्यालयांमध्येही बाहेरून येणाºया अनेकांना पोहोचण्यात अडचणी आल्या. त्यामुळे येथील कार्यालयांमध्ये अपेक्षित उपस्थिती नव्हती.ठाण्यात वाहनांची, डोंबिवलीत प्रवाशांची रांगठाणे जिल्ह्यातील अनेकांना खासगी वाहनाने मुंबई गाठावी लागली.त्यामुळे सकाळी ७ ते १० दरम्यान पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर टोलनाका परिसरात मुंबई व ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे दिवा, कल्याण-डोंबिवली आदी ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत बससेवा तोकडी पडल्याचे पाहायला मिळाले.बस पकडण्यासाठी डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकात कर्मचाºयांची सुमारे दोन किलोमीटरपर्यंत रांग लागली होती. बसमध्ये चढण्यासाठी अनेकांना दोन ते पाच तास रांगेत उभे राहावे लागल्याने त्यांचे हाल झाले. या रांगातही सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला. मीरा रोड- भार्इंदरमध्येही अशाच रांगा पाहायला मिळाल्या.बससाठी चढाओढबसथांब्यावर शारीरिक अंतर पाळणारे मुंबईकर बसमध्ये चढताना मात्र नेहमीप्रमाणे झुंबड करत असल्याचे ठिकठिकाणी दिसून आले. कोरोनापूर्व काळातील सवयीप्रमाणे झटापट, धक्काबुक्की करतच बसचे स्वागत होत असल्याचे पाहायला मिळाले.वसई-विरारमध्ये सकाळपासूनच झुंबडवसई-विरारमधून मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांची सकाळपासूनच झुंबड उडाली होती. विरार, नालासोपारा तसेच वसई येथून मुंबईला जाणाºया एसटी बसकरिता काही किलोमीटरच्या रांगा लागल्याने प्रवाशांना अनेक तास ताटकळत उभे राहावे लागले. दरम्यान, या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडालेला दिसला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई