शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

राज्य सरकारचे पुनश्च हरिओम, पहिला दिवस रांगेचा अन् गर्दीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 08:41 IST

पुनश्च हरिओमच्या तिसºया टप्प्याला सोमवारी दहा टक्के मनुष्यबळाने कार्यालये सुरू झाली.

मुंबई/ ठाणे/ पालघर/ नवी मुंबई/ अलिबाग : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन-अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळ लॉकडाऊनमध्ये काढल्यानंतर सोमवारपासून ‘अनलॉक’चा पुढचा टप्पा सुरू झाला. मात्र सार्वजनिक वाहतुकीची पुरेशी सोय नसल्याने कार्यालये गाठण्यासाठी निघालेल्यांचे अतोनात हाल झाले. सकाळपासूनच ठिकठिकाणी गर्दी, लांबचलांब रांगा आणि वाहतूककोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागला.

मुंबईच्या जनजीवनाने कोरोनापूर्व काळ गाठला. लोकल वाहतूक, शॉपिंग मॉल व प्रार्थनास्थळे बंद होती, हाच अपवाद आजच्या गर्दीत होता. मास्कचा अपवाद वगळता नेहमीची लगबग, घाई, वाहतूककोंडी, गर्दीचे चित्र मुंबईसह उपनगरांत व ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. मुंबईत कामासाठी येताना दोन ते पाच तास लावाव्या लागलेल्या रांगा, नंतर वाहतूक कोंडी व घरी परतताना पुन्हा त्याच स्थितीत अडकून नोकरदारांचे हाल झाले. रेल्वे वाहतूक बंद असल्याने रस्ते वाहतुकीच्या मर्यादांमुळे अनेकांना कार्यालयात पोहोचण्यासाठी पाच ते सात तास कसरत करावी लागली. ठाणे, डोंबिवली, कल्याण ते कर्जत, कसारा, भार्इंदर, वसई-विरार, पनवेल, नवी मुंबई या परिसरातून मुंबईकडे येणारे मेटाकुटीला आले. एसटी, परिवहन सेवा, खासगी टॅक्सी या अपुऱ्या पडल्या. पुनश्च हरिओमच्या तिसºया टप्प्याला सोमवारी दहा टक्के मनुष्यबळाने कार्यालये सुरू झाली. खासगी व प्रवासी वाहनांना परवानगी आहे.

अपेक्षित उपस्थिती नाहीनवी मुंबईकरांनीही बसची संख्याही कमी असल्यामुळे खासगी वाहनांना प्राधान्य दिले. तर नवी मुंबईतील अनेक कार्यालयांमध्येही बाहेरून येणाºया अनेकांना पोहोचण्यात अडचणी आल्या. त्यामुळे येथील कार्यालयांमध्ये अपेक्षित उपस्थिती नव्हती.ठाण्यात वाहनांची, डोंबिवलीत प्रवाशांची रांगठाणे जिल्ह्यातील अनेकांना खासगी वाहनाने मुंबई गाठावी लागली.त्यामुळे सकाळी ७ ते १० दरम्यान पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर टोलनाका परिसरात मुंबई व ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे दिवा, कल्याण-डोंबिवली आदी ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत बससेवा तोकडी पडल्याचे पाहायला मिळाले.बस पकडण्यासाठी डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकात कर्मचाºयांची सुमारे दोन किलोमीटरपर्यंत रांग लागली होती. बसमध्ये चढण्यासाठी अनेकांना दोन ते पाच तास रांगेत उभे राहावे लागल्याने त्यांचे हाल झाले. या रांगातही सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला. मीरा रोड- भार्इंदरमध्येही अशाच रांगा पाहायला मिळाल्या.बससाठी चढाओढबसथांब्यावर शारीरिक अंतर पाळणारे मुंबईकर बसमध्ये चढताना मात्र नेहमीप्रमाणे झुंबड करत असल्याचे ठिकठिकाणी दिसून आले. कोरोनापूर्व काळातील सवयीप्रमाणे झटापट, धक्काबुक्की करतच बसचे स्वागत होत असल्याचे पाहायला मिळाले.वसई-विरारमध्ये सकाळपासूनच झुंबडवसई-विरारमधून मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांची सकाळपासूनच झुंबड उडाली होती. विरार, नालासोपारा तसेच वसई येथून मुंबईला जाणाºया एसटी बसकरिता काही किलोमीटरच्या रांगा लागल्याने प्रवाशांना अनेक तास ताटकळत उभे राहावे लागले. दरम्यान, या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडालेला दिसला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई