शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

राज्य सरकारचे पुनश्च हरिओम, पहिला दिवस रांगेचा अन् गर्दीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 08:41 IST

पुनश्च हरिओमच्या तिसºया टप्प्याला सोमवारी दहा टक्के मनुष्यबळाने कार्यालये सुरू झाली.

मुंबई/ ठाणे/ पालघर/ नवी मुंबई/ अलिबाग : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन-अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळ लॉकडाऊनमध्ये काढल्यानंतर सोमवारपासून ‘अनलॉक’चा पुढचा टप्पा सुरू झाला. मात्र सार्वजनिक वाहतुकीची पुरेशी सोय नसल्याने कार्यालये गाठण्यासाठी निघालेल्यांचे अतोनात हाल झाले. सकाळपासूनच ठिकठिकाणी गर्दी, लांबचलांब रांगा आणि वाहतूककोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागला.

मुंबईच्या जनजीवनाने कोरोनापूर्व काळ गाठला. लोकल वाहतूक, शॉपिंग मॉल व प्रार्थनास्थळे बंद होती, हाच अपवाद आजच्या गर्दीत होता. मास्कचा अपवाद वगळता नेहमीची लगबग, घाई, वाहतूककोंडी, गर्दीचे चित्र मुंबईसह उपनगरांत व ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. मुंबईत कामासाठी येताना दोन ते पाच तास लावाव्या लागलेल्या रांगा, नंतर वाहतूक कोंडी व घरी परतताना पुन्हा त्याच स्थितीत अडकून नोकरदारांचे हाल झाले. रेल्वे वाहतूक बंद असल्याने रस्ते वाहतुकीच्या मर्यादांमुळे अनेकांना कार्यालयात पोहोचण्यासाठी पाच ते सात तास कसरत करावी लागली. ठाणे, डोंबिवली, कल्याण ते कर्जत, कसारा, भार्इंदर, वसई-विरार, पनवेल, नवी मुंबई या परिसरातून मुंबईकडे येणारे मेटाकुटीला आले. एसटी, परिवहन सेवा, खासगी टॅक्सी या अपुऱ्या पडल्या. पुनश्च हरिओमच्या तिसºया टप्प्याला सोमवारी दहा टक्के मनुष्यबळाने कार्यालये सुरू झाली. खासगी व प्रवासी वाहनांना परवानगी आहे.

अपेक्षित उपस्थिती नाहीनवी मुंबईकरांनीही बसची संख्याही कमी असल्यामुळे खासगी वाहनांना प्राधान्य दिले. तर नवी मुंबईतील अनेक कार्यालयांमध्येही बाहेरून येणाºया अनेकांना पोहोचण्यात अडचणी आल्या. त्यामुळे येथील कार्यालयांमध्ये अपेक्षित उपस्थिती नव्हती.ठाण्यात वाहनांची, डोंबिवलीत प्रवाशांची रांगठाणे जिल्ह्यातील अनेकांना खासगी वाहनाने मुंबई गाठावी लागली.त्यामुळे सकाळी ७ ते १० दरम्यान पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर टोलनाका परिसरात मुंबई व ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे दिवा, कल्याण-डोंबिवली आदी ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत बससेवा तोकडी पडल्याचे पाहायला मिळाले.बस पकडण्यासाठी डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकात कर्मचाºयांची सुमारे दोन किलोमीटरपर्यंत रांग लागली होती. बसमध्ये चढण्यासाठी अनेकांना दोन ते पाच तास रांगेत उभे राहावे लागल्याने त्यांचे हाल झाले. या रांगातही सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला. मीरा रोड- भार्इंदरमध्येही अशाच रांगा पाहायला मिळाल्या.बससाठी चढाओढबसथांब्यावर शारीरिक अंतर पाळणारे मुंबईकर बसमध्ये चढताना मात्र नेहमीप्रमाणे झुंबड करत असल्याचे ठिकठिकाणी दिसून आले. कोरोनापूर्व काळातील सवयीप्रमाणे झटापट, धक्काबुक्की करतच बसचे स्वागत होत असल्याचे पाहायला मिळाले.वसई-विरारमध्ये सकाळपासूनच झुंबडवसई-विरारमधून मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांची सकाळपासूनच झुंबड उडाली होती. विरार, नालासोपारा तसेच वसई येथून मुंबईला जाणाºया एसटी बसकरिता काही किलोमीटरच्या रांगा लागल्याने प्रवाशांना अनेक तास ताटकळत उभे राहावे लागले. दरम्यान, या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडालेला दिसला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई