शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारे यांचा शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा

By admin | Updated: June 2, 2017 12:41 IST

खाजगी कर्ज शेतकरी फेडू शकत नसल्यामुळे नैराश्य येऊन तो आत्महत्या करतो आहे.

ऑनलाइन लोकमत 
अहमदनगर/पारनेर, दि. 2-   शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खर्चावर आधारित हमी भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज किंवा इतर खाजगी कर्ज शेतकरी फेडू शकत नसल्यामुळे नैराश्य येऊन तो आत्महत्या करतो आहे. अनेक वर्षे सातत्याने हे सुरू आहे. पण सहन करण्यालाही काही सीमा असतात. जेव्हा सहन करण्याची क्षमता संपते तेव्हा शेतकरी नाइलाजास्तव रस्त्यावर उतरतो आणि सरकारला विनंती करुन सांगतो की मी माझ्या परिवारासाठी तसेच माझ्याजवळ असणाऱ्या माझ्या गाई, बैल आणि इतर पशुधन वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. अशा वेळी सरकारने सहानभुतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे, असे हजारे यांनी म्हटले आहे.
 
जेव्हा सरकार शेतकऱ्यांच्या सहनशिलतेला दाद देत नसेल तेव्हा त्याला नाइलाजाने कायदा हातात घेण्याची वेळ येते. असे घडणे हे समाज, राज्य व राष्ट्र हिताचे नसते. त्यातून कधी कधी आपणच आपल्या हाताने आपलेच नुकसान करुन घेत असतो. कारण राष्ट्रीय संपत्ती ही आपलीच संपत्ती आहे. म्हणून अशा गोष्टी घडू नयेत यासाठी आंदोलनकर्त्यांनी संयम ठेऊन शांततेने आंदोलन करणे आवश्यक आहे. तसेच शासनाने वेळीच विचार करून शेतकऱ्यांच्या मागण्यांची योग्य ती दखल घ्यायला हवी.
 
मी शेतकऱ्याच्या घरात जन्म घेतला आहे. शेती मालाला रास्त बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याची कशी वाताहत होते ते मी लहानपणापासून माझ्या घरातच अनुभवले आहे. आम्ही आमच्या संस्थेतर्फे नुकतेच गेल्या दहा महिन्यात मिरची, शेवगा, काकडी यासारखी पिके घेतली. सुधारीत पद्धतीने सेंद्रीय शेती केली. पण शेतीमालाला भाव नसल्याने दीड लाख रुपये खर्च करुन प्रत्यक्षात पंचवीस हजार रुपये सुद्धा उत्पन्न मिळाले नाही. संस्था म्हणून आम्ही सहन केले. मात्र ज्या शेतकऱ्याने बँकेचे कर्ज किंवा इतर लोकांचे कर्ज घेऊन शेती उत्पन्नासाठी खर्च केला आणि उत्पन्न मिळाले नाही किंवा मिळालेल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळाला नाही तर अशा परिस्थितीत नैराश्यापोटी आत्महत्या करण्याशिवाय त्याला दुसरा पर्याय राहत नाही.
 
जे शेतकरी आंदोलनामध्ये उतरले आहेत त्यांना होणाऱ्या वेदनांची मला जाणीव आहे. म्हणूनच मी शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भूमि अधिग्रहण बिलाच्या विरोधात दिल्लीत आंदोलने केली व सरकारला ते बील मागे घ्यावे लागले. आंदोलन करताना कुठेही हिंसा न करता अहिंसेच्या मार्गाने शांततापूर्ण आंदोलन व्हावे असे वाटते. मी गेली पस्तीस वर्षे समाजहितासाठी वेगवेगळी शांततापूर्ण व अहिंसक आंदोलने करीत आलो आहे. म्हणून सरकारला ती आंदोलने मोडून काढता आली नाहीत. याउलट आंदोलनामुळे त्यांना समाजहिताचे निर्णय घ्यावे लागले आहेत.
या आंदोलना संबंधाने काही कार्यकर्ते दोन वेळा माझ्याकडे आले होते. या कार्यकर्त्यांसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झालेल्या आहेत. अहिंसेच्या मार्गाने घटना, कायदे, नियम या सर्व गोष्टींचा विचार करुन आंदोलनाची प्रदीर्घ कालावधीसाठी दिशा ठरवून आंदोलन होणे आवश्यक वाटते. मी या आंदोलनाशी सहमत आहे. कारण अशी आंदोलने करणे घटनेने जनतेला दिलेला मूलभूत अधिकार आहे. त्याचप्रमाणे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी माझी दोन वेळा यासंबंधी फोनवर चर्चा झालेली आहे. त्यांनी आश्वासन दिले असून ते चर्चेला तयार आहेत. हा प्रश्न कसा सोडवायचा याची चर्चा करता येऊ शकेल. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार असेल तर मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सदर बैठकीसाठी उपस्थित राहू शकेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व शेतीमालाला खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी पुढील काळात राजकारण विरहित प्रदीर्घ आंदोलनाची दिशा ठरवीणे आवश्यक वाटते.