शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हरिनामे गर्जला चंद्रभागातीर!

By admin | Updated: July 15, 2016 03:33 IST

अनंत तीर्थांच्या माहेरात कटेवर हात ठेवून उभ्या असलेल्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी मैलोन् मैलाची पायपीट करत अखंड हरिनामाचा गजर करत विविध संत-सज्जनांच्या पालख्यांसह

बाळासाहेब बोचरे,  पंढरपूरअनंत तीर्थांच्या माहेरात कटेवर हात ठेवून उभ्या असलेल्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी मैलोन् मैलाची पायपीट करत अखंड हरिनामाचा गजर करत विविध संत-सज्जनांच्या पालख्यांसह नऊ लाख वैष्णवांची मांदियाळी गुरुवारी चंद्रभागातीरी विसावली. अखंड हरिनाम व टाळ-मृदंगांच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून गेली.गेले १५-२० दिवस विविध पालख्यांसोबत पायपीट करत वैष्णवांचा दळभार पंढरीकडे वाटचाल करत होता. संत निवृत्तीनाथ व संत मुक्ताबाई तसेच संत गजानन महाराज यांच्या पालख्या नवमीलाच पंढरीत दाखल झाल्या होत्या. त्यांच्यासमवेत व इतर मिळून चार लाख भाविक पंढरीत दाखल झाले होते. गुरुवारी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत सोपानदेव या प्रमुख पालख्यांसह दिंड्या-दिंड्यांमधून सुमारे चार लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. याशिवाय रेल्वे, बस व खासगी वाहनांनीही वारकरी आले आहेत. सुमारे ९ लाख भाविकांची सध्या पंढरीत दाटी झाली असून, त्यांच्या मुखातून सदा ज्ञानोबा-तुकारामचा जयघोष ऐकायला मिळत आहे. विठ्ठलाला केवळ ६५ मिनिटांची विश्रांतीएकादशीच्या दिवशी विठ्ठलभक्तांचा जसा उपवास असतो तसाच देवाचाही उपवास असतो. त्यामुळे एकादशीच्या पूर्वरात्री मंदिर समितीकडून होणाऱ्या पूजेनंतर विठ्ठलाला भगरीचा तर रुक्मिणीमातेला साबुदाण्याचा नैवेद्य दाखविण्यात येतो. यासाठी विशेष कारण नसले तरी ही परंपरा आजही जोपासली जाते. पूजेनिमित्त पांडुरंगाला २४ तासात केवळ ६५ मिनिटांची विश्रांती मिळते.आषाढी यात्रेच्या काळात पंधरा दिवस देवाचे रोज नित्योपचार थांबवून चोवीस तासांचा वेळ केवळ दर्शनासाठी ठेवण्यात येतो. आषाढी एकादशीच्या पूर्वरात्री अर्थात दशमीच्या रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मंदिर समितीच्या वतीने विठ्ठलाची पाद्यपूजा होते. त्यामध्ये देवाच्या पायावर पाणी ओतून हळदी-कुंकू वाहून पूजा करण्यात येते. त्यानंतर संकल्प सोडला जातो. सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना होते. पहाटे पावणेदोनच्या सुमारास देवाला पंचामृताचा अभिषेक होतो. मूर्तीच्या संवर्धनासाठी डोक्यावरून पाण्याने अभिषेक तर पायावर पंचामृताने अभिषेक होतो. देवाच्या वस्त्राने अंग पुसून नवे वस्त्र परिधान केल्यावर चंदनाचा टिळा लावून, देवाला आरसा दाखविण्यात येतो व विठ्ठलाला भगरीचा नैवेद्य दाखविण्यात येतो, हाच विधी त्याच वेळेत रुक्मिणीमातेच्या पूजेत होतो. सकाळी ११.०० च्या सुमारास देवाला महानैवेद्य दाखविण्यात येतो. ज्यात साबुदाणा खीर, गोड भगर, साधी भगर, शेंगा आमटी, बटाटा खीर असे उपवासाचेच पदार्थ असतात. हा नैवेद्याचा विधी सुमारे पंधरा मिनिटे चालतो. त्यानंतर पुन्हा दर्शन सुरू होते ते रात्री साडेआठपर्यंत अखंड सुरू राहते.शीण घालविण्यासाठी लिंबू-सरबतरात्री साडेआठच्या सुमारास गंधअक्षता हा विधी होतो. त्यावेळी देवाचा चेहरा ओल्या वस्त्राने पुसून पुन्हा चंदन टिळा लावण्यात येतो व देवाला लिंबू-सरबत देऊन शीण कमी केला जातो. या विधीनंतर पुन्हा एकदा देव पहाटे नित्यपूजेपर्यंत दर्शनासाठी विटेवर उभा राहतो. विठ्ठलाच्या आरतीनंतर पहाटे २.२५ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजेला सुरुवात होते. ३.३० वाजता पुन्हा दर्शन सुरु करण्यात येते. शितोळे सरकारांच्या गळ्यात पादुकासंत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण इसबावी येथे झाले. त्यानंतर पालखी सोहळ्याचे मानकरी अंकली श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात पादुका देण्यात आल्या. त्यांच्या एका बाजूला वासकर व दुसऱ्या बाजूला मालक आरफळकर असा पारंपरिक पायी सोहळ््याने पादुका मंदिरापर्यंत नेण्यात आल्या.दुष्काळामुळे १० टक्के गर्दी घटण्याची शक्यता गतवर्षी पडलेल्या दुष्काळाच्या खाईतून शेतकरी अजून सावरला नसल्याने त्याचा यंदाच्या आषाढीवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. वारकऱ्यांची गर्दी किमान १० टक्के घटेल, असा अंदाज आहे.