शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
4
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
5
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
6
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
7
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
8
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
9
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
10
Mhada: पैसे घेतले, पण घर दिलेच नाही; म्हाडाच्या एजन्सीनेच लोकांना फसवले!
11
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
12
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
13
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
14
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
15
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
16
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
17
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
18
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
19
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
20
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...

केंद्रीय पथकास शेतकऱ्यांचा घेराव

By admin | Updated: November 21, 2015 02:19 IST

दुष्काळी भागांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले असून, त्यांनी शुक्रवारी मराठवाड्यासह अहमदनगर, नाशिक आणि जळगावमधील काही भागांना

मुंबई : दुष्काळी भागांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले असून, त्यांनी शुक्रवारी मराठवाड्यासह अहमदनगर, नाशिक आणि जळगावमधील काही भागांना भेट दिली. तेथे पथकाला शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागले. बीड तसेच जळगावमध्ये त्यांना घेरावही घालण्यात आला.मराठवाड्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकांनी शुक्रवारी दोन दिवसीय पाहणीस प्रारंभ केला. विशेष म्हणजे, दौऱ्यातील पाहणीची ठिकाणे निश्चित नव्हती. अधिकाऱ्यांना वाटले तेथे थांबून त्यांनी पाहणी केली. या पथकात केंद्रीय कृषी मंत्रालयाचे आयुक्त डॉ. एस.के. मल्होत्रा, केंद्रीय कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ. आर.पी. सिंग, केंद्रीय पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. एच.आर. खन्ना, राज्याचे अपर मुख्य सचिव (कृषी) डी.के. जैन, राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक सुहास दिवसे आदींची उपस्थिती होती.मात्र या दौऱ्यादरम्यान शेतकरी आक्रमक झाले होते. मागच्या रब्बीचा पीक विमा अजून मिळाला नाही. लागवडीचा खर्चही निघेना. मुलींचे शिक्षण, लग्न करायचे तरी कसे? खासगी तसेच बँकांची कर्जे फेडावी कशी? रब्बीचे पीकही हातचे गेले, पिण्यास पाणी, जनावरांना चारा केव्हा देणार, यांसारखे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले.बीडमध्ये पथकास घेरावदुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी वर्षभरात तिसऱ्यांदा आलेल्या केंद्रीय पथकाच्या गाडीला कोळगाव येथे घेराव घालत ‘पाहणी करण्यासाठी तीन-तीनवेळा येता आणि मदतीचा पत्ता नाही. आम्हाला मदत करा नाहीतर गोळ्या घालून मारा,’ असे म्हणत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. (प्रतिनिधी)नगरमध्ये धावता दौरादुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दुसऱ्यांदा केंद्रीय पथक नगरमध्ये दाखल झाले आहे़ या पथकाने केलवड (ता़ राहाता), नान्नज दुमाला (ता़ संगमनेर) या गावांची पाहणी केली़ आता ते शनिवारी दक्षिण नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघणार आहे़ या पथकात नीति आयोगाचे उपसल्लागार मानस चौधरी आणि ऊर्जा मंत्रालयाच्या वीज प्राधिकरणाचे उपसचिव संतनू बिश्वास यांचा समावेश आहे.नाशिकमध्ये पाहणीचा ‘सोपस्कार’केंद्रीय पथकाच्या सदस्यांचा नाशिक जिल्ह्याच्या पाहणीचा ‘सोपस्कार’ शुक्रवारी पार पडला. तीन तालुक्यांच्या टंचाईग्रस्त गावांची समितीतील अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्याचा अहवाल केंद्राला सादर करणार असल्याचे सदस्यांनी जाहीर केले असले तरी त्यांच्या विविध शंकांचे निरसन करताना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र होते. हे पथक सायंकाळी सिन्नर तालुक्यात दाखल झाले. तालुक्यातील दोडी खुर्द गावात पोहोचेपर्यंत अंधार झाल्याने पथकाने अंधारातच पाहणी केली.

जळगावातही आक्रमक केंद्रीय पथकातील सदस्य व नाशिक विभागाचे कृषी सहसंचालक डॉ. कैलास मोते यांना शेलवड ता. बोदवड येथील शेतकऱ्यांनी घेराव घातला आणि शेतात दाणा उगवला नसताना तुम्ही ४९ पैसे आणेवारी कशी लावली, असा जाब विचारला. अचानक झालेल्या या प्रकाराने अधिकारी वर्ग आवक झाला. आम्हाला पिण्याचे पाणीही वेळेवर मिळत नसल्याची व्यथा या शेतकऱ्यांनी महसूल व कृषी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे मांडली. त्यानंतर हे पथक जामनेरकडे मार्गस्थ झाले.