शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीचे दार ‘स्मार्टसिटी’ने खुलणार

By admin | Updated: May 14, 2015 00:31 IST

मनपाचा प्रस्ताव तयार : लोकसंख्येचा निकष पूर्ण करण्यासाठी संभाव्य गावांशी चर्चा करून पुनर्प्रस्ताव पाठविणार

संतोष पाटील -कोल्हापूर -राजकीय विरोधामुळे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला गेली तीन दशके राज्य शासनाने ‘खो’ घातला आहे. शहराजवळील १७ गावांसह हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाने फेटाळल्यानंतर महापालिकेच्या नगररचना विभागात आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशाने शहरालगत असणाऱ्या एक ते दोन किलोमीटर परिसरातील सर्व गावांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे.महापालिका हद्दीपासून या परिसरात किती गावे समाविष्ट करून घेता येऊ शकतील, याची शास्त्रीय पद्धतीने माहिती संकलन करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. शहराची हद्दवाढ न झाल्याने लोकसंख्येच्या निकषावर मिळणाऱ्या केंद्र सरकारच्या हजारो कोटी रुपयांच्या निधीस आतापर्यंत शहर मुकले आहे. केंद्र व राज्याच्या लोकसंख्या निकषाच्या आधारावर मिळणाऱ्या निधीचे महत्त्व समजावून सांगत संभाव्य गावांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आयुक्त पी. शिवशंकर यांनी सुरू केला आहे.शहराच्या हद्दीपासून एक ते दोन किलोमीटर परिसरात गांधीनगर, पाचगाव, उचगाव, कळंबा, मोरेवाडी, कंदलगाव अशी आठ ते दहा मोठी गावे येतात. ही सर्व गावे ७० टक्के शहरावरच अवलंबून आहेत. या गावांचा पहिल्या टप्प्यात हद्दवाढीत समावेश केला जाणार आहे. मनपा प्रशासनाने सर्व प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे. स्मार्ट सिटी संकल्पनेची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होताच या प्रक्रियेला गती येणार आहे.केंद्र शासन देशभरात शंभराहून अधिक ‘स्मार्ट शहरां’ची निर्मिती करणार आहे. या शहरांना पायाभूूत सुविधांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध होणार आहे. मात्र, या ‘स्मार्ट सिटी’मध्ये समावेश होण्यासाठी लोक संख्या हा महत्त्वाचा निकष आहे. हा निकष पूर्ण करण्यासाठी कोल्हापूर महापालिका सरसावली असून, शहराजवळील आठ ते दहा मोठी गावे समाविष्ट करण्यासाठी नगररचना विभागाने सर्वेक्षणही पूर्ण केले आहे. राजकीय हट्टामुळे रखडलेली हद्दवाढीची दारे ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून खुली होऊ शकतात. स्मार्ट सिटीचे फायदेसंपूर्ण शहराचा कायापालट होणारस्वच्छ, सुंदर, शाश्वत विकासाला प्राधान्य देणाऱ्या शहरांचा उदयई-गव्हर्नन्स पद्धतीने प्रशासकीय कारभारलालफितीच्या कारभारास फाटानागरिकांची सुरक्षा व सहभागास प्राधान्यजलद व पारदर्शक सेवांवर भरपर्यटनविकासाला चालनाकचऱ्यापासून इंधन व ऊर्जानिर्मितीला प्राधान्यसांडपाण्यावर १०० टक्के प्रक्रिया पार्किंग व वाहतुकीचे सुयोग्य नियोजननव्या प्रस्तावातील संभाव्य गावेकळंबा, उचगाव, पाचगाव, मोरेवाडी-कंदलगाव, गांधीनगर, मुडशिंगी, वळिवडे, चिंंचवाड, वसगडे, आदी लहान-मोठी नऊ ते दहा गावांसाठीचा नवा प्रस्ताव तयार करून तो राज्य शासनास सादर केला जाणार आहे. ‘स्मार्ट सिटी’साठी आवश्यक लोकसंख्येचा निकषही पूर्ण होईल व शहराजवळील ही गावे विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील, अशी योजना असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. ‘स्मार्ट सिटी’साठी आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या शहरास केंद्र सरकारकडून दरवर्षी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी उपलब्ध होईल. हा निधी किमान पाच वर्षे मिळणार आहे. पायाभूत सुविधांमध्ये प्रगती झाल्याने शहराचे पर्यायाने नागरिकांचे राहणीमान व दरडोई उत्पन्न आपोआपच वाढणार आहे.