शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

आजोबांची जमीन ३६ वर्षांनी वारसाहक्काने नातवंडांना!

By admin | Updated: April 23, 2017 01:30 IST

दगडाबाई उर्फ दगडाबाई शेखलाल पिंजारी हिचा जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील पाच हेक्टर शेतजमिनीवरील वारसाहक्काने मालकी अखेर तिच्या मृत्यूनंतर

मुंबई : दगडाबाई उर्फ दगडाबाई शेखलाल पिंजारी हिचा जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील पाच हेक्टर शेतजमिनीवरील वारसाहक्काने मालकी अखेर तिच्या मृत्यूनंतर अंतिमत: सिद्ध झाली असून, तिच्या वारसांना या जमिनीचा ताबा आणि मालकी मिळणार आहे.चोपड्या तालुक्याच्या वर्डी गावातील गट क्र. ५०५ (जुना सर्व्हे क्र. ७१)मधील पाच हेक्टर २८ आर शेतजमिनीवर अब्बास उर्फ गुलाब रुस्तम वंजारी याने केलेला प्रतिदावा सर्वोच्च न्यायालयात न्या. आर. के. अगरवाल व न्या. अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठाने अमान्य केल्याने दगडाबाईला मरणोत्तर न्याय मिळाला. ही शेतजमीन रुस्तम नाथू पिंजारी या मुस्लीम व्यक्तीच्या मालकीची होती. सन १९८०च्या सुमारास मृत्युपत्र न करता रुस्तम पिंजारी यांचे निधन झाले. शेखलाल पिंजारी यांच्याशी विवाह झालेली दगडाबाई ही त्यांची एकमेव मुलगी व वारस. वारसाहक्काने वडिलांची शेतजमीन तिला मिळायला हवी होती, परंतु रुस्तम यांचे आपण दत्तकपुत्र आहोत, असे सांगत अब्बास उर्फ गुलाब पिंजारी याने प्रतिदावा केला आणि या जमिनीच्या मालकीचा व ताब्याचा वाद सुरू झाला.दगडाबाईने या जमिनीवर वारसाहक्काने आपली मालकी सिद्ध करण्यासाठी व ताबा मिळण्यासाठी १९८१ मध्ये चोपडा येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. त्या न्यायालयाने आॅगस्ट १९९८३मध्ये दगडाबाईच्या बाजूने निकाल दिला व अब्बासचा जमिनीवर कोणताही हक्क नाही, असे जाहीर केले. याविरुद्ध अब्बासने केलेले फर्स्ट अपील अंमळनेरच्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनीही सप्टेंबर १९९० मध्ये फेटाळले. याविरुद्ध अब्बासने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे केलेले सेकंड अपील १७ वर्षे प्रलंबित राहिले. एप्रिल २००७ मध्ये न्या. व्ही. आर. किंगावकर यांनी अब्बासचे अपील मंजूर करून खालच्या दोन्ही न्यायालयांनी दगडाबाईच्या बाजूने दिलेले निकाल रद्द केले. हा निकाल लागेपर्यंत दगडाबाईचे निधन झाल्याने तिच्या वारसांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले. त्या न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करून खालच्या दोन्ही न्यायालयांचे निकाल कायम केले. त्यामुळे रुस्तम यांच्या निधनानंतर जी जमीन वारसाहक्काने दगडाबाई या त्यांच्या एकुलत्या एक मुलीस मिळायची होती, ती तिच्याही निधनानंतर तिच्या मुलांना म्हणजे रुस्तमच्या नातवंडांना मिळाली.ही जमीन १२ वर्षांहून अधिक काळ आपल्या कब्जेवहिवाटीत असल्याने ‘अ‍ॅडव्हर्स पझेशन’ने ती आपल्या मालकीची झाली आहे, असा अब्बासचा दावा होता, परंतु तो अमान्य करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, जमिनीवरील आपली कब्जेवहिवाट व ताबा अब्बास पुराव्यानिशी सिद्ध करू शकला नाही. शिवाय ‘अ‍ॅडव्हर्स पझेशन’चा दावा करणाऱ्याने जमिनीवरील मूळ मालकाची मालकी मान्य करणे आवश्यक असते, कारण तोच त्याच्या दाव्याचा मूळ आधार असतो, परंतु प्रस्तुत प्रकरणात अब्बासने दगडाबाईची मालकी नाकारली आहे.या सुनावणीत दगडाबाईच्या वारसांतर्फे अ‍ॅड. अंशुमन अनिमेश यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)मुस्लिमांमध्ये दत्तक कसे?मुस्लीम व्यक्तिगत कायद्यात मूल दत्तक घेण्याची कुठेही तरतूद नाही. त्यामुळे अब्बासने जमिनीवर हक्क सांगताना आपण रुस्तम यांचा दत्तकपुत्र आहोत, हा केलेला दावाच निराधार आणि पोकळ होता. खालच्या दोन्ही न्यायालयांनी अब्बासचा दावा नाकारताना हाही मुद्दा विचारात घेतला होता. मात्र उच्च न्यायालयाने याकडे दुर्लक्ष करून अब्बासच्या बाजूने निकाल दिला होता.