शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

आजोबांची जमीन ३६ वर्षांनी वारसाहक्काने नातवंडांना!

By admin | Updated: April 23, 2017 01:30 IST

दगडाबाई उर्फ दगडाबाई शेखलाल पिंजारी हिचा जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील पाच हेक्टर शेतजमिनीवरील वारसाहक्काने मालकी अखेर तिच्या मृत्यूनंतर

मुंबई : दगडाबाई उर्फ दगडाबाई शेखलाल पिंजारी हिचा जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील पाच हेक्टर शेतजमिनीवरील वारसाहक्काने मालकी अखेर तिच्या मृत्यूनंतर अंतिमत: सिद्ध झाली असून, तिच्या वारसांना या जमिनीचा ताबा आणि मालकी मिळणार आहे.चोपड्या तालुक्याच्या वर्डी गावातील गट क्र. ५०५ (जुना सर्व्हे क्र. ७१)मधील पाच हेक्टर २८ आर शेतजमिनीवर अब्बास उर्फ गुलाब रुस्तम वंजारी याने केलेला प्रतिदावा सर्वोच्च न्यायालयात न्या. आर. के. अगरवाल व न्या. अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठाने अमान्य केल्याने दगडाबाईला मरणोत्तर न्याय मिळाला. ही शेतजमीन रुस्तम नाथू पिंजारी या मुस्लीम व्यक्तीच्या मालकीची होती. सन १९८०च्या सुमारास मृत्युपत्र न करता रुस्तम पिंजारी यांचे निधन झाले. शेखलाल पिंजारी यांच्याशी विवाह झालेली दगडाबाई ही त्यांची एकमेव मुलगी व वारस. वारसाहक्काने वडिलांची शेतजमीन तिला मिळायला हवी होती, परंतु रुस्तम यांचे आपण दत्तकपुत्र आहोत, असे सांगत अब्बास उर्फ गुलाब पिंजारी याने प्रतिदावा केला आणि या जमिनीच्या मालकीचा व ताब्याचा वाद सुरू झाला.दगडाबाईने या जमिनीवर वारसाहक्काने आपली मालकी सिद्ध करण्यासाठी व ताबा मिळण्यासाठी १९८१ मध्ये चोपडा येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. त्या न्यायालयाने आॅगस्ट १९९८३मध्ये दगडाबाईच्या बाजूने निकाल दिला व अब्बासचा जमिनीवर कोणताही हक्क नाही, असे जाहीर केले. याविरुद्ध अब्बासने केलेले फर्स्ट अपील अंमळनेरच्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनीही सप्टेंबर १९९० मध्ये फेटाळले. याविरुद्ध अब्बासने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे केलेले सेकंड अपील १७ वर्षे प्रलंबित राहिले. एप्रिल २००७ मध्ये न्या. व्ही. आर. किंगावकर यांनी अब्बासचे अपील मंजूर करून खालच्या दोन्ही न्यायालयांनी दगडाबाईच्या बाजूने दिलेले निकाल रद्द केले. हा निकाल लागेपर्यंत दगडाबाईचे निधन झाल्याने तिच्या वारसांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले. त्या न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करून खालच्या दोन्ही न्यायालयांचे निकाल कायम केले. त्यामुळे रुस्तम यांच्या निधनानंतर जी जमीन वारसाहक्काने दगडाबाई या त्यांच्या एकुलत्या एक मुलीस मिळायची होती, ती तिच्याही निधनानंतर तिच्या मुलांना म्हणजे रुस्तमच्या नातवंडांना मिळाली.ही जमीन १२ वर्षांहून अधिक काळ आपल्या कब्जेवहिवाटीत असल्याने ‘अ‍ॅडव्हर्स पझेशन’ने ती आपल्या मालकीची झाली आहे, असा अब्बासचा दावा होता, परंतु तो अमान्य करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, जमिनीवरील आपली कब्जेवहिवाट व ताबा अब्बास पुराव्यानिशी सिद्ध करू शकला नाही. शिवाय ‘अ‍ॅडव्हर्स पझेशन’चा दावा करणाऱ्याने जमिनीवरील मूळ मालकाची मालकी मान्य करणे आवश्यक असते, कारण तोच त्याच्या दाव्याचा मूळ आधार असतो, परंतु प्रस्तुत प्रकरणात अब्बासने दगडाबाईची मालकी नाकारली आहे.या सुनावणीत दगडाबाईच्या वारसांतर्फे अ‍ॅड. अंशुमन अनिमेश यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)मुस्लिमांमध्ये दत्तक कसे?मुस्लीम व्यक्तिगत कायद्यात मूल दत्तक घेण्याची कुठेही तरतूद नाही. त्यामुळे अब्बासने जमिनीवर हक्क सांगताना आपण रुस्तम यांचा दत्तकपुत्र आहोत, हा केलेला दावाच निराधार आणि पोकळ होता. खालच्या दोन्ही न्यायालयांनी अब्बासचा दावा नाकारताना हाही मुद्दा विचारात घेतला होता. मात्र उच्च न्यायालयाने याकडे दुर्लक्ष करून अब्बासच्या बाजूने निकाल दिला होता.