शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अन्नधान्याच्या किमती उतरवण्यास सरकारचे प्राधान्य

By admin | Updated: June 9, 2014 23:51 IST

अन्नधान्याची भाववाढ नियंत्रणात आणण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक प्राधान्य दिले असून, त्यांच्या सरकारकडून आर्थिक विकास कार्यक्रम राबविला जाईल.

नवी दिल्ली : अन्नधान्याची भाववाढ नियंत्रणात आणण्यास  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक प्राधान्य दिले असून, त्यांच्या सरकारकडून आर्थिक विकास कार्यक्रम राबविला जाईल. आर्थिक विकास कार्यक्रमाअंतर्गत रोजगार निर्मिती, विकासाच्या दरात वाढ, तसेच परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढविणो व जनतेला अनुकूल करप्रणाली यांचा समावेश आहे. 
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेच्या संयुक्त सभागृहासमोर अभिभाषण केले. या भाषणात राष्ट्रपतींनी मोदी सरकार साठेबाजांवर कडक कारवाई करील, तसेच परदेशी बँकांत गुंतवलेला काळा पैसा देशात आणला जाईल असेही सांगितले. 
जीएसटी अर्थात वस्तू व सेवा कर लागू करणो व कोळसा क्षेत्रत सुधारणा करणो यालाही प्राधान्य दिले जाणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहे, अशी नोंद करून राष्ट्रपती पुढे म्हणाले की, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही मिळून काम करू. महागाई नियंत्रणात आणू, गुंतवणूक आकर्षित करू, रोजगारात वाढ करू , याद्वारे देशातील व परदेशातील समुदायाचा विश्वास मिळवू, असे राष्ट्रपतींनी सांगितले. महागाईच्या चढत्या आलेखाचा उल्लेख करून राष्ट्रपती मुखर्जी पुढे म्हणाले, महागाई नियंत्रणात आणण्यास नवे सरकार सर्वोच्च प्राधान्य देणार आहे. यावर्षी मान्सूनचा पाऊस थोडा कमी असेल याची सरकारला कल्पना आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकार योजना तयार करत आहे. 
राष्ट्रपती पुढे म्हणाले की, सरकार यासाठी पारदर्शी व न्यायपूर्ण धोरण राबवणार आहे, करप्रणाली साधी व सरळ असेल, जनतेसाठी सुसह्य असेल, गुंतवणूक, उद्योजक व विकास यांना चालना देणारी असेल. जीएसटी करप्रणाली लागू केली जाईल. परदेशी बँकांत गुंतवलेला काळा पैसा देशात परत आणला जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4भारतीयांचा परदेशातील काळा पैसा परत आणण्यासाठी जागतिक सहकार्य घेण्याची घोषणा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केली. बेकायदेशीररीत्या कमविलेला काळा पैसा देशात परत आणण्यासाठी विविध देशांशी संपर्क साधला जाणार आहे. सरकार काळ्या पैशापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी सरकार प्रतिबद्ध असून यादृष्टीनेच विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
4निवृत्त न्यायमूर्ती एम. बी. शाह यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटीची गेल्या दोन जून रोजी पहिली बैठक झाली. समितीच्या अधिकारात येणा:या प्रकरणांचा तपास एसआयटीद्वारे सुरू झाला आहे. मुखर्जी यांनी सांगितले की, सरकारी भ्रष्टाचारमुक्त आणि योग्य प्रशासन उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रात करत आहे. लोकपाल ही संस्था भ्रष्टाचार निमरूलनासाठी महत्त्वाची असून हा कायदा अधिक बळकट करण्यासाठी सरकार प्रतिबद्ध असल्याचे ते म्हणाले.