शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कुपोषणाकडे शासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: August 26, 2016 01:04 IST

बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण वाढले असून, शासनाकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जनआरोग्य अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी केला

पुणे : राज्यातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण वाढले असून, शासनाकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जनआरोग्य अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. डॉ. अभिजित मोरे, अ‍ॅड. बंडू साने व डॉ. सुहास कोल्हेकर यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील बालकांच्या कुपोषणाविषयी माहिती दिली. राज्यात अनेक मुले कमी वजनाची भरत असून, ते बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. २०१५-१६ या वर्षात राज्यात ८३ हजार ६८ मुले गंभीररीत्या कमी वजनाची असून मध्यम कमी वजनाच्या मुलांची संख्या ५ लाख ६३ हजार ३१० इतकी आहे. राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आकडेवारीवरून हे चित्र स्पष्ट झाले आहे. कुपोषित असणारी बहुतांश मुले झोपडपट्टी, आदिवासी आणि ग्रामीण भागातील असल्याचेही या अहवालावरून स्पष्ट होत असल्याचे डॉ. कोल्हेकर म्हणाले. या कुपोषित मुलांसाठी असणारी ग्राम बाल विकास केंद्रे, बाल उपचार केंद्रे, पोषण पुनर्वसन केंद्रे तत्काळ सुरू करण्याची आवश्यकता आहे.राज्यातील पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूची संख्या मागील वर्षी ४,१०१ होती; मात्र ती आता या वर्षी ही संख्या वाढली असून ४,९१३ इतकी झाली आहे. याचबरोबर राज्यात २०१४पासून आतापर्यंत ३९,९५९ अर्भक मरण पावले आहेत, तर ३८,१४४ उपजत मृत्यू झाल्याचे कुटुंबकल्याणकडून मिळालेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. गंभीररीत्या वजन कमी झालेल्या बालकांचे प्रमाण नाशिकमध्ये जास्त असून २०१५-१६ या वर्षात ६,४०४ बालकांची यामध्ये नोंद झाली आहे. तर, त्याखालोखाल जळगावमध्ये ४,४६८ आणि अमरावती येथे ३,५९८ बालकांचे वजन गंभीररीत्या कमी झाल्याचे आढळले आहे. (प्रतिनिधी)>जनआरोग्य अभियान संघटनेतर्फे माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती राज्याच्या कुटुंबकल्याण विभागाकडे मागविण्यात आली होती. मुलांच्या विकासासाठी चांगले पोषण होण्याची आवश्यकता असून जन्मापासून सहा वर्षांपर्यंतचा काळ बालकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. मात्र, याबाबत शासन पुरेशा गांभीर्याने व सातत्याने काम करीत नसल्याची टीकाही संघटनेने केली आहे. शासनाकडे असणाऱ्या अपुऱ्या निधीमुळे गावपातळीवरील बालकांच्या उपचारांसाठी चालवली जाणारी ग्राम बालविकास केंद्रे २०१५पासून बंद करण्यात आली असून, ती त्वरित चालू करण्यात यावीत, अशी मागणीही संघटनेतर्फे करण्यात आली आहे.