शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीत मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
2
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
3
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
4
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
5
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
6
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
7
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
8
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
9
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
10
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
11
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
12
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
13
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
14
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
15
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
16
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
17
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
18
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
19
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
20
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

राज्यातील कुपोषणाकडे शासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: August 26, 2016 01:04 IST

बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण वाढले असून, शासनाकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जनआरोग्य अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी केला

पुणे : राज्यातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण वाढले असून, शासनाकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जनआरोग्य अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. डॉ. अभिजित मोरे, अ‍ॅड. बंडू साने व डॉ. सुहास कोल्हेकर यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील बालकांच्या कुपोषणाविषयी माहिती दिली. राज्यात अनेक मुले कमी वजनाची भरत असून, ते बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. २०१५-१६ या वर्षात राज्यात ८३ हजार ६८ मुले गंभीररीत्या कमी वजनाची असून मध्यम कमी वजनाच्या मुलांची संख्या ५ लाख ६३ हजार ३१० इतकी आहे. राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आकडेवारीवरून हे चित्र स्पष्ट झाले आहे. कुपोषित असणारी बहुतांश मुले झोपडपट्टी, आदिवासी आणि ग्रामीण भागातील असल्याचेही या अहवालावरून स्पष्ट होत असल्याचे डॉ. कोल्हेकर म्हणाले. या कुपोषित मुलांसाठी असणारी ग्राम बाल विकास केंद्रे, बाल उपचार केंद्रे, पोषण पुनर्वसन केंद्रे तत्काळ सुरू करण्याची आवश्यकता आहे.राज्यातील पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूची संख्या मागील वर्षी ४,१०१ होती; मात्र ती आता या वर्षी ही संख्या वाढली असून ४,९१३ इतकी झाली आहे. याचबरोबर राज्यात २०१४पासून आतापर्यंत ३९,९५९ अर्भक मरण पावले आहेत, तर ३८,१४४ उपजत मृत्यू झाल्याचे कुटुंबकल्याणकडून मिळालेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. गंभीररीत्या वजन कमी झालेल्या बालकांचे प्रमाण नाशिकमध्ये जास्त असून २०१५-१६ या वर्षात ६,४०४ बालकांची यामध्ये नोंद झाली आहे. तर, त्याखालोखाल जळगावमध्ये ४,४६८ आणि अमरावती येथे ३,५९८ बालकांचे वजन गंभीररीत्या कमी झाल्याचे आढळले आहे. (प्रतिनिधी)>जनआरोग्य अभियान संघटनेतर्फे माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती राज्याच्या कुटुंबकल्याण विभागाकडे मागविण्यात आली होती. मुलांच्या विकासासाठी चांगले पोषण होण्याची आवश्यकता असून जन्मापासून सहा वर्षांपर्यंतचा काळ बालकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. मात्र, याबाबत शासन पुरेशा गांभीर्याने व सातत्याने काम करीत नसल्याची टीकाही संघटनेने केली आहे. शासनाकडे असणाऱ्या अपुऱ्या निधीमुळे गावपातळीवरील बालकांच्या उपचारांसाठी चालवली जाणारी ग्राम बालविकास केंद्रे २०१५पासून बंद करण्यात आली असून, ती त्वरित चालू करण्यात यावीत, अशी मागणीही संघटनेतर्फे करण्यात आली आहे.