शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
5
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
6
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
7
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
8
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
9
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
10
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
11
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
12
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
14
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
15
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
16
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
17
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
18
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
19
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
20
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

लाचखोरांवर आवळतोय पाश

By admin | Updated: November 5, 2014 00:58 IST

राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असून सापळ्याची यंदाची कारवाई गतवर्षीपेक्षा दुप्पट झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार २००९ मध्ये ४०५, २०१० मध्ये ४८६,

नागपूर : राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असून सापळ्याची यंदाची कारवाई गतवर्षीपेक्षा दुप्पट झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार २००९ मध्ये ४०५, २०१० मध्ये ४८६, २०११ मध्ये ४७९, २०१२ मध्ये ४८९, २०१३ मध्ये ५८३ आणि चालू वर्षी आतापर्यंत १०२३ सापळे यशस्वी करण्यात आलेले आहेत. चालू वर्षीच्या सापळ्यात मुंबईमध्ये ७३, ठाणे १२०, पुणे १७२, नाशिक १८१, नागपूर ११८, अमरावती १०६, औरंगाबाद १३५आणि नांदेड परिक्षेत्रात ११६ सापळे यशस्वी करण्यात आले. या सापळ्यांवरून असा निष्कर्ष काढण्यात आला की, सर्वाधिक भ्रष्ट विभाग महसूल आणि पोलीस आहे. महसूल विभागातील २७४ सापळ्यात ३६७ जणांना अटक करण्यात आली. सापळ्याची रक्कम २९ लाख रुपये आहे. तर पोलीस विभागात २४७ सापळ्यात ३४२ जणांना अटक करण्यात आली. सापळ्याची रक्कम ५४ लाख ६० हजार रुपये आहे. लाचखोर अभियंत्यांचेवाढत आहे प्रमाणलाचखोरीमध्ये अभियंत्यांचे प्रमाण वाढत असल्याची धक्कादायक माहिती आहे. चालू वर्षी लाच घेताना २८ डॉक्टर, ७३ अभियंते, २७ शिक्षक, ११ सरकारी वकील, १५ सरपंच-उपसरपंच, १० नगरसेवक, ४ सभापती, ३ नगर परिषद अध्यक्ष, १०९ तलाठी आणि अन्य १०९२ जण सापळ्यात अडकले. यात पोलिसांचा अधिक समावेश आहे. झालेल्या कारवाईनुसार अभियंत्यांची टक्केवारी ५ आणि तलाठ्यांची टक्केवारी ९ एवढी आहे. लाचखोरांना उघडे पाडण्याचे महत्त्वाचे कार्य धाडसी तक्रारकर्ता करीत असतो. चालू वर्षीच्या कारवाईत १०२१ तक्रारकर्ते असून त्यात वृद्ध १४, अपंग १२, महिला ३०, अनुसूचित जातीचे ८१, अनुसूचित जमातीचे १७ आणि इतर ८६७ जण आहेत.३०२ प्रकरणे मंजुरीविना अडलीसंबंधित आरोपीविरुद्ध न्यायालयात लाचखोरीचा खटला दाखल करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला शासनाची मंजुरी घ्यावी लागते. त्यासाठी मोठा विलंब होतो. काही प्रकरणात मंजुरीच मिळत नसल्याने त्याचा फायदा आरोपीला मिळतो. मंजुरीस लागणाऱ्या विलंबाचा फायदाही आरोपीला होतो. शासनाकडे मंजुरीसाठी राज्यातीलच एकूण ३०२ प्रकरणे असून त्यापैकी १११ प्रकरणे ९० दिवसांच्या वरची तर १९१ प्रकरणे ९० दिवसांच्या खालची आहेत. या विलंबामुळे ही प्रकरणे न्यायालयांमध्ये दाखल होऊ शकली नाहीत. यात महसूल विभागाची ८३, गृह विभागाची ६९, नगर रचना, महानगरपालिकांची ३४, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींची ३० प्रकरणे आहेत. रंगेहात म्हणजे काय?लाचेच्या नोटांना फिनॉप्थेलिन किंवा अँथ्रासिन रसायनाची पावडर लागलेली असते. लाच स्वीकारल्यानंतर आरोपीचे हात सोडियम कार्बोनेटच्या द्रावणात टाकल्यानंतर हात लालसर किंवा गुलाबी होतात. यालाच रंगेहात अटक, असे म्हटले जाते. ही कारवाई पंचांसमक्ष होते. हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा असतो. तरीही आरोपींचे निर्दोष होण्याचे प्रमाण अधिक आहे. वस्तुत: एक शिक्षा ही भविष्यातील अनेक प्रकरणांना आळा घालणारी ठरू शकते. लाच प्रकरणातील शिक्षेचे प्रमाण किमान ५० ते ६० टक्के असायला पाहिजे. परंतु प्रत्यक्षात शिक्षेचे प्रमाण कमी असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.