शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘लोक’मतातून लोकसेवकांचा गौरव

By admin | Updated: March 25, 2016 02:27 IST

वैशिष्ट्यपूर्ण कामांतून महाराष्ट्राची सामाजिक गुढी उंचाविणाऱ्या चैत्राम पवार, कृष्णा चांदगुडे, रज्जाक पठाण, प्रा. रवी बापटले व डॉ. सुरेश अडवाणी या पाच मान्यवरांची नामांकने

चला निवड करू या...आॅनलाइन मतदान : पवार, चांदगुडे, पठाण, बापटले, अडवाणी यांची नामांकने मुंबई : वैशिष्ट्यपूर्ण कामांतून महाराष्ट्राची सामाजिक गुढी उंचाविणाऱ्या चैत्राम पवार, कृष्णा चांदगुडे, रज्जाक पठाण, प्रा. रवी बापटले व डॉ. सुरेश अडवाणी या पाच मान्यवरांची नामांकने या वर्षीच्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कारासाठी ‘लोकसेवा-समाजसेवा’ या क्षेत्रातून जाहीर झाली आहेत. या मान्यवरांपैकी जनता व ज्युरी कोणाची निवड करणार याची उत्सुकता आहे. ‘लोकमत’च्या राज्यस्तरीय नेटवर्कच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात वेगळी वाट धुंडाळत समाजबदल घडविणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा या पुरस्कारासाठी शोध घेण्यात आला. प्रत्येकाचे काम वेगळे आणि नोंद घेणारे आहे. शिवाय समाजाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे आहे. लोकमतसाठी हे पाचही विजेते आहेत म्हणूनच विविध शिफारशींमधून ही पाच नामांकने अंतिम फेरीसाठी निवडली गेली आहेत. या नामांकनावर ‘लोकमत’च्या संकेतस्थळावर आॅनलाइन मतदान सुरू आहे. चैत्राम पवार : नामांकन जाहीर झालेले धुळे जिल्ह्यातील चैत्राम पवार हे खऱ्या अर्थाने ‘जंगलमॅन’ आहेत. झाडांवर प्रेम करणाऱ्या या माणसाने धुळ्यातील बारीपाडानजीकच्या वन विभागाच्या जमिनीवर तब्बल अकराशे एकरचे जंगल उभे केले. जंगल, जल, जमीन, जन, जनावर ही पंचसूत्री त्यांनी आदिवासींमध्ये रुजवली. आदिवासींना स्ट्रॉबेरीसारख्या फळांचे उत्पादन घ्यायला शिकविले. कुऱ्हाडबंदीपासून पुरुषांच्या नसबंदीपर्यंतचा सामाजिक बदलाचा चमत्कार त्यांनी आदिवासींमध्ये घडविला. कृष्णा चांदगुडे : जात पंचायती हद्दपार करण्यासाठी चांदगुडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने राज्यभर लढा उभारला आहे. कायद्याला आव्हान देणारी ‘जात पंचायत’ नावाची समांतर यंत्रणा अनेक समाजात क्रूर रूप धारण करून उभी आहे. जातीचे नियम तोडले म्हणून माणसांना गावातून व जातीतून बहिष्कृत करण्याचे अघोरी निकाल या पंचायतींनी अनेक ठिकाणी दिले. पंचायतींच्या दहशतीतून अनेक ठिकाणी हत्यांकाडेही घडली. चांदगुडे यांनी उभारलेल्या लढ्यामुळे हे अन्यायी पंचायत राज हद्दपार होऊ पाहत आहे. वेगवेगळ्या ११ समाजांनी पंचायतींना मूठमाती दिली आहे. सरकारही आता लवकरच कायदा करणार आहे. रज्जाक पठाण : गेल्या चार पिढ्या पुणे जिल्ह्यात लोणी देवकर येथे देशी गायींचे संवर्धन करत आहेत. त्यांनी आपल्या गोठ्यात दररोज १२ लीटर दूध देणारी खिल्लार गाय तसेच २८ लीटर दूध देणाऱ्या गीर गायींची पैदास केली आहे. जातिवंत गायींची पैदास करून त्या गायी ते शेतकऱ्यांना दान करतात. भाकड देशी गायी दुभत्या बनवून त्यांनी शेतकऱ्यांच्या दावणीला बांधल्या. ६५० विधवा महिलांच्या मुलांना ते शिक्षणासाठी मदतही करतात. मुस्लीम गोपालक अशी त्यांची ओळख आजच्या काळातली नसून गेल्या तीन पिढ्यांची आहे. प्रा. रवी बापटले : ‘एचआयव्ही बाधितांचा पिता’ म्हणून बापटले राज्याला परिचित आहेत. एचआयव्हीमुळे दगावलेल्या दाम्पत्यांची एचआयव्ही बाधित मुले पुढे समाजात अनाथ व बहिष्कृत होऊन जगतात. या मुलांना कुणीही थारा देत नाही. त्यामुळे बापटले यांनी अशा मुलांसाठी लातूर जिल्ह्यातील हसेगाव येथे ‘सेवालय’ उभारले आहे. सध्या या सेवालयात ६२ मुलांचे ते पालकत्व करत आहेत. त्यांच्या या कामाला समाजातून मोठा विरोध झाला. मात्र, त्यांनी खंबीरपणे उभे राहत सरकारी अनुदानाशिवाय हे केंद्र चालविले. या मुलांसाठी ‘हॅपी इंडियन व्हिलेज’ (एचआयव्ही) नावाच्या प्रकल्पाची उभारणीही त्यांनी सुरू केली आहे. स्वत: अविवाहित राहून हा प्रपंच त्यांनी मोठा केला आहे. डॉ. सुरेश अडवाणी : भारतातील कॅन्सर संशोधनातील पथदर्शी म्हणून ओळखले जाणारे मुंबईचे डॉ. सुरेश अडवाणी यांचेही नामांकन जाहीर झाले आहे. डॉ. अडवाणी हे स्वत: पोलिओग्रस्त आहेत. आजही ते चालू शकत नाहीत. त्यांना वैद्यकीय क्षेत्रात सुरुवातीला प्रवेशही नाकारण्यात आला होता. मात्र, व्यंगावर मात करत त्यांनी आपले जीवन कॅन्सरच्या संशोधनासाठी वाहिले. बोन मॅरोचे भारतातील पहिले प्रत्यारोपण त्यांनी केले. रक्ताच्या कॅन्सरशी झगडणाऱ्या बालकांवरील उपचाराची यशस्विता त्यांनी ७० टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. पारोमिता गोस्वामींचा गौरवयापूर्वी ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’मध्ये ‘लोकसेवा-समाजसेवा’ या क्षेत्रातून पारोमिता गोस्वामी यांना गौरविण्यात आलेले आहे. मूळच्या पश्चिम बंगालच्या असलेल्या गोस्वामी या चंद्रपूर, गडचिरोलीत आदिवासींसाठी काम करतात. श्रमिक एल्गार नावाचे आंदोलन त्यांनी उभारले. चंद्रपूर जिल्हा दारूमुक्त करण्यासाठी त्यांनी मोठा लढा उभारला. हा लढा राज्यभर गाजला.