शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

कृषी विभागाची ‘वैरण’ ओसाड!

By admin | Updated: July 2, 2014 00:55 IST

जनावरे आणि शेतकरी यांचे अतुट नाते आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या गोठ्यात जनावर नसले की त्याला चैन पडत नाही. तीच त्याची खरी संपत्ती असते. कदाचित म्हणून जनावरांना ‘पशुधन’ म्हटल्या जाते.

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न : दोन वर्षांपासून योजना थंडबस्त्यात जीवन रामावत - नागपूरजनावरे आणि शेतकरी यांचे अतुट नाते आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या गोठ्यात जनावर नसले की त्याला चैन पडत नाही. तीच त्याची खरी संपत्ती असते. कदाचित म्हणून जनावरांना ‘पशुधन’ म्हटल्या जाते. बळीराजाच्या या पशुधनाचे चांगले संगोपन व्हावे, त्यांची संख्या वाढावी व दुष्काळातही त्यांना चारा व वैरण मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्यात गत काही वर्षांपासून ‘गतिमान वैरण विकास कार्यक्रम’ राबविला जात आहे. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे, कृषी विभागाचा निष्काळजीपणा व दुर्लक्षामुळे गत दोन वर्षांपासून नागपूर जिल्ह्यातील हा ‘वैरण विकास कार्यक्रम’ ओसाड पडला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे सध्या विदर्भातील शेतकऱ्यांसोबतच त्यांचे पशुधनही संकटात सापडले आहे. माहिती सूत्रानुसार गत तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली होती. त्यासाठी शासनाकडून तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यातून शेतकऱ्यांना ज्वारी, बरसीम, लुसर्न, फॉडरबीट, बाजरी, नेपियर, यशवंत, बायफ-१०, मका, व न्यूट्रिफीड यासारख्या चारा पिकाचे बियाणे वाटप करण्यात आले होते. परंतु गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात ही योजनाच राबविण्यात आली नाही. त्यामुळे शासनाकडून त्यासाठी अनुदानही प्राप्त झाले नाही. कदाचित गतवर्षीच्या रबी हंगामात ही योजना राबविली असती तर आज जिल्ह्यात चारासंकट निर्माण झाले नसते.मात्र त्यासोबतच एक समाधानाची बाब म्हणजे, यंदा राज्य शासनाने २०१४-१५ मध्ये जिल्ह्यात ही योजना राबविण्यासाठी ३७ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून जिल्ह्यात १०० हेक्टरचा एक याप्रमाणे एकूण २५ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना प्रति एकरी ६०० रुपयांचे अनुदानही दिले जाणार आहे.